शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

वातावरणातील अस्थिरता! मराठवाड्यात बारापैकी १० महिने कोसळताहेत विजा; ७ वर्षांत ३५७ मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2022 17:07 IST

पावसाळा तोंडावर आल्यामुळे वीज अटकाव यंत्रांचा मुद्दा ऐरणीवर; मागच्या वर्षी ७५ ठिकाणी पडली होती वीज

- विकास राऊतऔरंगाबाद : मराठवाड्याची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार १ कोटी ८७ लाख २७ हजार ७२८ असून विभागाचे भौगोलिक क्षेत्रफळ ६३.९३ लाख हेक्टर आहे. एवढी लोकसंख्या आणि क्षेत्रफळ असताना फक्त ३० वीजअटकाव यंत्रांवर विभागाची सुरक्षा आहे. अतिवृष्टी आणि पर्यावरणातील बदलामुळे मागील दोन वर्षांपासून बारापैकी दहा महिने विजा कोसळण्याच्या घटनांत नागरिक, जनावरांचा जीव गेला आहे.२०२० साली ५५ तर २०२१ साली वीज पडून ७५ जणांचा मृत्यू झाला. २०१५ पासून २०२१ पर्यंत ३५७ जण वीज पडून दगावले. २०२० साली जानेवारी व डिसेंबर वगळता सर्व महिन्यांत विजा पडल्या तर २०२१ साली डिसेंबर वगळता पूर्ण वर्षभर विजा पडल्या.

पावसाळा तोंडावर आल्यामुळे वीज अटकाव यंत्रांचा मुद्दा ऐरणीवर येतो. दोन वर्षे आपत्ती व्यवस्थापनाची यंत्रणा कोरोना नियंत्रणात गुंतली होती. त्यामुळे पावसाळी आपत्तीकडे विभागीय प्रशासनाने कागदोपत्रीच लक्ष दिले. मागील काही वर्षांतील आढावा घेतला तर विभागात वीज पडण्याचे प्रमाण वाढत आहे. वीज पडून मृत्यू होण्याचा आकडा वाढतोच आहे.

का पडताहेत मराठवाड्यावर विजा?वातावरणातील अस्थिरतेमुळे क्युमोलोनिंबस ढगांची गर्दी मराठवाड्यावर वाढते आहे. वातावरणातील बदलामुळे हे होत आहे. वड, पिंपळ व इतर देशी झाडे लावून हा बदल रोखणे शक्य आहे. क्युमोलो म्हणजे ऊर्ध्व (वरच्या) दिशेने जाणारे ढग व निंबस म्हणजे पाणी धारण करणारे ढग, यांची वेगाने घुसळण होऊन विद्युत कण तयार होतात, त्यातूनच विजा पडण्याचे प्रमाण वाढते आहे. विभागात जमिनीवरच नव्हे तर ढगांतही वीज वरच्या बाजूने पडत आहेत. यातून सॉफ्ट आणि हार्ड एक्स-रे बाहेर पडून आयनोझायशन होत आहे. यामुळे विजा पडण्याचे प्रमाण वाढत आहे. या सगळ्या वातावरणीय बदलांमुळे मराठवाडा ढगफुटीचा प्रदेश होत असल्याचे क्युमोलोनिंबसवर अभ्यास करणारे तज्ज्ञ प्रा. किरणकुमार जोहरे यांनी सांगितले.

२०१५ ते २०२१ पर्यंत वीज पडून झालेले मृत्यूजिल्हा मृत्यू वीजअटकाव यंत्रऔरंगाबाद --- ३८-- ०४जालना -- ४६ -- ०२परभणी -- ३९ -- ०४हिंगोली --- ३१ -- ०२नांदेड -- ९६ -- ०४बीड -- ५२ -- ०६लातूर -- ३८ -- ०४उस्मानाबाद--  २८ -- ०४एकूण --३५७ -- ३०

टॅग्स :Deathमृत्यूMarathwadaमराठवाडाRainपाऊसAurangabadऔरंगाबाद