शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

औरंगाबादेत शाळांच्या १४ बस कालबाह्य असल्याचे तपासणीत आले समोर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2018 2:13 PM

वाळूज रोडवर शाळेच्या बसमधून विद्यार्थी पडून झालेल्या अपघातामुळे आरटीओ कार्यालय जागे झाले

ठळक मुद्देअपघातानंतर परिवहन विभागाला आली जाग शुक्रवार पहाटेपासून बस ताब्यात घेण्याची कारवाई४८ वाहनांमध्ये आढळले तांत्रिक दोष

औरंगाबाद : वाळूज रोडवर शाळेच्या बसमधून विद्यार्थी पडून झालेल्या अपघातामुळे  प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) जागे झाले असून, शुक्रवारी पहाटेपासून शालेय बसची तपासणी करण्यात आली. या तपासणीत ४८ वाहने दोषी आढळली, तर १४ वाहने कालबाह्य झाल्याची बाब समोर आली आहे. 

आरटीओ कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अनेक स्कूल बस आणि रिक्षा ताब्यात घेऊन आरटीओ कार्यालय परिसरात उचलून आणली होती. ज्यांनी कागदपत्रांची पूर्तता केली, त्यांना त्वरित जाता आले. कालबाह्य झालेली १४ वाहने मात्र सोडण्यात आलेली नाहीत. या तपासणीमुळे विद्यार्थ्यांची मात्र गैरसोय झाली. अनेकांना स्कूल बसऐवजी खाजगी वाहनाने आणि रिक्षाने प्रवास करावा लागला. 

परमिट नसणे, खाजगी वाहनात बदल करणे, सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना नसणे, कालबाह्य वाहने चालविणे, असे प्रकार शहरातील स्कूल बसबाबत असल्याच्या कारणाने आरटीओ कार्यालयाने हे पाऊल उचलले. बस वाहन मुलांसाठी सोयीचे आणि सुरक्षित आहे की नाही, याची शहानिशा पालकांनीदेखील करावी, असे आवाहन आरटीओ कार्यालयाने केले आहे. 

नियमांचे उल्लंघन केल्याने कारवाईविद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळणाऱ्या व नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर शुकवारी कारवाई केली आहे. चार पथकांनी विविध ठिकाणी ही कारवाई केली. - स. प्र. मेत्रेवार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थीRto officeआरटीओ ऑफीसAurangabadऔरंगाबाद