शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
5
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
6
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
7
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
8
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
9
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
10
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
11
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
12
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
13
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
14
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
15
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
16
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
17
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  
18
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
19
सोनं खरं आहे खोटं घरबसल्या चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
20
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध

वृद्धापकाळात आईला घराबाहेर काढणाऱ्या मुलांना चपराक, मुलींनीच पार पाडले सर्व अंत्यविधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2022 17:42 IST

२५ वर्षांपूर्वी आईला घरातून हाकलून देत वाऱ्यावर सोडलेल्या तीन भावांना संतप्त बहिणींनी अंत्यसंस्कार करू देण्यास नकार देत स्वतः सर्व विधी केले.

- श्यामकुमार पुरेसिल्लोड: तालुक्यातील लिहाखेडी येथील एका ९० वर्षीय महिलेचे वृद्धापकाळाने आज निधन झाले. २५ वर्षांपूर्वी आईला घरातून हाकलून देत वाऱ्यावर सोडलेल्या तीन भावांना संतप्त बहिणींनी अंत्यसंस्कार करू देण्यास नकार देत स्वतः सर्व विधी केले. तिन्ही बहिणींनी अंत्ययात्रा व अंत्यसंस्कार स्वतः करत मृतदेहास अग्निडाग देत आपले कर्तव्य बजावले. वृद्धापकाळात आईकडे दुर्लक्ष करणाऱ्या उच्चपदस्थ मुलांबाबत नागरिक आणि नातेवाईकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

चंद्रभागाबाई आनंदा साखळे (९० वर्ष रा.लिहाखेडी ता.सिल्लोड हल्ली मुक्काम औरंगाबाद ) असे मृत महिलेचे नाव आहे.तर अंत्यसंस्कार पार पाडणाऱ्या मुलींचे नावे सुभद्राबाई श्रीकृष्ण टाकसाळे रा.औरंगाबाद, सुनीता शिवाजी सोने रा.अनवी, जिजाबाई  उत्तम टाकसाळे  रा.कोटनांद्रा, जाऊ छायाबाई शिरसाठ रा.लिहाखेडी ता.सिल्लोड असे आहेत.

चंद्रभागाबाई आनंदा साखळे यांना  तीन मुले आणि तीन मुली आहे. मोठा मुलगा औरंगाबाद येथे कृषी अधिकारी होता तो आता निवृत्त झाला आहे.मधला मुलगा हायकोर्टात क्लर्क आहे. तर लहान मुलगा एका खाजगी  कंपनीत नोकरीला आहे. अतिशय हलाखीच्या परिस्थितीतून तिन्ही मुलांना मोठे केले नोकरीला लावले, पण स्थिर झाल्यानंतर शुद्ध हरपलेल्या या मुलांनी आईस सांभाळायला सपशेल नकार देत घरातून हाकलून दिले. यामुळे औरंगाबाद येथे राहत असलेल्या सुभद्रा व  श्रीकृष्ण टाकसाळे या मुलीने व जावयाने त्यांचा सांभाळ केला. मागील २० वर्षांपासून त्या या मुलीकडे राहत होत्या.

मुली व जावयाने तिन्ही मुलांना अनेक वेळा फोन केला आईची तब्बेत खूप खराब आहे भेटायला या पण ते आले नाही. आईचे निधन झाल्याचे कळल्यावर सुद्धा अगदी शेवटच्या क्षणी दोन भाऊ औरंगाबाद येथे बहिणीच्या घरी आले. आईचे शेवटचे दर्शन न घेता पाहुण्यांसारखे लांब उभे राहिले. सर्वात मोठा मुलगा तर  आईच्या अंतिमसंस्कारसाठी आलाच नाही. हे सर्व पाहून चंद्रभागाबाई यांच्या तिन्ही लेकिंनी, हर्सूल बालाजी नगर परिसरातील सर्व मंडळी तसेच नातलगांनी आईच्या मृतदेहालासुद्धा त्या मुलांना हात लावू देणार नाही असा पावित्रा घेतला. शेवटी जिजाबाई, सुभद्रा व सुनीता ह्या तिन्ही लेकींनी व जाऊ छायाबाई शिरसाठ यांनी सर्व अंतिमसंस्कार पार पाडले.

आयुष्यभर काबाड कष्ट करून मुलांना मोठे केले आज ते चांगल्या हुद्द्यावर कार्यरत आहेत पण सख्या आईच्या म्हातारपणात,आजारपणात  त्यांनी लक्ष दिले नाही. घरातून हाकलून दिले ती आजारी असताना तिला जिवंतपणी भेटायला आले नाही. इतकेच नव्हे तर मोठा मुलगा अंतिमसंस्कारासाठी ही आला नाही अशा निर्दयी  मुलांबद्दल सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. तर मुलगी सुभद्रा  आणि जावई श्रीकृष्ण  टाकसाळे यांनी शेवटच्या क्षणापर्यंत आईच्या केलेल्या सेवेसाठी  त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. अंत्यसंस्कारावेळी माजी उपमहापौर विजय औताडे यांच्या सह परिसरातील नागरिक, नातलग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Deathमृत्यूAurangabadऔरंगाबाद