शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी १९ इनोव्हा मागवल्या, डिझेल भरायला गेल्या आणि पाणी भरून आल्या...
2
" हा तर गमावलेली राजकीय स्पेस मिळवण्याचा प्रयत्न, यांना मराठी भाषेशी…’’, ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चाची भाजपाकडून खिल्ली
3
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
4
चीनमध्ये गाढवे का गायब होत आहेत? ५८,००० कोटी रुपयांचा व्यवसाय संकटात? काय आहे प्रकरण?
5
Maharashtra Politics : "मला खूप आनंद झाला, सुरुवात चांगली झाली"; ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर मनसे नेत्याने स्पष्टच सांगितलं
6
Rohit Pawar: ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर...; रोहित पवारांचं सूचक ट्वीट!
7
₹२ च्या मजुरीपासून ते ₹२००० कोटींच्या मालक; पद्मश्री मिळवणाऱ्या अकोल्याच्या कल्पना सरोज यांचा कसा होता प्रवास
8
"मराठी माणसाच्या हितासाठी..." मनसे प्रमुख राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन, काय झाला संवाद?
9
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
10
Sonam Raghuvanshi : आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं; राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट
11
नोएल टाटांनी करुन दाखवलं! अशी कामगिरी करणारा टाटा ग्रुप पहिलाच भारतीय ब्रँड; दुसरा-तिसरा कोण?
12
Mumbai: पालकांनो लक्ष द्या! १ जुलैपासून तुमच्या मुलांना घ्यायला व सोडवायला शाळेची बस न येण्याची शक्यता
13
...म्हणून मुलांना जन्म देण्यास टाळाटाळ करताहेत भारतीय जोडपी, समोर आलं धक्कादायक कारण
14
मराठी समाज विभागलाय, मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवण्याची हीच वेळ; सुनील शुक्लानं मांडलं गणित
15
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
16
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
17
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
18
Maratha Reservation Supreme Court: मराठा आरक्षणावर आता जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात सुनावणी
19
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex १५० अंकांनी वधारला; Tata Motors, Reliance, HCL Tech मध्ये तेजी
20
Prada : कोल्हापुरी चप्पलसाठी संभाजीराजे मैदानात; फेसबुक पोस्ट करुन केली मोठी मागणी

वृद्धापकाळात आईला घराबाहेर काढणाऱ्या मुलांना चपराक, मुलींनीच पार पाडले सर्व अंत्यविधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2022 17:42 IST

२५ वर्षांपूर्वी आईला घरातून हाकलून देत वाऱ्यावर सोडलेल्या तीन भावांना संतप्त बहिणींनी अंत्यसंस्कार करू देण्यास नकार देत स्वतः सर्व विधी केले.

- श्यामकुमार पुरेसिल्लोड: तालुक्यातील लिहाखेडी येथील एका ९० वर्षीय महिलेचे वृद्धापकाळाने आज निधन झाले. २५ वर्षांपूर्वी आईला घरातून हाकलून देत वाऱ्यावर सोडलेल्या तीन भावांना संतप्त बहिणींनी अंत्यसंस्कार करू देण्यास नकार देत स्वतः सर्व विधी केले. तिन्ही बहिणींनी अंत्ययात्रा व अंत्यसंस्कार स्वतः करत मृतदेहास अग्निडाग देत आपले कर्तव्य बजावले. वृद्धापकाळात आईकडे दुर्लक्ष करणाऱ्या उच्चपदस्थ मुलांबाबत नागरिक आणि नातेवाईकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

चंद्रभागाबाई आनंदा साखळे (९० वर्ष रा.लिहाखेडी ता.सिल्लोड हल्ली मुक्काम औरंगाबाद ) असे मृत महिलेचे नाव आहे.तर अंत्यसंस्कार पार पाडणाऱ्या मुलींचे नावे सुभद्राबाई श्रीकृष्ण टाकसाळे रा.औरंगाबाद, सुनीता शिवाजी सोने रा.अनवी, जिजाबाई  उत्तम टाकसाळे  रा.कोटनांद्रा, जाऊ छायाबाई शिरसाठ रा.लिहाखेडी ता.सिल्लोड असे आहेत.

चंद्रभागाबाई आनंदा साखळे यांना  तीन मुले आणि तीन मुली आहे. मोठा मुलगा औरंगाबाद येथे कृषी अधिकारी होता तो आता निवृत्त झाला आहे.मधला मुलगा हायकोर्टात क्लर्क आहे. तर लहान मुलगा एका खाजगी  कंपनीत नोकरीला आहे. अतिशय हलाखीच्या परिस्थितीतून तिन्ही मुलांना मोठे केले नोकरीला लावले, पण स्थिर झाल्यानंतर शुद्ध हरपलेल्या या मुलांनी आईस सांभाळायला सपशेल नकार देत घरातून हाकलून दिले. यामुळे औरंगाबाद येथे राहत असलेल्या सुभद्रा व  श्रीकृष्ण टाकसाळे या मुलीने व जावयाने त्यांचा सांभाळ केला. मागील २० वर्षांपासून त्या या मुलीकडे राहत होत्या.

मुली व जावयाने तिन्ही मुलांना अनेक वेळा फोन केला आईची तब्बेत खूप खराब आहे भेटायला या पण ते आले नाही. आईचे निधन झाल्याचे कळल्यावर सुद्धा अगदी शेवटच्या क्षणी दोन भाऊ औरंगाबाद येथे बहिणीच्या घरी आले. आईचे शेवटचे दर्शन न घेता पाहुण्यांसारखे लांब उभे राहिले. सर्वात मोठा मुलगा तर  आईच्या अंतिमसंस्कारसाठी आलाच नाही. हे सर्व पाहून चंद्रभागाबाई यांच्या तिन्ही लेकिंनी, हर्सूल बालाजी नगर परिसरातील सर्व मंडळी तसेच नातलगांनी आईच्या मृतदेहालासुद्धा त्या मुलांना हात लावू देणार नाही असा पावित्रा घेतला. शेवटी जिजाबाई, सुभद्रा व सुनीता ह्या तिन्ही लेकींनी व जाऊ छायाबाई शिरसाठ यांनी सर्व अंतिमसंस्कार पार पाडले.

आयुष्यभर काबाड कष्ट करून मुलांना मोठे केले आज ते चांगल्या हुद्द्यावर कार्यरत आहेत पण सख्या आईच्या म्हातारपणात,आजारपणात  त्यांनी लक्ष दिले नाही. घरातून हाकलून दिले ती आजारी असताना तिला जिवंतपणी भेटायला आले नाही. इतकेच नव्हे तर मोठा मुलगा अंतिमसंस्कारासाठी ही आला नाही अशा निर्दयी  मुलांबद्दल सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. तर मुलगी सुभद्रा  आणि जावई श्रीकृष्ण  टाकसाळे यांनी शेवटच्या क्षणापर्यंत आईच्या केलेल्या सेवेसाठी  त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. अंत्यसंस्कारावेळी माजी उपमहापौर विजय औताडे यांच्या सह परिसरातील नागरिक, नातलग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Deathमृत्यूAurangabadऔरंगाबाद