शहरं
Join us  
Trending Stories
1
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
2
"लाचारीच्या सर्व मर्यादा सोडल्या"; जिरेटोप प्रकरणावरून शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांना फटकारलं!
3
महिन्याभरात २६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या; जयंत पाटलांनी सरकारला धारेवर धरलं
4
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
5
"महिलांच्या कमावण्याच्या नादात वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण"; सईद अन्वरचं वादग्रस्त विधान! VIDEO व्हायरल
6
संजय राऊतांच्या आरोपानंतर मुख्यमंत्र्यांच्या बॅगा तपासल्या; नाशिकमध्ये काय घडलं?
7
Adani Group : अदानींच्या 'या' कंपनीला मोठा झटका, नॉर्वेच्या सर्वात मोठ्या वेल्थ फंडानं केलं ब्लॅकलिस्ट
8
मनोज जरांगे पाटील यांची ८ जून रोजी होणारी सभा रद्द, या दोन कारणांमुळे घेतला निर्णय
9
बाळासाहेबांवर टीका करणाऱ्या अंधारेंना पक्षात का घेतलं?, CM विरोधात लढणार का?; आदित्य ठाकरेंची रोखठोक उत्तरं
10
Fact Check: Video - मुंबईत भाजपाच्या किटमध्ये सोन्याची बिस्किटं सापडली?; जाणून घ्या, 'सत्य'
11
...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी
12
गाडी चालविताना मोबाईल काय साधा कागद जरी हातात जरी पकडला तरी दंड; जाणून घ्या वाहतुकीचा नियम...
13
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
14
Post Officeच्या 'या' स्कीममध्ये PM Modiनी देखील केलीये ९ लाखांची गुंतवणूक, तुम्हालाही मिळेल उत्तम रिटर्न
15
'ड्रग्स पासून दूर राहा', शुभांगी गोखलेंनी लेकीला हात जोडून सांगितलं; ती लंडनला गेल्यावर...
16
कांद्यावरून पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या तरुणाचा मला अभिमान, शरद पवारांचं मोठं विधान
17
ना पाकिस्तान, ना ऑस्ट्रेलिया! ब्रायन लाराने जाहीर केले T20 World Cup चे ४ सेमीफायनलिस्ट
18
दोन्ही पायांनी दिव्यांग, जिद्द नाही सोडली; स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवला हजारो लोकांचा जीव
19
विराट कोहली केव्हा करणार क्रिकेटला 'अलविदा'? रिटायरमेंटच्या प्रश्नावर स्पष्टच बोलला!
20
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका

कडाक्याच्या थंडीत औरंगाबादमध्ये पोलिसांची ७२ तास ड्यूटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2018 12:29 PM

विविध भागांत झालेल्या दगडफेक आणि जाळपोळीच्या घटनांमुळे सोमवारी रात्रीपासून अलर्ट झालेल्या पोलिसांना ७२ तास बंदोबस्तासाठी रस्त्यांवर काढावे लागले. 

औरंगाबाद : कोरेगाव-भीमाच्या घटनेचे सोमवारी सायंकाळपासून शहरात तीव्र पडसाद उमटले आणि बघता बघता तीन दिवस शहर तणावाखाली होते. विविध भागांत झालेल्या दगडफेक आणि जाळपोळीच्या घटनांमुळे सोमवारी रात्रीपासून अलर्ट झालेल्या पोलिसांना ७२ तास बंदोबस्तासाठी रस्त्यांवर काढावे लागले. 

संवेदनशील आणि चळवळीचे शहर म्हणून ओळखल्या जाणार्‍या औरंगाबादेत सोमवारी सायंकाळपासून कोरेगाव-भीमा येथील घटनेचे तीव्र पडसाद उमटण्यास सुरुवात झाली. पीरबाजार, उस्मानपुरा येथून हजाराहून अधिक लोकांनी निषेध मोर्चा काढून क्रांतीचौक गाठले. अचानक रस्त्यावर आलेल्या या मोर्चेकर्‍यांना परवानगी नाकारली आणि तेथील एका शोरूमवर पहिला दगड फेकण्यात आला अन् तणावाला सुरुवात झाली. उस्मानपुर्‍यासह विविध भागांत दुकाने बंद झाली. या घटनेपासून अलर्ट झालेल्या पोलिसांनी एसआरपीची एक तुकडी सोबत घेऊन संवेदनशील भागात मोर्चा सांभाळला.

पोलीस अधिकारी, कर्मचारी सुट्या आणि रजा रद्द करून कर्तव्यावर हजर झाले. प्रभारी पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, उपायुक्त विनायक ढाकणे, उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे यांच्यासह सहायक पोलीस आयुक्त, ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक आणि अन्य अधिकारी-कर्मचार्‍यांसोबत एसआरपीच्या चार कंपन्यांतील चारशे जवान सोमवारी रात्रीपासून ते आज गुरुवार सायंकाळपर्यंत रात्रंदिवस गस्तीवर होते. तब्बल ७२ तास पोलिसांना टुथ ब्रशही करता आला नाही. कोणता दगड कोठून येईल याचा नेम नसतो, ही बाब ओळखून डोक्यावर लोखंडी हेल्मेट ठेवून पोलिसांना मिळेल तो नाश्ता उभे राहूनच करावा लागला. 

गेल्या काही दिवसांपासून पारा १० अंशांपर्यंत घसरला आहे. शहरवासी ऊबदार कपड्यात घरात आरामशीर झोपलेले असताना त्यांच्या जीवित आणि मालमत्तांचे रक्षण करण्यासाठी कडाक्याच्या थंडीत तीन रात्री पोलिसांनी जागून काढल्या. काही विशेष पोलीस अधिकार्‍यांनीही पोलिसांना याकामी मदत केली. 

अन्नाची पाकिटेपोलिसांची रात्रंदिवस सुरू असलेली धावपळ पाहून मुकुंदवाडी येथील शिवसेना पदाधिकारी बाबासाहेब डांगे यांनी पोलिसांसाठी बुधवारी सकाळी नाश्त्याची पाकिटे वाटप केली. तसेच सिंधी कॉलनीतील गुरुद्वारातर्फे पोलिसांना सुमारे अडीच हजार अन्नाची पाकिटे वाटप करून माणुसकीचे दर्शन घडविले. तर तरुणांच्या ग्रुपने पोलिसांना मोफत चहा व पाण्याच्या बाटल्या दिल्या.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादPoliceपोलिस