गारपीटग्रस्तांसाठी ८८ कोटी प्राप्त

By Admin | Updated: May 23, 2014 00:21 IST2014-05-22T23:56:03+5:302014-05-23T00:21:46+5:30

उस्मानाबाद : जिल्ह्यातील गारपीटग्रस्त शेतकर्‍यांच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने १९१ कोटी ८५ लाख ८७ हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती.

88 Crore received for hailstorms | गारपीटग्रस्तांसाठी ८८ कोटी प्राप्त

गारपीटग्रस्तांसाठी ८८ कोटी प्राप्त

उस्मानाबाद : जिल्ह्यातील गारपीटग्रस्त शेतकर्‍यांच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने १९१ कोटी ८५ लाख ८७ हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. मागणीच्या तुलनेत पहिल्या व दुसर्‍या टप्प्यात जिल्ह्याला ९८ कोटी ५० लाख रुपये प्राप्त झाले होते. उर्वरित तिसर्‍या टप्प्यातील ८८ कोेटी ७५ लाख रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाला सोमवारी प्राप्त झाला आहे. जिल्ह्यात २२ फेब्रुवारी ते २ मार्च या कालावधीत वादळी वार्‍यासह अवकाळी पाऊस व गारपीट झाली. त्यामुळे गहू, हरभरा, रब्बी पिके, संत्री, आंबा, द्राक्ष आदी फळपिकांसह भाजीपाल्यांचे प्रचंड नुकसान झाले. काढणीला आलेल्या पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने, जिल्ह्यातील शेतकरी हतबल झाला. जिल्ह्यातील आठ तालुक्यातील जिरायत पिकाखाली १ लाख ५५ हजार ७८० हेक्टर, बागायत पिकाखालील १५ हजार ३०७ तर फळ पिकाखालील ५ हजार २४७.२९ हेक्टरवर असे एकूण १ लाख ७६ हजार ३३४.२९ हेक्टवरील क्षेत्राचे नुकसान झाले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या पीक नुकसान भरपाईपोटी शासनाकडे १९७ कोटी ८५ लाख ८७ हजार रुपये निधीची मागणी करण्यात आली होती. त्यात शासनाने पहिल्या टप्प्यात ४३ कोेटी तर दुसर्‍या टप्प्यात ५३ कोटी ५० लाख असा एकूण ९८ कोटी ५० लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. उर्वरित ८८ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला असून राहिलेला चार कोटी रुपयांचा निधी लवकरच प्राप्त होणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. दरम्यान, गारपीटग्रस्त शेतकर्‍यांना शासनाकडून नुकसान भरपाई दिली जात असली तरी पन्नास टक्क्यांपेक्षा कमी नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना यातून वगळण्यात आले आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. (प्रतिनिधी)भूम : तालुक्यात झालेली गारपीट व सोयाबीन पिकाला शासनाच्या वतीने दिले जाणारे अनुदान वाटपामध्ये जिल्हा बँकेकडून अडवणूक होत असल्याची तक्रार राष्टÑीय समाज पार्टीने उपविभागीय अधिकार्‍यांकडे केली आहे. भूम तालुक्यातील शेतकर्‍यांनी जिल्हा बँककडे अनुदान मिळण्यासाठी दिवस दिवस थांबावे लागते. परंतु संगणकाच्या बाबी पुढे करत दिवस ढकलत असून शेतकरी अनुदानापासून वंचित राहत आहे. याप्रश्नी बेमुदत उपोषण करणार असल्याचे तालुकाध्यक्ष पंडित मारकड व माजी जिल्हा उपाध्यक्ष रघुनाथ वाघमोडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Web Title: 88 Crore received for hailstorms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.