शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

आस्मानी संकटानंतर बँकांकडून दिरंगाई; मराठवाड्यातील ४२ टक्के शेतकरी पीककर्जापासून वंचित

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2022 12:35 IST

आस्मानी संकटाचा सामना शेतकरी करीत आहेत, तर दुसरीकडे बँकांकडून पीककर्ज मिळण्यात विलंब होत आहे.

औरंगाबाद : मराठवाड्यातील ९ लाख ८० हजार सभासद शेतकऱ्यांपैकी ३ लाख २२ हजार शेतकरी सभासदांना आजवर पीककर्ज मिळालेले नाही. विभागात ९५ टक्के खरिपाच्या पेरण्या झाल्या असून ८० टक्के वार्षिक सरासरीच्या तुलनेत पाऊस झाला आहे. ओल्या दुष्काळाच्या दिशेने जाणारे वातावरण असताना पूर्ण १०० टक्के सभासद शेतकऱ्यांना पीककर्ज अद्याप वाटप झाले नसल्याचे विभागीय अहवालातून समोर आले आहे.

मराठवाड्यात यंदाच्या खरीप हंगामासाठी ११ लाख २९ हजार ८३९ लाख रुपयांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. यातील ६ लाख ५७ हजार ५७० लाख रुपयांचे पीककर्ज वाटप झाले आहे. ऑगस्ट महिन्याचा दुसरा आठवडा सुरू आहे. आजपर्यंतच्या पावसाने विभागातील सुमारे साडेचार लाख हेक्टरवर ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. ७ लाख शेतकऱ्यांचे हे नुकसान आहे. आस्मानी संकटाचा सामना शेतकरी करीत आहेत, तर दुसरीकडे बँकांकडून पीककर्ज मिळण्यात विलंब होत आहे. दुहेरी संकटांमुळे शेतकरी हैराण झाले आहेत. त्यातच शासनाकडून अद्याप कुठलीही मदत जाहीर झालेली नाही.

औरंगाबाद जिल्ह्यात १ लाख ३८ हजार ५८५ शेतकरी सभासद आहेत. जालन्यात १ लाख ३ हजार ५२९, परभणी जिल्ह्यात ७१५४९, हिंगोलीत ६७१५१, लातूरमध्ये २ लाख १६ हजार ८६६ तर उस्मानाबादमध्ये ९५१३२, बीडमध्ये १ लाख ३९ हजार ९०९, नांदेडमध्ये १ लाख ४७ हजार ५३६ शेतकरी सभासद आहेत. परभणी जिल्ह्यात सर्वाधिक कमी पीककर्ज वाटप झाले आहे. सर्वाधिक कर्जवाटप नांदेड जिल्ह्यात झाले आहे.

जिल्हानिहाय पीककर्ज वाटप असेऔरंगाबाद : ६१ टक्केजालना : ५५ टक्केपरभणी : ४० टक्केहिंगोली : ५० टक्केलातूर : ६५ टक्केउस्मानाबाद : ५२ टक्केबीड : ५८ टक्केनांदेड : ७० टक्केएकूण : ५८ टक्के

 

टॅग्स :Crop Loanपीक कर्जMarathwadaमराठवाडाAurangabadऔरंगाबादFarmerशेतकरी