शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

कंत्राटदार बदलले तरीही 'औरंगाबाद-जळगाव' रस्त्याचे काम अद्याप ठप्प 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2019 19:50 IST

पाठपुरावा करणाऱ्या अभियंत्यांच्या टीमची बदली

ठळक मुद्देरस्त्याचे काम सुरू होऊन १६ महिने झाले आहेत. १६ महिन्यांत २० टक्केदेखील काम पूर्ण झालेले नाही.

औरंगाबाद : जगप्रसिद्ध अजिंठा लेण्यांकडे जाणारा औरंगाबाद ते जळगाव या रस्त्याचे चौपदरीकरण होण्यासाठी अजून दीड वर्षाचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे लेणीप्रेमी पर्यटकांना दीड वर्ष लांब पल्ल्यावरून प्रवास करीत लेण्यांकडे जाण्याचा त्रास सहन करावा लागणार आहे. 

अवसायनात निघालेल्या आंध्र प्रदेशाच्या ऋत्विक एजन्सी या कंत्राटदार कंपनीने नॅशनल हायवे विभागाला हात दिल्यामुळे हा सगळा प्रकार घडला असून, सर्व स्तरातून ओरड सुरू झाल्यानंतर विभागाने तीन कंत्राटदार या कामासाठी नेमले आहेत. रस्त्याचे काम सुरू होऊन १६ महिने झाले आहेत. १६ महिन्यांत २० टक्केदेखील काम पूर्ण झालेले नाही. कामाची एवढी संथगती असताना प्रशासकीय यंत्रणेला मुंबईतील मुख्यालयाला  आदेशाविना काहीही करता आले नाही. परिणामी पर्यटक, नागरिक, प्रशासकीय कर्मचारी, शेतकऱ्यांसह एस. टी. महामंडळाला त्या रस्त्यामुळे मोठे नुकसान सहन करावे लागले. आणखी दीड वर्ष रस्त्याचे काम पूर्ण होणार नसल्यामुळे नागरिकांच्या होणाऱ्या हालअपेष्टांना व अपघाताना कोण जबाबदार राहणार, असा प्रश्न आहे. ऋत्विक एजन्सीवर मोठ्या प्रमाणावर कर्ज आहे. त्याचा परिणाम या कामावर झाल्यामुळे कंत्राटदार कंपनीने साहित्य सोडून येथून काढता पाय घेतला. अधीक्षक अभियंत्यांची बदली दोन महिन्यांत रस्त्याची परिस्थिती चांगली होईल, असा दावा करणारे नॅशनल हायवेचे अधीक्षक अभियंता एल. एस. जोशी यांची बदली मुंबईला झाली . एकतर्फी रस्ता सध्या सुरू आहे. बीटी व काँक्रीटचे काम सुरू आहे. १ हजार कोटींचा हा प्रकल्प आहे. १५ ते १८ महिने तरी काम होण्यासाठी लागतील. रावसाहेब चव्हाण आणि कामटे व अन्य एक, अशा तीन कंत्राटदारांकडे काम आहे. ८० टक्के काम बाकी आहे. कंत्राटदार बदलल्यामुळे एका महिन्यात चांगले परिणाम येण्याची शक्यता असतानाच अधीक्षक अभियंता जोशी, उपअभियंता खडलसे यांची बदली झाली आहे. या कामासाठी पाठपुरावा करणारी अधिकाऱ्यांची टीमच बदलून गेल्यामुळे काम आता रामभरोसे आहे.

सव्वावर्षात फक्त २० टक्केच कामपहिल्या टप्प्यात ३०४ कोटी, दुसऱ्या टप्प्यात २५० कोटी तर तिसऱ्या टप्प्यात ३१६ कोटी, अशी त्या रस्त्याच्या कामासाठी तरतूद करण्यात आली होती. पूर्वी ३०० कोटींच्या आसपास कंत्राट होते. त्यात ७०० कोटींची नव्याने वाढीव तरतूद केली. दोन्ही बाजूंनी साडेसात मीटर रुंद व मध्यवर्ती भागात दुभाजकासह तो रस्ता काँक्रिटीकरणातून करण्याचे नियोजन आहे. ऋत्विक एजन्सीला २० टक्के कामाचा मोबदला मोठ्या प्रमाणात दिला, परंतु तो कंत्राटदार काम करीत नसल्यामुळे त्याच्या जागी दुसरे कंत्राटदार नेमले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादroad safetyरस्ते सुरक्षाfundsनिधीhighwayमहामार्गJalgaonजळगाव