शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

वातावरणातील अस्थिरता! मराठवाड्यात बारापैकी १० महिने कोसळताहेत विजा; ७ वर्षांत ३५७ मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2022 17:07 IST

पावसाळा तोंडावर आल्यामुळे वीज अटकाव यंत्रांचा मुद्दा ऐरणीवर; मागच्या वर्षी ७५ ठिकाणी पडली होती वीज

- विकास राऊतऔरंगाबाद : मराठवाड्याची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार १ कोटी ८७ लाख २७ हजार ७२८ असून विभागाचे भौगोलिक क्षेत्रफळ ६३.९३ लाख हेक्टर आहे. एवढी लोकसंख्या आणि क्षेत्रफळ असताना फक्त ३० वीजअटकाव यंत्रांवर विभागाची सुरक्षा आहे. अतिवृष्टी आणि पर्यावरणातील बदलामुळे मागील दोन वर्षांपासून बारापैकी दहा महिने विजा कोसळण्याच्या घटनांत नागरिक, जनावरांचा जीव गेला आहे.२०२० साली ५५ तर २०२१ साली वीज पडून ७५ जणांचा मृत्यू झाला. २०१५ पासून २०२१ पर्यंत ३५७ जण वीज पडून दगावले. २०२० साली जानेवारी व डिसेंबर वगळता सर्व महिन्यांत विजा पडल्या तर २०२१ साली डिसेंबर वगळता पूर्ण वर्षभर विजा पडल्या.

पावसाळा तोंडावर आल्यामुळे वीज अटकाव यंत्रांचा मुद्दा ऐरणीवर येतो. दोन वर्षे आपत्ती व्यवस्थापनाची यंत्रणा कोरोना नियंत्रणात गुंतली होती. त्यामुळे पावसाळी आपत्तीकडे विभागीय प्रशासनाने कागदोपत्रीच लक्ष दिले. मागील काही वर्षांतील आढावा घेतला तर विभागात वीज पडण्याचे प्रमाण वाढत आहे. वीज पडून मृत्यू होण्याचा आकडा वाढतोच आहे.

का पडताहेत मराठवाड्यावर विजा?वातावरणातील अस्थिरतेमुळे क्युमोलोनिंबस ढगांची गर्दी मराठवाड्यावर वाढते आहे. वातावरणातील बदलामुळे हे होत आहे. वड, पिंपळ व इतर देशी झाडे लावून हा बदल रोखणे शक्य आहे. क्युमोलो म्हणजे ऊर्ध्व (वरच्या) दिशेने जाणारे ढग व निंबस म्हणजे पाणी धारण करणारे ढग, यांची वेगाने घुसळण होऊन विद्युत कण तयार होतात, त्यातूनच विजा पडण्याचे प्रमाण वाढते आहे. विभागात जमिनीवरच नव्हे तर ढगांतही वीज वरच्या बाजूने पडत आहेत. यातून सॉफ्ट आणि हार्ड एक्स-रे बाहेर पडून आयनोझायशन होत आहे. यामुळे विजा पडण्याचे प्रमाण वाढत आहे. या सगळ्या वातावरणीय बदलांमुळे मराठवाडा ढगफुटीचा प्रदेश होत असल्याचे क्युमोलोनिंबसवर अभ्यास करणारे तज्ज्ञ प्रा. किरणकुमार जोहरे यांनी सांगितले.

२०१५ ते २०२१ पर्यंत वीज पडून झालेले मृत्यूजिल्हा मृत्यू वीजअटकाव यंत्रऔरंगाबाद --- ३८-- ०४जालना -- ४६ -- ०२परभणी -- ३९ -- ०४हिंगोली --- ३१ -- ०२नांदेड -- ९६ -- ०४बीड -- ५२ -- ०६लातूर -- ३८ -- ०४उस्मानाबाद--  २८ -- ०४एकूण --३५७ -- ३०

टॅग्स :Deathमृत्यूMarathwadaमराठवाडाRainपाऊसAurangabadऔरंगाबाद