शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

कंत्राटदार बदलले तरीही 'औरंगाबाद-जळगाव' रस्त्याचे काम अद्याप ठप्प 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2019 19:50 IST

पाठपुरावा करणाऱ्या अभियंत्यांच्या टीमची बदली

ठळक मुद्देरस्त्याचे काम सुरू होऊन १६ महिने झाले आहेत. १६ महिन्यांत २० टक्केदेखील काम पूर्ण झालेले नाही.

औरंगाबाद : जगप्रसिद्ध अजिंठा लेण्यांकडे जाणारा औरंगाबाद ते जळगाव या रस्त्याचे चौपदरीकरण होण्यासाठी अजून दीड वर्षाचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे लेणीप्रेमी पर्यटकांना दीड वर्ष लांब पल्ल्यावरून प्रवास करीत लेण्यांकडे जाण्याचा त्रास सहन करावा लागणार आहे. 

अवसायनात निघालेल्या आंध्र प्रदेशाच्या ऋत्विक एजन्सी या कंत्राटदार कंपनीने नॅशनल हायवे विभागाला हात दिल्यामुळे हा सगळा प्रकार घडला असून, सर्व स्तरातून ओरड सुरू झाल्यानंतर विभागाने तीन कंत्राटदार या कामासाठी नेमले आहेत. रस्त्याचे काम सुरू होऊन १६ महिने झाले आहेत. १६ महिन्यांत २० टक्केदेखील काम पूर्ण झालेले नाही. कामाची एवढी संथगती असताना प्रशासकीय यंत्रणेला मुंबईतील मुख्यालयाला  आदेशाविना काहीही करता आले नाही. परिणामी पर्यटक, नागरिक, प्रशासकीय कर्मचारी, शेतकऱ्यांसह एस. टी. महामंडळाला त्या रस्त्यामुळे मोठे नुकसान सहन करावे लागले. आणखी दीड वर्ष रस्त्याचे काम पूर्ण होणार नसल्यामुळे नागरिकांच्या होणाऱ्या हालअपेष्टांना व अपघाताना कोण जबाबदार राहणार, असा प्रश्न आहे. ऋत्विक एजन्सीवर मोठ्या प्रमाणावर कर्ज आहे. त्याचा परिणाम या कामावर झाल्यामुळे कंत्राटदार कंपनीने साहित्य सोडून येथून काढता पाय घेतला. अधीक्षक अभियंत्यांची बदली दोन महिन्यांत रस्त्याची परिस्थिती चांगली होईल, असा दावा करणारे नॅशनल हायवेचे अधीक्षक अभियंता एल. एस. जोशी यांची बदली मुंबईला झाली . एकतर्फी रस्ता सध्या सुरू आहे. बीटी व काँक्रीटचे काम सुरू आहे. १ हजार कोटींचा हा प्रकल्प आहे. १५ ते १८ महिने तरी काम होण्यासाठी लागतील. रावसाहेब चव्हाण आणि कामटे व अन्य एक, अशा तीन कंत्राटदारांकडे काम आहे. ८० टक्के काम बाकी आहे. कंत्राटदार बदलल्यामुळे एका महिन्यात चांगले परिणाम येण्याची शक्यता असतानाच अधीक्षक अभियंता जोशी, उपअभियंता खडलसे यांची बदली झाली आहे. या कामासाठी पाठपुरावा करणारी अधिकाऱ्यांची टीमच बदलून गेल्यामुळे काम आता रामभरोसे आहे.

सव्वावर्षात फक्त २० टक्केच कामपहिल्या टप्प्यात ३०४ कोटी, दुसऱ्या टप्प्यात २५० कोटी तर तिसऱ्या टप्प्यात ३१६ कोटी, अशी त्या रस्त्याच्या कामासाठी तरतूद करण्यात आली होती. पूर्वी ३०० कोटींच्या आसपास कंत्राट होते. त्यात ७०० कोटींची नव्याने वाढीव तरतूद केली. दोन्ही बाजूंनी साडेसात मीटर रुंद व मध्यवर्ती भागात दुभाजकासह तो रस्ता काँक्रिटीकरणातून करण्याचे नियोजन आहे. ऋत्विक एजन्सीला २० टक्के कामाचा मोबदला मोठ्या प्रमाणात दिला, परंतु तो कंत्राटदार काम करीत नसल्यामुळे त्याच्या जागी दुसरे कंत्राटदार नेमले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादroad safetyरस्ते सुरक्षाfundsनिधीhighwayमहामार्गJalgaonजळगाव