शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
2
तो माझा बाप हीच चूक, तिथेच ठेचून मारले पाहिजे; नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नी-मुलाचा संताप
3
Iran War: Iran War: अमेरिकेचे होर्मुझ सामुद्रधुनीत जहाजांवर हल्ले, पाच जणांचा मृत्यू; दोन जहाजे काढली बाहेर
4
नसरापूरमधील ‘त्या’ बालिकेच्या पोस्टमार्टेम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती आली समोर, नराधमाने…
5
KVP Investment Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम, १ लाखांचे होतील २ लाख; 'इतक्या' महिन्यांमध्ये रक्कम होईल डबल
6
भाजपानं दिली संधी, आयुष्याला मिळाली कलाटणी; धुणं-भांडी, घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार
7
मेट गालामध्ये करण जोहरचं पदार्पण, भारतीय संस्कृतीची झलक दाखवणारा पेहराव; लूकचं वैशिष्ट्य काय?
8
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
9
KKR चा वेगवान गोलंदाज दुसऱ्यांदा बनला आमदार; IPL पदार्पणातच किंग कोहलीचा त्रिफळा उडवला होता
10
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
11
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
12
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
13
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
14
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
15
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
16
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
17
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
18
हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
19
खेला होलो! बंगालमध्ये अखेर 'कमळ' फुलले! 'टीव्हीके'च्या रूपाने तामिळनाडूला मिळाला नवा नायक
20
दुर्मीळ ‘राजकीय स्टार्टअप’ ते बनला थेट ‘युनिकॉर्न’! देशातील फारच कमी पक्ष अल्पावधीतच ठरले यशस्वी
Daily Top 2Weekly Top 5

८७० शेतकरी गारपीट मदतीपासून वंचित

By admin | Updated: July 16, 2014 01:25 IST

येणेगूर : उमरगा तालुक्यातील ९६ पैकी ९५ गावातील शेतकऱ्यांना गारपिटीचे अनुदान वाटप करण्यात आले़

येणेगूर : उमरगा तालुक्यातील ९६ पैकी ९५ गावातील शेतकऱ्यांना गारपिटीचे अनुदान वाटप करण्यात आले़ मात्र, अल्फाबेटीकल धोरणात शेवटच्या कडेला असलेल्या (वाय अक्षर) येणेगूर गावातील तब्बल ८७० लाभार्थी शेतकरी अद्यापही या अनुदानापासून वंचित आहेत़रबी हंगामात तब्बल १२ दिवस येणेगूर व परिसरात गारपीट, अवकाळी पाऊस, वादळी वाऱ्यामुळे ज्वारी, गहू, हरभरा आदी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले़ पिके काळी पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले़ पंचनाम्यानंतर तालुक्यातील सर्व गावांना अनुदानासाठी पात्र ठरविण्यात आले़ येणेगूर येथील जिल्हा बँकेच्या शाखेतून शेजारच्या ९ गावातील शेतकऱ्यांना अनुदान वाटप करण्यात आले़ मात्र, येणेगूर येथील ८७० शेतकरी अद्यापही अनुदानापासून वंचित आहेत़ ८७० हेक्टरवरील रबी पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांची आर्थिक घडी कोलमडली आहे़ शेतकरी बँकेत चकरा मारून थकले असून, अल्फाबेटीकली नाव अखेरच्या टप्प्यात असल्याने अनुदान आलेले नाही, शेवटी वाटप होईल, असे सांगण्यात येत आहे़ खरिप पेरणीच्या दिवसात अनुदानाचेही पैसे मिळत नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत़ (वार्ताहर)निधीची मागणी केली आहेयेणेगूर गावाचे नाव अल्फाबेटीकली अखेरच्या टप्प्यात आहे़ त्यामुळे अनुदान वाटपास विलंब होत आहे़ जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अनुदानाची मागणी केली असून, ते उपलब्ध होताच शेतकऱ्यांना अनुदान वाटप करण्यात येईल, असे उमरग्याचे तहसीलदार उत्तमराव सबनीस यांनी सांगितले़...तर उपोषण करणारखरिपाची पेरणी सुरू असल्याने सर्वच शेतकऱ्यांना पैशाची गरज आहे़ मात्र, अल्फाबेटीकली नावामुळे गावातील शेतकऱ्यांना अद्याप अनुदान मिळालेले नाही़ पेरणीचा हंगाम पाहता शेतकऱ्यांना त्वरित अनुदानाचे पैसे उपलब्ध करून द्यावे, अन्यथा आम्हाला उपोषणाचा मार्ग अवलंबवावा लागेल, असे शेतकरी धनराज पाटील यांनी सांगितले़