शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
5
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
6
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
7
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
8
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
9
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
10
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
11
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
12
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
13
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
14
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
15
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
16
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
17
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
18
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
19
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
20
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन धंदेवाईक; कौतिकराव ठाले पाटील यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 12:20 IST

अलीकडे अखिल भारतीय मराठी साहित्य संमलेनाकडे काही लोक ‘धंदा’ म्हणून पाहू लागले आहेत. ‘समाजसेवा’ या गोंडस नावाच्या आवरणाखाली त्यांचा हा उद्योग चालतो.

ठळक मुद्दे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. कौतिकराव ठाले पाटील यांच्यावर ९४ व्या साहित्य संमेलनाच्या आयोजकांवर नाराजीनाशिक येथील नियोजित ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार की नाही, याविषयी निश्चितपणे सांगता येणार नाही.

- राम शिनगारे

औरंगाबाद : अलीकडील काळात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा वापर काही लोक स्वत:चा फायदा, धंदा किंवा विशिष्ट हेतू साध्य करण्यासाठी करीत असल्याचा खळबळजनक आरोप अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. कौतिकराव ठाले पाटील यांनी केला आहे. ९४ वे साहित्य संमेलन दिल्लीत आयोजित करण्यासाठी आग्रही असलेल्या पुण्यातील एका संस्थेने सुरुवातीला दबाव टाकला. त्याला महामंडळ बळी पडत नाही, असे दिसताच फोनवर पाहून घेण्याची दोन वेळा धमकी दिल्याचा धक्कादायक खुलासाही ठाले पाटील यांनी महामंडळाच्या वार्षिकात केला आहे.

अलीकडे अखिल भारतीय मराठी साहित्य संमलेनाकडे काही लोक ‘धंदा’ म्हणून पाहू लागले आहेत. ‘समाजसेवा’ या गोंडस नावाच्या आवरणाखाली त्यांचा हा उद्योग चालतो. या उद्योगात राजकीय नेत्यांचा ‘राजरोस’ उपयोग करून घेता येतो. किंबहुना तेवढ्यासाठीच शक्यतो परक्या मुलखात साहित्य संमेलनाचा घाट घातला जातो. अशा संमेलनाची इमारत पूर्णपणे ‘अस्मिते’च्या आणि ‘स्वाभिमाना’च्या भावनिक मुद्यांवर उभी केलेली असते. अशी इमारत उभी राहू द्यायची की नाही, हे साहित्य महामंडळाच्या निर्णयावर अवलंबून असते. संत नामदेवांच्या नावाखाली पंजाबमध्ये घुमानला सात वर्षांपूर्वी झालेले संमेलन महाराष्ट्रातून माणसे नेऊन साजरे केले. ज्या गावात संमेलन झाले त्या गावात एकही मराठी माणूस नसताना निव्वळ पर्यटनासाठी आणि तेथे डझनभर केंद्रीय, दोन्ही राज्यांचे मंत्री जमवून कौतुक सोहळा करून घेतला होता. त्या संमेलनालाही माझा व्यक्तिश: विरोध होता. तेव्हा संमेलनाला विरोध म्हणजे संत नामदेवांना विरोध, असा भावनिक मुद्दा पुढे आला. तेव्हा माघार घ्यावी लागली. मात्र आपल्या कार्यकाळात अशा गोष्टींना बळी न पडण्याचा निश्चय केला होता.

९४ वे साहित्य संमेलन दिल्लीत आयोजित करण्यासाठी पुण्यातील एका संस्थेने निमंत्रण दिले होते. त्या संस्थेला संमेलन महाराष्ट्रदिनी भरवून हीरक महोत्सव साजरा करायचा होता. यातून मराठी माणसाचा आवाज उत्तर भारतीय आणि दिल्लीकरांना दाखवायचा, तसेच संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार यांना करून दिल्लीत त्यांना ‘मोठे’ करायचे होते. यासाठी त्या संस्थेचे अध्यक्ष वारंवार फोनवर काय काय सांगत होते. त्यासाठी कोणाकोणाची नावे फोनवर घेत होते. विठ्ठल मणियार हे कोण व कुठले माहिती नसताना त्यांचे सतत नाव घेतले जात होते. यासाठी विविध प्रसारमाध्यमांतून बातम्याही पेरण्यात येत होत्या. शरद पवार यांच्या नावाने तद्दन खोट्या आणि कल्पित बातम्याही छापून आणल्या जात होत्या. यातून संबंधितांना शरद पवार कळलेच नसल्याचे माझे निरीक्षण आहे. शेवटी कोरोना कमी झाल्यावर महामंडळाच्या बैठकीत ९४ वे नियोजित संमेलन नाशिक येथे घेण्याचे निश्चित झाले. तेव्हा त्या संस्थेच्या अध्यक्षाने दुसऱ्याचे नाव सांगून चक्क बघून घेण्याची धमकी दिली. यातून त्यांचा हेतू शुद्ध नव्हता हे स्पष्ट झाल्याचेही ठाले पाटील यांनी स्पष्ट केले.

आमदार निधी नको, लोकवर्गणी हवीनाशिक येथील लोकहितवादी मंडळाचे ९४ साहित्य संमेलन आयोजनाचे निमंत्रण महामंडळाने स्वीकारले. तेव्हा सरकारकडून ५० लाख रुपयांचे अनुदान मिळण्याची शक्यता नसून, १६ ते १७ लाख रुपये मिळतील असे लक्षात आणून दिले. काटकसर करून संमेलन केल्यास खर्च जास्त येणार नसल्याचेही स्पष्ट केले. आयोजकांनी छगन भुजबळ यांना स्वागताध्यक्ष केले. त्यानंतर निधीसंकलनाचा भार त्यांच्यावर टाकला. त्यांनी सरकारकडून ५० लाख मिळविले. तसेच नाशिक जिल्ह्यातील आमदारांकडून आमदार निधी जमा केला. हे पूर्णत: चुकीचे आहे. राज्य शासन ५० लाख रुपये मदत करते, आमदार निधीही राज्य शासनाचाच असतो. त्यामुळे नाशिकच्या आयोजकांनी निधीसाठी लोकवर्गणीचा मार्ग अनुसरणे योग्य होते. मात्र त्यांनी सर्व भार स्वागताध्यक्षांवर टाकला हे चुकीचे असल्याचे कौतिकराव ठाले म्हणाले.

संमेलनाचे आयोजन निश्चित नाहीनाशिक येथील नियोजित ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार की नाही, याविषयी निश्चितपणे सांगता येणार नाही. कोरोनाची तिसरी लाट येणार का? सध्या कोरोनाचे रुग्ण कमी होत आहेत का? हे पाहणे आवश्यक आहे. संमेलन रद्द करायचे की घ्यायचे याविषयीचा निर्णय महामंडळाच्या बैठकीत होईल, असेही ठाले पाटील यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :akhil bharatiya marathi sahitya mahamandalअखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळAurangabadऔरंगाबादmarathiमराठी