शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध
2
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
3
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
4
हनिट्रॅप, शारीरिक संबंध आणि पैशांची मागणी, निवृत्त अधिकाऱ्यांना जाळ्यात अडकवणारी सुंदरी अशी सापडली
5
न्यूझीलंड विरुद्ध तझमिनची विक्रमी सेंच्युरी; स्मृती पडली मागे! दक्षिण आफ्रिकेचा पहिला विजय
6
तुमचा मित्र कुठे आहे? सहज शोधू शकाल, इन्स्टाग्रामने आणलं खास फिचर, मिळेल अशी माहिती
7
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
8
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
9
‘मेट्रो  ९ मार्गिका १५ डिसेंबरपर्यंत आणि मेट्रो ४ मार्गिका ३१ डिसेंबर पर्यंत सुरू करा’, परिवहन मंत्र्यांचे आदेश 
10
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
11
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
12
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
13
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
14
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
15
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
16
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
17
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
18
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
19
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
20
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम

वातावरणातील अस्थिरता! मराठवाड्यात बारापैकी १० महिने कोसळताहेत विजा; ७ वर्षांत ३५७ मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2022 17:07 IST

पावसाळा तोंडावर आल्यामुळे वीज अटकाव यंत्रांचा मुद्दा ऐरणीवर; मागच्या वर्षी ७५ ठिकाणी पडली होती वीज

- विकास राऊतऔरंगाबाद : मराठवाड्याची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार १ कोटी ८७ लाख २७ हजार ७२८ असून विभागाचे भौगोलिक क्षेत्रफळ ६३.९३ लाख हेक्टर आहे. एवढी लोकसंख्या आणि क्षेत्रफळ असताना फक्त ३० वीजअटकाव यंत्रांवर विभागाची सुरक्षा आहे. अतिवृष्टी आणि पर्यावरणातील बदलामुळे मागील दोन वर्षांपासून बारापैकी दहा महिने विजा कोसळण्याच्या घटनांत नागरिक, जनावरांचा जीव गेला आहे.२०२० साली ५५ तर २०२१ साली वीज पडून ७५ जणांचा मृत्यू झाला. २०१५ पासून २०२१ पर्यंत ३५७ जण वीज पडून दगावले. २०२० साली जानेवारी व डिसेंबर वगळता सर्व महिन्यांत विजा पडल्या तर २०२१ साली डिसेंबर वगळता पूर्ण वर्षभर विजा पडल्या.

पावसाळा तोंडावर आल्यामुळे वीज अटकाव यंत्रांचा मुद्दा ऐरणीवर येतो. दोन वर्षे आपत्ती व्यवस्थापनाची यंत्रणा कोरोना नियंत्रणात गुंतली होती. त्यामुळे पावसाळी आपत्तीकडे विभागीय प्रशासनाने कागदोपत्रीच लक्ष दिले. मागील काही वर्षांतील आढावा घेतला तर विभागात वीज पडण्याचे प्रमाण वाढत आहे. वीज पडून मृत्यू होण्याचा आकडा वाढतोच आहे.

का पडताहेत मराठवाड्यावर विजा?वातावरणातील अस्थिरतेमुळे क्युमोलोनिंबस ढगांची गर्दी मराठवाड्यावर वाढते आहे. वातावरणातील बदलामुळे हे होत आहे. वड, पिंपळ व इतर देशी झाडे लावून हा बदल रोखणे शक्य आहे. क्युमोलो म्हणजे ऊर्ध्व (वरच्या) दिशेने जाणारे ढग व निंबस म्हणजे पाणी धारण करणारे ढग, यांची वेगाने घुसळण होऊन विद्युत कण तयार होतात, त्यातूनच विजा पडण्याचे प्रमाण वाढते आहे. विभागात जमिनीवरच नव्हे तर ढगांतही वीज वरच्या बाजूने पडत आहेत. यातून सॉफ्ट आणि हार्ड एक्स-रे बाहेर पडून आयनोझायशन होत आहे. यामुळे विजा पडण्याचे प्रमाण वाढत आहे. या सगळ्या वातावरणीय बदलांमुळे मराठवाडा ढगफुटीचा प्रदेश होत असल्याचे क्युमोलोनिंबसवर अभ्यास करणारे तज्ज्ञ प्रा. किरणकुमार जोहरे यांनी सांगितले.

२०१५ ते २०२१ पर्यंत वीज पडून झालेले मृत्यूजिल्हा मृत्यू वीजअटकाव यंत्रऔरंगाबाद --- ३८-- ०४जालना -- ४६ -- ०२परभणी -- ३९ -- ०४हिंगोली --- ३१ -- ०२नांदेड -- ९६ -- ०४बीड -- ५२ -- ०६लातूर -- ३८ -- ०४उस्मानाबाद--  २८ -- ०४एकूण --३५७ -- ३०

टॅग्स :Deathमृत्यूMarathwadaमराठवाडाRainपाऊसAurangabadऔरंगाबाद