शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

३० कोटी घेऊन ‘कृत्रिम’ पावसाचे विमान उडाले; 'पाऊस' पडला हे गुलदस्त्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 7:48 PM

प्रयोगातून किती पाऊस पडला हे गुलदस्त्यात

ठळक मुद्देकृत्रिम पावसाचा प्रयोग संपला ९३३ फ्लेअर्स पाणीदार ढगांत सोडले 

औरंगाबाद : कृत्रिम पावसासाठी ख्याती वेदर मॉडिफिकेशनने ९ आॅगस्टपासून  सुरू केलेला प्रयोग थांबविण्यात आला आहे. ३० कोटी रुपये घेऊन प्रयोगासाठी आलेले विमान उडाले आहे. तत्पूर्वी शास्त्रज्ञांनी औरंगाबाद सोडले. ५२ दिवसांसाठी हा प्रयोग करण्याचा करार होता. ९ नोव्हेंबरपर्यंत प्रयोग सुरू होता. प्रयोग थांबविण्यात आल्याचे राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या संचालक विभागाकडून सांगण्यात आले. 

तीन महिन्यांतील प्रयोग काळात ९३३ फ्लेअर्स पावसासाठी राज्यातील विविध भागांत सोडण्यात आले. विमान उड्डाणावर उड्डाण घेत राहिले, त्यातून किती पाऊस पडला, याचा अहवाल महसूल प्रशासन आणि शास्त्रज्ञांनी दिला नाही. आॅक्टोबर महिन्यात झालेला पाऊस हा कृत्रिम होता की, नैसर्गिक याचेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. ३० कोटी रुपयांतून हा प्रयोग करण्यात आला. आता त्या प्रयोगाची सांगता झाली असली तरी अधिकृतरीत्या घोषणा करण्यात आलेली नाही. आयुक्तालयाच्या चौथ्या मजल्यावर बसविण्यात आलेले रडार अजून तसेच आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत ९ आॅगस्टपासून प्रयोगासाठी विमानाने उड्डाण करीत रसायनांची फवारणी केली. ९० दिवसांत ३५ दिवस प्रयोग झाला नाही. विमान व पायलटस्ने रेस्ट डे किंवा पाणीदार ढगं नसल्याच्या कारणाने ३५ दिवस उड्डाण केले नाही. निवडणूक आचारसंहितेच्या काळात सरकारी यंत्रणेने कृत्रिम पावसाच्या प्रयोगाकडे लक्ष दिले नाही. दरम्यान परतीच्या पावसाने राज्यभर दमदार हजेरी लावली. परतीचा पाऊस ज्या भागात पडला नाही, ज्या भागात पाऊस झाला नाही, त्या ठिकाणी कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी विमानाने उड्डाण घेतले. 

प्रयोगातून किती पडला पाऊस?कृत्रिम पावसाच्या प्रयोगाला ९ आॅगस्ट रोजी सुरुवात झाली. १६ आॅगस्टपासून कंपनीच्या विमानाचे प्रयोगासाठी नियमित उड्डाण झाले. ९ आॅगस्टपासून हिशेब केला तर आजवर ९० दिवस प्रयोगाचे झाल्याचे दिसते. ९ आॅगस्ट ते १ सप्टेंबर,  १ सप्टेंबर ते १२ आॅक्टोबरअखेरपर्यंत ९३३ फ्लेअर्स विमानातून कृत्रिम पावसासाठी ढगांमध्ये सोडण्यात आले.४औरंगाबाद, अहमदनगर, जालना, परभणी, बीड, बुलडाणा, सोलापूर या जिल्ह्यांतील गावांवरील पाणीदार ढगांमध्ये प्रयोग करण्यात आला. या प्रयोगातून किती पाऊस पडला, याची माहिती अद्याप गुलदस्त्यातच आहे. दरम्यान राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक अभय यावलकर यांनी सांगितले की, प्रयोग संपल्याची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. परंतु प्रयोग थांबविण्यात आला आहे.

टॅग्स :RainपाऊसMarathwadaमराठवाडाAurangabadऔरंगाबाद