शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; नांदुरघाटमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक
6
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
8
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
9
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
10
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
11
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
12
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
13
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
14
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
15
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
16
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
17
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
18
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

औरंगाबाद जिल्ह्यात वर्षभरात तीन हजार शवविच्छेदन; प्रमाण वाढल्याने डॉक्टरांवर ताण 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2017 11:19 AM

औरंगाबाद जिल्ह्यात वर्षभरात तीन हजार शवविच्छेदन होत आहेत. यातील ९० टक्के शवविच्छेदन हे एकट्या घाटी रुग्णालयात होतात. क्षमतेपेक्षा कितीतरी अधिक शवविच्छेदनाची जबाबदारी डॉक्टर पार पाडत आहे. शिवाय मृत्यूचे कारण स्पष्ट असूनही शवविच्छेदनाचे प्रमाण अधिक असल्याने डॉक्टरांवर कामाचा ताण दिवसेंदिवस वाढत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठळक मुद्देमृत्यूचे कारण स्पष्ट असूनही शवविच्छेदनाचे प्रमाण अधिकशहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) शवविच्छेदनगृहात दररोज ८ ते १० शवविच्छेदन होतात. दुसरीकडे आरोग्य विभागांतर्गत असलेल्या ग्रामीण भागातील रुग्णालयांत वर्षभरात ३८९ शवविच्छेदन झाले.

- संतोष हिरेमठ 

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात वर्षभरात तीन हजार शवविच्छेदन होत आहेत. यातील ९० टक्के शवविच्छेदन हे एकट्या घाटी रुग्णालयात होतात. क्षमतेपेक्षा कितीतरी अधिक शवविच्छेदनाची जबाबदारी डॉक्टर पार पाडत आहे. शिवाय मृत्यूचे कारण स्पष्ट असूनही शवविच्छेदनाचे प्रमाण अधिक असल्याने डॉक्टरांवर कामाचा ताण दिवसेंदिवस वाढत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) शवविच्छेदनगृहात दररोज ८ ते १० शवविच्छेदन होतात. येथील शीतगृहात २० मृतदेह ठेवण्याची क्षमता आहे, दिवसेंदिवस या ठिकाणी शवविच्छेदनाचे प्रमाण वाढत आहे. दोन वर्षांपूर्वी २ हजार ४८० तर गतवर्षी २ हजार ५०० तर यंदा हा आकडा आतापर्यंत २५०० वर पोहोचला आहे. आगामी दहा दिवसांत हा आकडा २ हजार ६०० वर पोहोचेल,असे घाटीतील तज्ज्ञांनी सांगितले. 

दुसरीकडे आरोग्य विभागांतर्गत असलेल्या ग्रामीण भागातील रुग्णालयांत वर्षभरात ३८९ शवविच्छेदन झाले. त्यामुळे घाटी रुग्णालयावर शवविच्छेदनाचा किती भार आहे, हे स्पष्ट होते. घाटीतील शवविच्छेदनगृहात एकावेळी दोन ते तीन डॉक्टर कार्यरत असतात. डॉक्टरांनी रुग्णाच्या मृत्यूचे प्रमाणपत्र दिले पाहिजे. त्यातून मृत्यूचे कारणही स्पष्ट होते. डॉक्टरांनी नमूद केलेल्या मृत्यूच्या कारणावर शंका असेल, तर शवविच्छेदन केले पाहिजे; अन्यथा जर मृत्यूचे कारण स्पष्ट असेल, तर शवविच्छेदन करण्याचे टाळले पाहिजे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे; परंतु मृत्यूचे कारण स्पष्ट असूनही शवविच्छेदन होतात.  मेडिकोलीगल केसेस आणि अन्य कारणांमुळे शवविच्छेदन करणे आवश्यक होत असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

तीनशेवर शवविच्छेदनजिल्ह्यातील ग्रामीण भागातील रुग्णालयात वर्षभरात ३८९ शवविच्छेदन झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. जी. एम. गायकवाड यांनी दिली.

...असा आहे ताणघाटीत शवविच्छेदनासाठी ७ वरिष्ठ डॉक्टर, तर ४ ज्युनिअर डॉक्टर कार्यरत आहे. विद्यार्थ्यांना शिकविणे आणि शवविच्छेदनाबरोबर न्यायालयात साक्ष देणे, शवविच्छेदन अहवाल पूर्ण करणे, पोलिसांच्या शंकांना उत्तरे देणे अशी अन्य जबाबदारीही डॉक्टरांना पार पाडावी लागत आहे. १ हजार शवविच्छेदनासाठी सध्याचे हे डॉक्टर्स पुरेसे आहे; परंतु प्रत्यक्षात अडीच हजारांवर शवविच्छेदन होतात. प्रत्येक ५०० शवविच्छेदनासाठी २ पोस्ट वाढल्या पाहिजे. येथील कामाचे स्वरूप पाहता ६ डॉक्टरांची आवश्यकता आहे,असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

या कारणांसाठी होते शवविच्छेदन१. विविध अपघाती मृत्यू.२. मारहाण, खून अशा गुन्हेगारी घटनांतील मृत्यू.३. विष प्राशन, अन्नातून विषबाधेतून मृत्यू.४. गळफास आणि आत्महत्या प्रकरणे.५. उपचारात हलगर्जीपणा केल्याचा आरोप.६. शंकास्पद मृत्यूसह अन्य काही कारणे.७. वीज पडणे, पूर अशा नैसर्गिक आपत्कालीन घटनांतील मृत्यू.

विम्यासाठी शवविच्छेदन गरजेचेआपत्कालीन मृत्यू, गुन्हेगारी घटनेतील मृत्यू, अपघाती मृत्यू,आत्महत्या प्रकरणात शवविच्छेदन अहवाल आवश्यक ठरतो. आजारपणामुळे मृत्यू झाल्यास शवविच्छेदनाची गरज नसते. विम्याच्या क्लेमसाठी शवविच्छेदन आवश्यक आहे.-अ‍ॅड. अंगद कानडे-भाटसावंगीकर

...तर शवविच्छेदन टाळता येतेज्या प्रकरणात मृत्यूचे कारण डॉक्टरांना पूर्ण माहिती आहे आणि पोलिसांना ते मान्य असेल, तर शवविच्छेदन टाळता येते; परंतु याचे प्रमाण कमी आहे.‘एमएलसी’ नोंद झाली असेल, संशयास्पद मृत्यू झालेला असेल, मृत्यूचे कारण सांगता येत नसेल तर अशावेळी शवविच्छेदन आवश्यक ठरते.- डॉ. के. यू. झिने, विभागप्रमुख, न्यायवैद्यकशास्त्र, घाटी रुग्णालय 

टॅग्स :Healthआरोग्यAurangabadऔरंगाबाद