शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
3
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
4
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
5
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
6
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
7
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
8
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
9
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
11
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
12
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
13
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
14
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
15
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
16
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
17
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
18
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
19
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
20
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही

रौप्यमहोत्सवी वर्षातच ७३ व्या घटनादुरुस्तीला तिलांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 20:43 IST

विश्लेषण : राज्य सरकारकडील अधिकारांचे विकेंद्रीकरण करून जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतींना अधिकाधिक अधिकार देण्यात आले.

- विजय सरवदे

२४ एप्रिल १९९३ रोजी भारताच्या संसदेने ७३ व्या घटनादुरुस्तीचा ऐतिहासिक निर्णय घेतला. पंचायतराज व्यवस्था अधिक बळकट झाली. पंचायतराज संस्थांना अधिक अधिकार प्राप्त झाले. ग्रामीण भागात समाजातील शेवटच्या घटकापर्यंत सरकारी योजनांचा लाभ मिळण्याचा मार्ग सुलभ झाला; परंतु ७३ व्या घटनादुरुस्तीच्या रौप्यमहोत्सवी वर्षातच राज्य सरकारने पंचायतराज संस्थांचे पंख छाटण्याचे काम सुरू केले. जिल्हा परिषदेला देण्यात आलेले अनेक अधिकार काढून घेण्यात आले, हे दुर्दैवच म्हणावे लागेल!

राज्य सरकारकडील अधिकारांचे विकेंद्रीकरण करून जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतींना अधिकाधिक अधिकार देण्यात आले. या माध्यमातून जिल्हा परिषदेकडे राज्याचे २९ विभाग हस्तांतरित करण्याचा निर्णयही झाला होता; परंतु आजपर्यंत अवघे १४ विभाग जिल्हा परिषदेकडे देण्यात आले. आणखी १५ विभागांचा कारभार येण्याअगोदरच जिल्हा परिषदेच्या अधिकारांवर घाला घालण्याचे काम सुरू झाले. ६ आॅक्टोबर २०१८ रोजी एक शासन निर्णय जारी झाला. त्याद्वारे जिल्हा परिषदेमार्फत ग्रामीण मार्ग व इतर जिल्हा मार्ग मजबुतीकरणाची कामे करण्याचा अधिकार शासनाने काढून घेतला. जिल्हा नियोजन समितीमार्फत लेखाशीर्ष ३०५४ व ५०५४ अन्वये जिल्हा परिषदांना दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी मिळायचा. या लेखाशीर्षअंतर्गत मिळणाºया निधीतून अलीकडे रस्ते दुरुस्तीसाठी सर्वाधिक खराब रस्त्यांचा प्राधान्यक्रमही निश्चित करण्यात आला होता. जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीमार्फत प्राधान्यक्रमानुसार (पीसीआय इंडेक्स) सर्कलनिहाय निधीचे वाटप केले जात होते. औरंगाबाद जिल्हा परिषदेला यंदा या दोन्ही लेखाशीर्षखाली ५० कोटी रुपयांचा निधी मिळालेला आहे. मात्र, ६ आॅक्टोबरच्या शासन निर्णयानुसार आता रस्ते दुरुस्तीची कामे जिल्हा परिषदेऐवजी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समिती ठरवील तीच यंत्रणा करील. 

या समितीमध्ये दोन आमदार, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आदींचा समावेश आहे. पंचायतराज संस्थांना यातून वगळण्यात आले. खºया अर्थाने या समितीमध्ये जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष किंवा बांधकाम सभापतींचा समावेश करणे योग्य होते; पण त्यांना टाळण्यात आले. यापूर्वीही ३०५४, ५०५४ लेखाशीर्षअंगर्तत रस्ते मजुबतीकरणासाठी जिल्हा परिषदेला मिळालेल्या निधीवर आमदार-खासदारांचा डोळा होता. जवळपास जिल्हा परिषदेच्या वाट्याला आलेल्या अर्धा निधी मिळविण्यासाठी आमदार-खासदारांनी शिफारसी केलेल्या आहेत. राजकीय दबावापोटी अधिकाºयांचा नाइलाज होतो. अध्यक्ष-सभापतीदेखील इच्छा नसताना निधी देण्यास संमती देतात. विरोधी पक्षांकडून यासंदर्भात आता कुठे दंड थोपटायला सुरुवात झाली होती, तोच या निधीतून केल्या जाणाºया कामांचे अधिकारच जिल्हा परिषदेकडून काढून घेण्यात आले. 

जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाचीही तीच गत झाली आहे. या विभागाकडे असलेले कृषी सेवा केंद्र परवाने, बियाणे विक्री परवाना, कीटकनाशक विक्री परवाने, साठा परवाना, कृषी अभियांत्रिकी योजना राज्याच्या कृषी विभागाकडे देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. अपारंपरिक ऊर्जास्रोत बळकटीकरण ही योजनाही हस्तांतरित झाली आहे. जिल्हा परिषदेच्या कर्मचाºयांची भरतीदेखील आता शासन करणार आहे. यंदा पहिल्यांदाच शिक्षकांच्या बदल्यादेखील शासन स्तरावरूनच झाल्या आहेत. 

सरकारच्या अशा मनमानी धोरणांविरुद्ध आता पंचायतराज संस्था सदस्यांनी दंड थोपटले आहेत. मनमानी निर्णयाविरुद्ध अनेकांनी न्यायालयात धाव घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत, हे विशेष!

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादzpजिल्हा परिषदState Governmentराज्य सरकार