शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
2
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
3
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
4
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
5
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
7
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
8
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
9
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
10
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
11
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
12
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
13
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
15
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
16
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
17
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
18
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
19
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
20
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका

औरंगाबाद शहराचे सार्वजनिक वाहतुकीचे कंबरडे मोडले; धावतात अवघ्या १७ सिटी बस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2018 4:34 PM

शहरातील रस्त्यावर सध्या अवघ्या १७ शहर बस धावत आहेत. उन्हाळी सुट्यांमुळे शहर बसच्या संख्येत कपात करण्याचा निर्णय घेतल्याचे एसटी महामंडळाच्या सूत्रांनी सांगितले.

औरंगाबाद : शहरातील रस्त्यावर सध्या अवघ्या १७ शहर बस धावत आहेत. उन्हाळी सुट्यांमुळे शहर बसच्या संख्येत कपात करण्याचा निर्णय घेतल्याचे एसटी महामंडळाच्या सूत्रांनी सांगितले.

शहर बससेवा चालविताना गेल्या पाच वर्षांत एस. टी. महामंडळाला झालेला तोटा १६ कोटींवर गेला आहे. शहर बससेवा चालविणे ही महापालिकेची जबाबदारी आहे. त्यामुळे शहर बससेवा चालविताना होणाऱ्या नुकसानीची भरपाई मनपाने करावी, अन्यथा शहर बससेवा बंद करण्याशिवाय पर्याय नसल्याचे महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी मनपा आयुक्तांना कळविले होते. प्रारंभी नोव्हेंबर २०१६ मध्ये शहर बससेवेपोटी झालेल्या नुकसानीची रक्कम देण्याची मागणी मनपाकडे करण्यात आली. यानंतरही वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला. परंतु महापालिकेकडून प्रतिसाद मिळाला नाही. 

या सगळ्यात शहरात अवघ्या २५ ते ३० शहर बस चालविण्यावर भर देण्यात आला. यामध्येही आता कपात करून काही शहर बस थेट शहराबाहेर चालविण्यात येत आहेत. सध्या केवळ १७ शहर बस सुरू आहेत. यास एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला. त्यामुळे अनेक मार्गांवर प्रवाशांना शहर बसची नुसती प्रतीक्षा करावी लागते. यातून प्रचंड गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.  शहर बसच्या अपुऱ्या संख्येमुळे नाईलाजाने आर्थिक भुर्दंड सहन करून रिक्षाने प्रवास करण्याची वेळ प्रवाशांवर येत आहे.  

टॅग्स :state transportएसटीAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाAurangabad Central Bus Standऔरंगाबाद मुख्य बसस्थानकAurangabad Cidco Bus Standऔरंगाबाद सिडको बसस्थानक