शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
3
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
4
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
6
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
7
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
8
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
9
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
10
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
11
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
12
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
13
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
14
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
15
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
16
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
17
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
18
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
19
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
20
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार

वृद्धापकाळात आईला घराबाहेर काढणाऱ्या मुलांना चपराक, मुलींनीच पार पाडले सर्व अंत्यविधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2022 17:42 IST

२५ वर्षांपूर्वी आईला घरातून हाकलून देत वाऱ्यावर सोडलेल्या तीन भावांना संतप्त बहिणींनी अंत्यसंस्कार करू देण्यास नकार देत स्वतः सर्व विधी केले.

- श्यामकुमार पुरेसिल्लोड: तालुक्यातील लिहाखेडी येथील एका ९० वर्षीय महिलेचे वृद्धापकाळाने आज निधन झाले. २५ वर्षांपूर्वी आईला घरातून हाकलून देत वाऱ्यावर सोडलेल्या तीन भावांना संतप्त बहिणींनी अंत्यसंस्कार करू देण्यास नकार देत स्वतः सर्व विधी केले. तिन्ही बहिणींनी अंत्ययात्रा व अंत्यसंस्कार स्वतः करत मृतदेहास अग्निडाग देत आपले कर्तव्य बजावले. वृद्धापकाळात आईकडे दुर्लक्ष करणाऱ्या उच्चपदस्थ मुलांबाबत नागरिक आणि नातेवाईकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

चंद्रभागाबाई आनंदा साखळे (९० वर्ष रा.लिहाखेडी ता.सिल्लोड हल्ली मुक्काम औरंगाबाद ) असे मृत महिलेचे नाव आहे.तर अंत्यसंस्कार पार पाडणाऱ्या मुलींचे नावे सुभद्राबाई श्रीकृष्ण टाकसाळे रा.औरंगाबाद, सुनीता शिवाजी सोने रा.अनवी, जिजाबाई  उत्तम टाकसाळे  रा.कोटनांद्रा, जाऊ छायाबाई शिरसाठ रा.लिहाखेडी ता.सिल्लोड असे आहेत.

चंद्रभागाबाई आनंदा साखळे यांना  तीन मुले आणि तीन मुली आहे. मोठा मुलगा औरंगाबाद येथे कृषी अधिकारी होता तो आता निवृत्त झाला आहे.मधला मुलगा हायकोर्टात क्लर्क आहे. तर लहान मुलगा एका खाजगी  कंपनीत नोकरीला आहे. अतिशय हलाखीच्या परिस्थितीतून तिन्ही मुलांना मोठे केले नोकरीला लावले, पण स्थिर झाल्यानंतर शुद्ध हरपलेल्या या मुलांनी आईस सांभाळायला सपशेल नकार देत घरातून हाकलून दिले. यामुळे औरंगाबाद येथे राहत असलेल्या सुभद्रा व  श्रीकृष्ण टाकसाळे या मुलीने व जावयाने त्यांचा सांभाळ केला. मागील २० वर्षांपासून त्या या मुलीकडे राहत होत्या.

मुली व जावयाने तिन्ही मुलांना अनेक वेळा फोन केला आईची तब्बेत खूप खराब आहे भेटायला या पण ते आले नाही. आईचे निधन झाल्याचे कळल्यावर सुद्धा अगदी शेवटच्या क्षणी दोन भाऊ औरंगाबाद येथे बहिणीच्या घरी आले. आईचे शेवटचे दर्शन न घेता पाहुण्यांसारखे लांब उभे राहिले. सर्वात मोठा मुलगा तर  आईच्या अंतिमसंस्कारसाठी आलाच नाही. हे सर्व पाहून चंद्रभागाबाई यांच्या तिन्ही लेकिंनी, हर्सूल बालाजी नगर परिसरातील सर्व मंडळी तसेच नातलगांनी आईच्या मृतदेहालासुद्धा त्या मुलांना हात लावू देणार नाही असा पावित्रा घेतला. शेवटी जिजाबाई, सुभद्रा व सुनीता ह्या तिन्ही लेकींनी व जाऊ छायाबाई शिरसाठ यांनी सर्व अंतिमसंस्कार पार पाडले.

आयुष्यभर काबाड कष्ट करून मुलांना मोठे केले आज ते चांगल्या हुद्द्यावर कार्यरत आहेत पण सख्या आईच्या म्हातारपणात,आजारपणात  त्यांनी लक्ष दिले नाही. घरातून हाकलून दिले ती आजारी असताना तिला जिवंतपणी भेटायला आले नाही. इतकेच नव्हे तर मोठा मुलगा अंतिमसंस्कारासाठी ही आला नाही अशा निर्दयी  मुलांबद्दल सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. तर मुलगी सुभद्रा  आणि जावई श्रीकृष्ण  टाकसाळे यांनी शेवटच्या क्षणापर्यंत आईच्या केलेल्या सेवेसाठी  त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. अंत्यसंस्कारावेळी माजी उपमहापौर विजय औताडे यांच्या सह परिसरातील नागरिक, नातलग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Deathमृत्यूAurangabadऔरंगाबाद