६१५२ विहिरींची कामे अपूर्ण

By Admin | Updated: May 23, 2014 00:20 IST2014-05-23T00:03:01+5:302014-05-23T00:20:55+5:30

उस्मानाबाद : रोजगार हमी योजनेअंतर्गत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विहिरींची कामे मंजूर करण्यात आली होती. मात्र यातील तब्बल ६ हजार १५२ विहिरीची कामे अद्यापही अपूर्ण आहेत.

6152 works of wells incomplete | ६१५२ विहिरींची कामे अपूर्ण

६१५२ विहिरींची कामे अपूर्ण

 उस्मानाबाद : रोजगार हमी योजनेअंतर्गत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विहिरींची कामे मंजूर करण्यात आली होती. मात्र यातील तब्बल ६ हजार १५२ विहिरीची कामे अद्यापही अपूर्ण आहेत. विधान परिषद सदस्य सतीश चव्हाण यांनी याबाबतचा मुद्दा तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून विधानपरिषदेत उपस्थित केला होता. याअनुषंगाने राज्याच्या अवर सचिवांनी जिल्ह्यातील अपुर्ण विहिरींचा अहवाल तातडीने सादर करण्याचे आदेश रोहयो उपजिल्हाधिकार्‍यांना दिले आहेत. मजुरांच्या हाताला काम मिळावे, त्यांची उपासमार होऊ नये या उद्देशाने शासनाने महात्मा गांधी राष्टÑीय ग्रामीण रोजगार हमी योजना सुरु केली आहे. यामध्ये अलीकडच्या काळात विहीरींच्या कामाचाही समावेश करण्यात आला आहे. हाताला काम देतानाच सिंचनक्षेत्र वाढून दुष्काळी भागातील शेतकरी आर्थिकदृष्ट्या संपन्न व्हावा असा यामागे हेतू आहे. मात्र प्रशासनाने ही बाब फारशी गांर्भीयाने घेतली नसल्याचेच अपूर्ण विहीरींच्या कामाची आकडेवारी पाहिली असता दिसून येते. मंजूर कामांपैकी प्रशासनाला केवळ २ हजार १३७ कामे पूर्ण करता आली. या अनुषंगाने आ. सतीश चव्हाण व इतर विधानपरिषद सदस्यांनी विधानपरिषदेत याबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर प्रशासनाने याबाबतचा अहवाल सादर करण्याचे निर्देश रोहयो विभागाला दिले आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यात राष्टÑीय रोजगार हमी योजनेव्दारे हाती घेण्यात आलेल्या विहिरीसाठी निधी उपल्बध असतानाही विहिरींची कामे मोठया प्रमाणात अपूर्ण आहेत, हे खरे काय आहे काय, तसे असल्याच या प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय? चौकशी केली असल्यास त्यात काय आढळून आले व सदर विहिरीची कामे तातडीने पूर्ण करणेबाबत शासनाने आतापर्यंत कोणती कार्यवाही केली याबाबतची माहिती तातडीने सादर करण्याचे निर्देश अवर सचिव वि.पु काळे यांनी रोजगार हमी योजना उपजिल्हाधिकार्‍यांना दिले आहेत. (प्रतिनिधी)जिल्ह्यतील विविध ग्रामपंचायती स्तरावर विविध विहिरींच्या ८ हजार २९९ कामांना मंजुरी देण्यात आली होती. यामध्ये उस्मानाबाद तालुक्यातील ३३९, तुळजापूर ९२०, उमरगा ८८५, लोहारा २०२, भूम २ हजार ३४९, परंडा १ हजार ६४, कळंब १ हजार ६१७ तर वाशी तालुक्यातील ९२३ विहिरींना मंजुरी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे सद्यस्थितीत यातील एकही काम सुरु झालेले नाही. उस्मानाबाद तालुक्यात २८५, तुळजापूर ११३६, उमरगा ६९४, लोहारा ११६, भूम ८०४, परंडा १ हजार ४९९, कळंब ९७८ तर वाशी ६४२ असे जिल्ह्यात ६ हजार १५४ विहिरीची कामे अपूर्ण आहेत. तर मागील काही काळात प्रशासनाच्या वतीने केवळ २ हजार १३७ विहीरीचे कामे पूर्ण केली असून त्यात उस्मानाबाद ११४, तुळजापूर ३०३, उमरगा १०९, लोहारा ८२, भूम ३८३, परंडा ५०, कळंब १०४४ तर वाशी तालुक्यातील ५२ अशा २ हजार १३७ विहिरींची कामे पूर्ण करण्यात आली आहेत.

Web Title: 6152 works of wells incomplete

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.