शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
4
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
5
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
6
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
7
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
8
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
9
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
10
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
11
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
12
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
13
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
14
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
15
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
16
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
17
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
18
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
19
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
20
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल ३०० वर्षांची परंपरा; कीर्तन, प्रवचनात वारकरी तल्लीन

By admin | Updated: July 8, 2014 00:33 IST

पाथरी : अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिही लोकी, जायन जे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुल्या, असे अभंग आळवीत देहू ते पंढरपुरी तुकाराम महाराजांच्या दिंडीमध्ये वारकरी दंग झाल्याचे

पाथरी : अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिही लोकी, जायन जे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुल्या, असे अभंग आळवीत देहू ते पंढरपुरी तुकाराम महाराजांच्या दिंडीमध्ये वारकरी दंग झाल्याचे चित्र पहावयास मिळाले. भारतबुवा कानसूरकर यांच्या पायीदिंडीची ३०० वर्षांची परंपरा आहे.
महाराष्ट्रातील वारकऱ्यांचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या पांडुरंगाची आषाढी एकादशीची वारी संतश्रेष्ठ जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात पाथरी तालुक्यातील कानसूर येथील भारतबुवा महाराज कानसूरकर यांच्या पायी दिंडीला मानाचे स्थान आहे. मुख्य पालखीचे विणेकरी आणि चोपदार म्हणून कानसूर येथील दिंडीतील वारकऱ्यांना सेवा करण्याचा मान दरवर्षी मिळतो. ७ जुलै रोजी तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासोबत कानसूरच्या पायी दिंडीमध्ये सदर प्रतिनिधीने तिराची कुरोली ते वखारीपर्यंत दिंडीमध्ये सहभाग घेतला. पूर्वजापासून त्यांच्या पायीदिंडीचा सोहळा आजतागायत सुरु आहे. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी कानसूरच्या पायी दिंडीचे प्रस्थान १७ जून रोजी पाथरी येथून देहू येथे झाले आणि देहू येथून १९ जूनपासून पांडुरंगाच्या दर्शनासाठी ही पायीदिंडी पालखी समवेत आहे. तुकाराम महाराजांच्या मुख्य पालखीच्या रथासमोर दुसऱ्या क्रमांकाची दिंडी म्हणून या दिंडीला मान आहे. ७ जुलै रोजी तुकाराम महाराजांची पालखी वखारी येथे मुक्कामी येते. ह.भ.प. भारतबुवा कानसूरकर म्हणाले, पालखीचा अनुभव सर्वच वारकऱ्यांना जीवनाचे सार सांगून जातो. ज्या सुखा कारने देव वेढावला, वैकुंठ सोडूनी संत सदनी राहिला, तोच सुख सोहळा आणि पंढरी हेच देवाचे सदन म्हणून वारकरी या वारीमध्ये बेधुंद रमून जातात. या ठिकाणचा रिंगण सोहळा, फुगड्या, भारुडे, कीर्तन, प्रवचनानंतर आपापल्या फडात राहुट्यामध्ये वारकरी विश्रांती घेताना दिसून येतात. तुकाराम महाराजांच्या पालखीमध्ये पाथरी तालुक्यातील बाभळगाव येथील अश्व तीन ठिकाणी गोल रिंगण करतो. या अश्वाने यावर्षी २९ जून रोजी सेलवडी, १ जुलै रोजी इंदापूर आणि ४ जुलै रोजी सराटी या ठिकाणी गोल रिंगणामध्ये सहभाग घेतला. बाभळगावच्या या अश्वाचा मान गेल्या अनेक वर्षांपासून अविरतपणे सुरु आहे. ७ जुलै रोजी पायी दिंडीसमवेत जि़ प़ च्या सभापती चंद्रकला सुभाषराव कोल्हे, सुभाषराव कोल्हे, शंतनू पाटील, उद्धवराव शिंदे यांच्यासह कानसूर, उमरा गुंज, गौंडगाव, वाघाळ, खदगाव, अंधापुरी, तारुगव्हाण, डिग्रस, सुरुमगाव, मसला, लिंबगाव, जळगव्हाण येथील वारकऱ्यांनी सहभाग घेतला. (वार्ताहर)
पायीदिंडीतील अनुभव सांगताना ह.भ.प. भारतबुवा कानसूरकर म्हणाले की, सकाळी उठल्यापासून रात्री मुक्कामापर्यंत दिनचर्या ठरलेली असते. वारकरी स्रान करुन धर्मग्रंथ गाथा पारायण ज्ञानेश्वरी पठण करतात. दररोज तुकाराम महाराजांच्या पालखीचा रथ सजवतात. सजविलेल्या पालखी रथात पादुका ठेवतात आणि दुसऱ्या कामाला जाण्यासाठी पुन्हा तयार असतात. टाळकरी-विणेकरी पताका घेऊन दिंड्या काढू लागतात.