शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
3
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
4
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
5
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
6
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
7
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
8
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
9
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
10
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
11
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
12
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
13
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
14
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
15
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
16
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
17
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
18
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
19
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
20
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा जाती पातीची जुनीच समीकरणे जुळविण्याचा प्रयत्न

By admin | Updated: October 6, 2014 00:12 IST

जालना : धर्मनिरपेक्षतेचा उदो-उदो करणाऱ्या राजकीय पक्षांनी या निवडणुकीत धर्मासह जाती-पातीची समिकरणे जुळविण्याचा अटोकाट प्रयत्न सुरू केला आहे.

जालना : धर्मनिरपेक्षतेचा उदो-उदो करणाऱ्या राजकीय पक्षांनी या निवडणुकीत धर्मासह जाती-पातीची समिकरणे जुळविण्याचा अटोकाट प्रयत्न सुरू केला आहे. प्रत्येक सार्वत्रिक निवडणुकीत धर्मासह जाती-पातीची समिकरणे प्रभावी ठरली आहेत. याही निवडणुकीत तीच पारंपारिक समिकरणे महत्वपूर्ण व निर्णाय ठरणार, हे स्पष्ट आहे. त्यामुळेच निवडणूक रिंगणातील शिवसेना, भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने हिच समिकरणे जुळविण्यावरच लक्ष केंद्रीत केले आहे. विशेषत: आपली पारंपारिक व्होट बँके अबाधित रहावी यासाठी शिवसेना व भाजपने पद्धतशीरपणे प्रयत्न सुरू केले आहेत. ‘हिंदूत्वाची व्होट बँक’ एक गठ्ठा मिळावी म्हणून डावपेच रंगले आहेत. ब्राह्मण, मारवाडी, जैन, सुवर्णकार या समाजातील बहुतांश मतदार आपल्याच पाठीशी रहावा म्हणून हे दोन्हीही अलकडचे मित्र मोर्चेबांधणीत दंग आहेत. या दोन्ही पक्षांना व्होट बँकेत मत विभागणी होणार याची धास्ती आहे. त्यामुळेच ते युद्ध पातळीवर मोहिमा राबवित आहेत. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्यात हात घालून काँग्रेस व राष्ट्रवादीने बहुतांशी मतदान पदरात पाडण्यासाठी डावपेच लढविण्यास सुरूवात केली आहेत. घनसावंगी, परतूर या दोन मतदार संघात मराठा समाजाच्या मतांची मोठी विभागणी होईल याची धास्ती प्रमुख उमेदवारांना बसली आहे. त्यामुळेच ते अन्य म्हणजे ओबीसी समाजही पाठीशी रहावा म्हणून फिल्डींग लावत आहेत. काँग्रेस आघाडीचे उमेदवार पाचही मतदार संघात या निवडणूकीत काँग्रेसची पारंपारिक असणारी दलित-मुस्लिमांची व्होट बँक खंबीरपणे पाठीशी रहावी म्हणून, मोठे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी या उमेदवारांनी विशेष बैठका घेतल्या. स्थानिक पुढाऱ्यांसह कार्यकर्त्यांबरोबर हितगूज केले. निवडणूक रिंगणात उतरलेल्या अन्य उमेदवारांचा आपल्या व्होट बँकेवर प्रभाव पडू नये म्हणून खबरदार घ्यावयास सुरुवात केली. जालन्यातून कैलास गोरंट्याल, परतूरमधून आ. सुरेश जेथलिया यांनी यासाठी अथक प्रयत्न सुरु केले आहेत. तर राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे यांनी घनसावंगीतून आ. चंद्रकांत दानवे यांनी भोकरदनमधून दलित- मुस्लिममते पदरात पडावी म्हणून हालचाली गतीमान केल्या आहेत.शहरी व ग्रामीण भागात मतांची विभागणी अटळ आहे. कारण दुरंगी ऐवजी चौरंगी, पंचरंगी होणार आहे. यात मात्तबर प्रतिस्पर्धी उमेदवारांनी विविध धर्म व जातींच्या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांबरोबर हितगूज सुरू केले आहे. मत विभागणी टळावी हाच उद्देश आहे. तसेच त्यातील काहींना स्वत:कडे वळवून प्रचार यंत्रणेत सामावून घेतले आहे. वेगवेगळ्या भागात त्या-त्या समाजाचे प्राबल्य ओळखून हे उमेदवार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना जाणीवपूर्वक समोर करू लागले आहेत. विशेषत: सभा-संमेलनातून या साऱ्यांना भाषणाची संधी दिली जात आहे. (प्रतिनिधी)