शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
3
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
4
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
5
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
6
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
7
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
8
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
9
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
10
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
11
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
12
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
13
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
14
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
15
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
16
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
17
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
18
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
19
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
20
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...

सावरकरांबद्दल मनात आदर असेल तर त्यांना भारतरत्न द्या; अजित पवारांचे भाजपला आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2023 20:19 IST

'तुमचे नेते महापुरुषांचा अपमान करतात, तुम्ही त्यांना काही बोलत नाही.'

छत्रपती संभाजीनगर- छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा झाली. सभेला उद्धव ठाकरे, अजित पवार, नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांच्यासह आघाडीचे अनेक नेते उपस्थित आहेत. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी राज्यातल्या सरकारवर सडकून टीका केली. तसेच, त्यांनी सावरकर गौरव यात्रेवरुनही सरकारला थेट आव्हान दिले. 

यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांवरही टीका केली. ते म्हणाले, मराठवाडा साधू-संतांची भूमी आहे. मराठवाड्याने राज्याला पुढे नेण्यासाठी कार्य केले आहे. देश स्वातंत्र्य झाला, पण मराठवाडा स्वातंत्र्य व्हायला 13 महिने लागले. याच मराठवाड्याच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्र्यांनी फक्त 13 मिनिटे दिली. मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या लढ्याबाबत अधिवेशनात वेळ द्यायला हवा, अशी आमची भूमिका होती. देशाच्या स्वातंत्र्याप्रमाणे या कार्यक्रमालाही वेळ दिला पाहिजे. पण, मुख्यमंत्र्यांनी त्यासाठी वेळ दिला नाही, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. 

तुम्ही स्वतःला सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री म्हणवता आणि मराठवाड्यातील जनतेचा अपमान करता. राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा, सावित्रीबाईं फुलेंचा अपमान केला. तुम्ही त्यांना काहीही म्हटले नाही. तुमच्या नेत्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा, भाऊराव पाटलांचा अपमान केला. आम्हाला सगळ्या महापुरुषांबद्दल आदर आहे. त्यांनी काम केले म्हणून आपण आज हे दिवस पाहतोय. तुम्ही तुमच्या नेत्यांना काहीच बोलणार नाहीत. 

मध्यंतरी काही घटना घडल्या, सावरकरांच्या बाबतीत बोललं गेलं. यानंतर वडिलकीच्या नात्याने मान्यवरांनी त्यांची समजूत घातली आणि प्रकरण शांत केले. त्यानंतरही तुमचे नेते गौरवर यात्रा काढत आहेत. यात्रा काढण्यासाठी विरोध नाही, पण त्यात राजकारण आहे. सावरकरांबद्दल आम्हालाही आदर. तुमच्या मनात खरचं आदर असेल तर त्यांना भारतरत्न द्या, असेही अजित पवार यावेळी म्हणाले.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसUddhav Thackerayउद्धव ठाकरेAurangabadऔरंगाबादBJPभाजपा