शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: तामिळनाडूमध्ये 'खेला'! अभिनेता विजयच्या पक्षाची मुसंडी; द्रमुकला धक्का
2
West Bengal Assembly Election 2026: प. बंगालमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपानं गाठली शंभरी; TMC सोबत अटीतटीची लढत
3
Election Results 2026: केरळमध्ये काँग्रेस सुसाट, भाजपाचीही सात जागांवर आघाडी
4
बारामतीत अपेक्षेप्रमाणे सुनेत्रा पवार यांना आघाडी, तर राहुरीचा कल काय? आहे अशी अपडेट
5
बंगालमध्ये तृणमूल-भाजपामध्ये अटीतटीची लढत, सुरुवातीच्या कलांमध्ये कुणाला आघाडी? अशी आहे आकडेवारी
6
Tamil Nadu Elections 2026: विजय थलपती ते खुशबू सुंदर... पडद्यावरच्या कलाकारांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?
7
भाजपासाठी पश्चिम बंगाल ठरणार 'लास्ट फ्रंटियर'; जय-पराजयाचा परिणाम 'मिशन UP' वर पडणार?
8
Post Office ची कमाई करुन देणारी स्कीम, जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
9
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
10
'राजा शिवाजी'चं वीकेंड कलेक्शन किती? समोर आले आकडे; मराठी प्रेक्षकांची मान उंचावली
11
पश्चिम बंगालमधील या दोन मतदारसंघात 'कांटे की टक्कर', निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
12
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
13
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
14
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
15
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
16
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
17
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
18
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
19
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
20
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

पाच ठाणे अंमलदारांना कारणे दाखवा नोटीस

By admin | Updated: May 26, 2014 01:14 IST

औरंगाबाद : शहरातील १३ पोलीस ठाण्यांमधील अंमलदारांच्या वर्तनावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, याचा अनुभव दस्तूरखुद पोलीस आयुक्तांना आला आहे

औरंगाबाद : शहरातील १३ पोलीस ठाण्यांमधील अंमलदारांच्या वर्तनावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, याचा अनुभव दस्तूरखुद पोलीस आयुक्तांना आला आहे. आयुक्तांनी पाठविलेल्या डमी तक्रारदारांना वाईट वागणूक दिलेल्या ५ ठाणे अंमलदारांना आयुक्त राजेंद्र सिंह यांनी कारणेदर्शक नोटीस बजावून दंडात्मक कारवाई केली आहे. दरम्यान, अंमलदारांचे वर्तन सुधारण्यासाठी तत्कालीन आयुक्तांनी कार्यशाळा घेतली होती. ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेलेल्या सर्वसामान्य जनतेची दखल त्यांनी तत्परतने घ्यावी, यासाठी त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरेही लावले होते; पण अंमलदारांच्या वर्तनात किंचितही सुधारणा झालेली नाही. सामान्य जनतेचे गाºहाणे ऐकूण न घेता त्यांना ताटकळत ठेवणे, तक्रारदारांचीच उलट तपासणी करणे, त्यांना दिवसभर बसवून ठेवल्यानंतर परत दुसर्‍या दिवशी बोलावणे, या गोष्टींमुळेच समाजात पोलिसांप्रति दुरावा निर्माण होत आहे. समाज व पोलिसांत सुसंवाद असावा, मैत्रीचे संबंध असावेत, यासाठी शासन स्तरावर अनेक उपक्रम राबविले जातात; पण ठाणे अंमलदारांची बोली व कृतीमुळे सामान्य नागरिकांच्या मनात पोलिसांप्रति सतत तिरस्कारच निर्माण झालेला आहे. ठाण्यात तक्रार घेऊन आलेल्या नागरिकांना जास्त वेळ ताटकळत बसवून न ठेवता त्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे. त्यांच्या तक्रारीनुसार व वरिष्ठांच्या आदेशानुसार वेळ न दवडता तक्रार दाखल करून घ्यावी, असे पोलीस आयुक्तांचे आदेश असताना शहरातील अनेक ठाण्यांमध्ये अंमलदारांकडून तक्रारदार नागरिकांचाच छळ केला जात असल्याच्या अनेक तक्रारी आयुक्त राजेंद्र सिंह यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. २० मे रोजी आयुक्तांनी शहरातील ८ पोलीस ठाण्यांत डमी तक्रारदार पाठविले. तेथे क्रांतीचौक, जवाहरनगर, उस्मानपुरा, मुकुंदवाडी व एमआयडीसी वाळूज ठाण्याच्या अंमलदारांचा डमी तक्रारदारांना अतिशय वाईट अनुभव आला. काही अंमलदारांनी तक्रारदारांना अरेरावी करीत त्यांची खरडपट्टी काढली, तर काहींनी तक्रारदारांना दुसर्‍या दिवशी येण्याचे फर्मान सोडले. सामान्य नागरिक व पोलिसांमध्ये सौहार्दतेचे वातावरण निर्माण व्हावे, यासाठी पोलीस दल प्रयत्नात असताना अंमलदार मात्र नागरिकांशी व्यवस्थित बोलत नाहीत.