शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
2
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
5
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
6
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
7
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
8
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
9
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
10
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
11
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
12
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
13
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
14
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
15
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
16
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
17
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
18
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
19
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
20
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ६१ टक्के पेरणी

By admin | Updated: July 30, 2014 01:01 IST

जालना : जिल्ह्यात केवळ १५ टक्के पावसाची नोंद असली तरी शेतकऱ्यांनी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत ६१ टक्के पेरण्यांची कामे पूर्ण केली आहेत. तीळ, सूर्यफुलाची पेरणी सर्वात कमी आहे.

जालना : जिल्ह्यात केवळ १५ टक्के पावसाची नोंद असली तरी शेतकऱ्यांनी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत ६१ टक्के पेरण्यांची कामे पूर्ण केली आहेत. तीळ, सूर्यफुलाची पेरणी सर्वात कमी आहे. जिल्ह्याचे खरीप हंगामाचे क्षेत्र सरासरी ५ लाख ६१ हजार ३६० हेक्टर एवढे आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पेरणीचे प्रमाण केवळ १५ टक्के होते. त्यातही दुबार पेराची वेळ येणार का, अशी भीती शेतकऱ्यांमध्ये वर्तविण्यात येत होती. दरम्यानच्या काळात एक-दोन वेळा बऱ्यापैकी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीच्या कामांना वेग दिला. आतापर्यंत ३ लाख ३४ हजार ७८ हेक्टर क्षेत्रात प्रत्यक्षात पेरणी झाली आहे. मात्र पाऊस पुन्हा गायब झाल्याने शेतकरी चिंतित आहेत.जिल्ह्यात कापाशीची १ लाख ७२ हजार ९०० हेक्टरमध्ये तर सोयाबीनची पेरणी ३८ हजार २७० हेक्टरमध्ये झाली. ज्वारीचे सरासरी क्षेत्र ७१८ हेक्टर असून प्रत्यक्षात ७२ हेक्टर क्षेत्रातच पेरणी झाली. त्याची टक्केवारी केवळ १० टक्के आहे. बाजरीचे सर्वसाधारण क्षेत्र ४७ हजार ३०० असून ९ हजार ७०० हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. त्याची टक्केवारी २१ टक्के आहे. मक्याची एकूण ६० टक्के पेरणी झाली. मक्याचे सर्वसाधारण क्षेत्र ६० हजार १०० हेक्टर आहे. प्रत्यक्षात ३६ हजार २०० हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली. तूर, उडीद व मुगाचे अनुक्रमे ५२, ३९ व ३४ टक्के इतकी पेरणी झाली. तुरीचे सर्वसाधारण क्षेत्र ४८ हजार हेक्टर आहे. त्यापैकी २४ हजार ९०० हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली. उडदाचे सरासरी क्षेत्र १५ हजार २०० हेक्टर आहे. त्यापैकी केवळ ६ हजार हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली. मुगाचे सर्वसाधारण क्षेत्र ३५ हजार ६०० हेक्टर असून १२ हजार १०० हेक्टर क्षेत्रात त्याची पेरणी झाली. भुईमुगाची सर्वसाधारण क्षेत्रापैकी ५० टक्के पेरणी झाली आहे. तिळाची ३ टक्क्यांवरच पेरणी आहे. सूर्यफुलाचे क्षेत्र ३ हजार २०० हेक्टर असून प्रत्यक्षात केवळ ३०० हेक्टरमध्येच पेरणी झाली. उसाच्या लागवडीचे सर्वसाधारण क्षेत्र २० हजार ४०० हेक्टर आहे. त्यापैकी १ हजार ७०० हेक्टर क्षेत्रावर प्रत्यक्ष लागवड झाली. (प्रतिनिधी)बळीराजा चिंतित गतवर्षी पावसाचे प्रमाण १२० टक्के होते. त्यामुळे यंदा वरुणराजा साथ देईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र जुलै महिना जवळपास संपल्यानंतरही केवळ १५ टक्केच पावसाची नोंद असल्याने बळीराजा चिंतित आहे. किमान पेरणी वाया जाऊ नये, अशी आशा आहे.गारपिटीने शेतकऱ्यांच्या पिकांना फटका दिला. आता पावसाअभावी पिकांची उगवणच झालेली नाही. त्यामुळे दमदार पाऊस पडावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांची आहे. आॅगस्ट महिन्यात समाधानकारक पाऊस होईल, असा अंदाज काही जाणकार शेतकरी व्यक्त करीत आहेत.