शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
3
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
4
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
5
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
6
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
7
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
8
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
9
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
10
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
11
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
12
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
13
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
14
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
15
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
16
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
17
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
18
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
19
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
20
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO

ठेकेदारांच्या मनमानीने दोन महिन्यांत पाच मृत्यू; पोलिसांच्या ‘एनओसी’ शिवायच कामे सुरू

By सुमित डोळे | Updated: October 8, 2024 12:14 IST

भर रस्त्यात कुठल्याही वेळेत काम करणे, साहित्य ठेवून आवश्यक उपाययोजना करत नसल्याचे दिसते.

छत्रपती संभाजीनगर : शहरात सुरू असलेल्या शासकीय कामांच्या ठेकेदारांकडून निष्काळजीपणा केला जात आहे. वारंवार बजावून एकाही कामाची एनओसी वाहतूक पोलिसांकडून घेतली नसल्याचे निदर्शनास आले आहे. भर रस्त्यात कुठल्याही वेळेत काम करणे, साहित्य ठेवून आवश्यक उपाययोजना करत नसल्याचे दिसते. परिणामी, गेल्या दोन महिन्यांत पाच नागरिकांचे जीव गेले. विशेष म्हणजे, मनपाने दिलेल्या कंत्राटदार कंपनीमुळे म़ृत्यूची ही दुसरी घटना आहे.

उलट बाजूने सुसाट जाणाऱ्या स्काॅर्पिओच्या (एमएच ०६ -एएन- ८०७६) धडकेत ६ ऑक्टोबरला मध्यरात्री १ वाजता हेमंत पाखरे (रा. पदमपुरा), राहुल लोदी (रा. केशरसिंगपुरा) या दोन मित्रांचा मृत्यू झाला. सातारा पोलिस ठाण्यात पसार स्कॉर्पिओचालक व जलवाहिनीच्या काम करणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महानुभाव चौकाकडून रेल्वेस्थानक रस्त्यावर जीव्हीपीआर कंपनीकडून जलवाहिनीचे काम सुरू आहे. कंपनीने मात्र कुठल्याच स्थानिक पोलिस, वाहतूक पोलिसांना याबाबत कुठलीच कल्पना दिली नाही. दिशादर्शक फलक न लावता एक रस्ता बंद करून वाहतूक रॉंग साइडने वळवली. सुरक्षेच्या दृष्टीने कुठलीही उपाययोजना किंवा सुरक्षारक्षक तैनात केला नाही.

ठेकेदारांचा मनमानी कारभारजीव्हीपीआर कंपनीकडून शहरात ठिकठिकाणी जलवाहिनीचे काम सुरू आहे. त्यासाठी लागणारे पाइप संपूर्ण शहरातील मुख्य चौक, रस्त्यांवर धोकेदायकरित्या थर रचून ठेवण्यात आले आहे. अन्य रस्त्यांच्या कामात देखील बेजबाबदारपणे खड्डे खोदून, तसेच सोडले जातात.

यापूर्वी ठेकेदारामुळे मृत्यू- जगन्नाथ कुलकर्णी (रा. नारेगाव) यांचा मुकुंदवाडी एसटी वर्कशॉप ते फॅक्सोप्लास कंपनी रस्त्यावर ठेकेदाराच्या बेजबाबदारपणामुळे मृत्यू झाला.- सिडको चाैकात जलवाहिनीच्या खड्ड्यात पडून राजू गायकवाड, या तरुणाचा मृत्यू झाला.- माळीवाडा पुलावर मातीऱ्या ढिगाऱ्याला धडकून आशिष सपकाळ (रा. पहाडसिंगपुरा) या तरुणाच्या मृत्यू प्रकरणात दौलताबाद ठाण्यात ठेकेदारावर गुन्हा.

वारंवार समज पण...रस्त्यांवरील कुठल्याही कामासाठी वाहतूक पोलिसांना पूर्वकल्पना देऊन एनओसी घेणे बंधनकारक आहे. त्यात वाहतूक पोलिस ठेकेदारांना कामासाठी वेळ ठरवून देतात शिवाय सूचनाफलक, सुरक्षारक्षक, बॅरिगेड्स बंधनकारक करतात. मात्र, शहरातील एकाही शासकीय कामाबाबत ठेकेदारांनी पोलिसांकडून परवानगी घेतलेली नाही. पोलिसांना न सांगताच सर्रास रस्त्यावर कुठल्याही वेळेत काम करणे, साहित्य ठेवले जातात.

कठोर भूमिका घेणाररस्त्यावरील कामासाठी वाहतूक पोलिसांची परवानगी आवश्यक असते. आम्ही त्यानंतर आवश्यक अटी शर्थींसह परवानगी देतो, परंतु ठेकेदार त्याकडे दुर्लक्ष करत असतील, तर कठोर भूमिका घेतली जाईल.- धनंजय पाटील, सहायक पोलिस आयुक्त, वाहतूक विभाग.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादTrafficवाहतूक कोंडीAccidentअपघातDeathमृत्यूtraffic policeवाहतूक पोलीस