शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
2
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
3
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
4
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
6
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
7
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
8
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
9
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
10
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
11
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
12
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
13
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
14
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
15
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
16
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
17
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
18
घरांच्या विक्रीला ‘ब्रेक’; पुणे, मुंबईत मोठी घसरण; नव्या विमानतळामुळे...
19
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
20
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
Daily Top 2Weekly Top 5

वैजापूरच्या बांधकामांना कृत्रिम वाळूचा आधार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 01:05 IST

निविदा प्रक्रियेत वैजापूरची वाळू अडकल्याने शहरासह तालुक्यातील बांधकामांना कृत्रिम वाळूचा आधार मिळाला आहे. तालुक्यातील खंडाळा येथून दररोज शंभरपेक्षा अधिक वाळूचे ट्रक शहरासह जिल्ह्यात जात आहेत. वाळूच्या ठेक्यांसाठी प्रशासनाने ई -टेंडरिंगची प्रक्रिया राबविल्याने वाळू ठेकेदारांनी त्यास प्रतिसाद दिलेला नाही.

मोबीन खान ।लोकमत न्यूज नेटवर्कवैजापूर : निविदा प्रक्रियेत वैजापूरची वाळू अडकल्याने शहरासह तालुक्यातील बांधकामांना कृत्रिम वाळूचा आधार मिळाला आहे. तालुक्यातील खंडाळा येथून दररोज शंभरपेक्षा अधिक वाळूचे ट्रक शहरासह जिल्ह्यात जात आहेत. वाळूच्या ठेक्यांसाठी प्रशासनाने ई -टेंडरिंगची प्रक्रिया राबविल्याने वाळू ठेकेदारांनी त्यास प्रतिसाद दिलेला नाही.तालुक्यात शेकडो वाळू ठेकेदार असूनही अधिकृतरीत्या पैसे भरून टेंडर घेण्यास हे व्यावसायिक धजावत नसल्याची शंका यातून व्यक्त केली जात आहे. परिणामी, वाळूची उचल आणि विक्री ठप्प झाली आहे. त्यामुळे वैजापूर शहर परिसरात बांधकाम क्षेत्राला याचा फटका बसत आहे. अनेक बांधकामे बंद पडण्याचा मार्गावर आहेत. याचा थेट परिणाम या क्षेत्रातील बांधकाम मजुरांवर झाला आहे. मात्र, या समस्येला कृत्रिम वाळूने मोठा आधार पुढे केला आहे.गेल्या चार वर्षांपासून तालुक्यात वाळू उपसाबंदी आहे. शहर आणि परिसरात मिळून जवळपास सध्या दोन हजार फ्लॅटस, घरकुल व शौचालयांचे बांधकाम सुरू आहे. मात्र वाळू उपलब्ध नसल्यामुळे एकीकडे प्रकल्प उभारणीवर परिणाम झाला आहे, तर दुसरीकडे बांधकाम खर्चात वाढ होत आहे. लहान सहान व्यावसायिकांना तर वाळू उपलब्धतेसाठी धावाधाव करावी लागत आहे. सामान्य माणूस अडचणीत आला असून घरबांधणीसाठी वाळू खरेदी करताना त्यांना दुप्पट पैसे मोजावे लागत आहेत. मागणी जास्त आणि उपलब्धता कमी यामुळे वाळूचा दर आवाक्याबाहेर पोहोचला आहे. एक ट्रक वाळूसाठी (अडीच ते तीन ब्रास) २५ ते ३० हजार रुपये मोजावे लागत आहेत. वाळू टंचाई आणि जादा किमतीवेळी बांधकाम खर्च दहा टक्क्यांनी वाढत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. तालुक्यात चार वर्षांपासून वाळू उपसाबंदी आहे. वाळूला पर्याय म्हणून तालुक्यातील नागरिकांनी खंडाळ्यातील कृत्रिम वाळू वापराबाबतचे नवीन धोरण स्वीकारले आहे.विशेष म्हणजे (अडीच ते तीन ब्रास) केवळ सहा ते नऊ हजार रुपयात मिळत असल्याने शासकीय विभागाकडून करण्यात येणारे घरकुल, शौचालय, रस्ते, पूल आणि सरकारी इमारतींसाठी आता शंभर टक्के कृत्रिम वाळू वापरली जात आहे.जिल्ह्यात पहिला प्लांट खंडाळ्यातऔरंगाबाद जिल्ह्यात केवळ वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथेच कृत्रिम वाळूचे दोन प्लांट असल्याचे समजते. त्यामुळे जिल्ह्यातून सुद्धा या कृत्रिम वाळूची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शहरांतील पूल, फ्लायओव्हर्स, काँक्रिट रस्ते, मोठमोठे बिल्डिंग प्रोजेक्ट, रेडिमिक्स फ्लॅट, प्रिस्ट्रेस्ड पाईप्स यांच्या निर्मितीत अनेक ठिकाणी कृत्रिम वाळूचा पर्यायी वापर सुरू झाला आहे.च्शिवाय या कृत्रिम वाळूच्या वापराने बांधकामाची गुणवत्ता कमी न होता ती वाढते, असे बांधकाम अभियंत्यांचे म्हणणे आहे. कारण नैसर्गिक वाळू गोलाकार असते तर कृत्रिम वाळूचे कण साधारण त्रिकोणाकृती असतात. कोनिकल अँगलमुळे या बांधकामात घट्टपणा येतो. तो चुरा अधिक मजबुतीने चिकटला जातो.वाळूबंदीने डोळ्यात पाणीवाळू बंदीने अनेकांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. रखडलेल्या बांधकामांचा परिणाम बाजारपेठेवरही झाला आहे. अवैध मार्गाने मिळणारी वाळू बारा हजारांवर गेली आहे. स्थानिक ओढे व नदी पात्रातील वाळूचा दर ५ ते ७ हजारांवर पोहोचला आहे. त्याचा परिणाम कृत्रिम वाळूवरही झाला आहे. त्या वाळूचाही दर दोन हजार वरून २२०० ते २५०० रुपये ब्रास झाला आहे. या सर्व वाढलेल्या दरामुळे व वाळू टंचाईमुळे घर बांधणारे हैराण झाले होते.