शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय वृत्तसंस्थेच्या पत्रकाराने भारताच्या आरोपावर प्रश्न विचारला, अन् ट्रम्प यांचे तोंड बंद झाले...
2
RBI MPC Meeting: रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर 'जैसे थे', ईएमआयमध्ये कोणताही बदल होणार नाही
3
प्रियकरासोबत संबंध बनवताना प्रायव्हेट पार्टला इजा; महिलेने मुंबई पोलिसांना गंडवलं, सत्य भलतेच निघाले
4
वाहन विमा नाही? मग भरा पाचपट दंड...! ड्रायव्हिंग लायसन्स नूतनीकरणासाठीही नवीन अटी
5
पाकिस्तानी दहशतवादी रशियाच्या मदतीला! युक्रेनविरोधात लढत असल्याचा झेलेन्स्कींचा दावा
6
फक्त रशियचां तेल नाही, तर 'या' ३ कारणामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचा तिळपापड; भारताला पुन्हा धमकी
7
'पाच महिन्यात पाच युद्ध थांबवली आता...'; ट्रम्प यांनी पुन्हा घेतले भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीचे श्रेय
8
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
9
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
10
हिंगोली रेल्वेस्टेशनवरील उभ्या बोगीला आग; संपूर्णतः जळून खाक
11
Share Market Today: शेअर बाजाराची पुन्हा रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' स्टॉक्सचा घसरणीसह सुरू झाला व्यवहार
12
राजा रघुवंशी २.०; बॉयफ्रेंडसोबत थाटायचा होता संसार, पत्नीने पतीला जंगलात बोलावलं अन्...
13
कोणताही नवा चित्रपट नाही, तरीही सर्वात श्रीमंत; जुही चावलानं कशी बनवली ₹४,६०० कोटींची संपत्ती
14
मोठी बातमी: महादेव मुंडे खून प्रकरणातील माहिती देणाऱ्यास बक्षीस; एसआयटीकडून गोपनीयतेची हमी
15
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!
16
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
17
अमित शाह... अधिक वेग, अधिक जबाबदाऱ्या! 
18
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
19
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
20
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान

आस्मानी संकटानंतर बँकांकडून दिरंगाई; मराठवाड्यातील ४२ टक्के शेतकरी पीककर्जापासून वंचित

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2022 12:35 IST

आस्मानी संकटाचा सामना शेतकरी करीत आहेत, तर दुसरीकडे बँकांकडून पीककर्ज मिळण्यात विलंब होत आहे.

औरंगाबाद : मराठवाड्यातील ९ लाख ८० हजार सभासद शेतकऱ्यांपैकी ३ लाख २२ हजार शेतकरी सभासदांना आजवर पीककर्ज मिळालेले नाही. विभागात ९५ टक्के खरिपाच्या पेरण्या झाल्या असून ८० टक्के वार्षिक सरासरीच्या तुलनेत पाऊस झाला आहे. ओल्या दुष्काळाच्या दिशेने जाणारे वातावरण असताना पूर्ण १०० टक्के सभासद शेतकऱ्यांना पीककर्ज अद्याप वाटप झाले नसल्याचे विभागीय अहवालातून समोर आले आहे.

मराठवाड्यात यंदाच्या खरीप हंगामासाठी ११ लाख २९ हजार ८३९ लाख रुपयांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. यातील ६ लाख ५७ हजार ५७० लाख रुपयांचे पीककर्ज वाटप झाले आहे. ऑगस्ट महिन्याचा दुसरा आठवडा सुरू आहे. आजपर्यंतच्या पावसाने विभागातील सुमारे साडेचार लाख हेक्टरवर ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. ७ लाख शेतकऱ्यांचे हे नुकसान आहे. आस्मानी संकटाचा सामना शेतकरी करीत आहेत, तर दुसरीकडे बँकांकडून पीककर्ज मिळण्यात विलंब होत आहे. दुहेरी संकटांमुळे शेतकरी हैराण झाले आहेत. त्यातच शासनाकडून अद्याप कुठलीही मदत जाहीर झालेली नाही.

औरंगाबाद जिल्ह्यात १ लाख ३८ हजार ५८५ शेतकरी सभासद आहेत. जालन्यात १ लाख ३ हजार ५२९, परभणी जिल्ह्यात ७१५४९, हिंगोलीत ६७१५१, लातूरमध्ये २ लाख १६ हजार ८६६ तर उस्मानाबादमध्ये ९५१३२, बीडमध्ये १ लाख ३९ हजार ९०९, नांदेडमध्ये १ लाख ४७ हजार ५३६ शेतकरी सभासद आहेत. परभणी जिल्ह्यात सर्वाधिक कमी पीककर्ज वाटप झाले आहे. सर्वाधिक कर्जवाटप नांदेड जिल्ह्यात झाले आहे.

जिल्हानिहाय पीककर्ज वाटप असेऔरंगाबाद : ६१ टक्केजालना : ५५ टक्केपरभणी : ४० टक्केहिंगोली : ५० टक्केलातूर : ६५ टक्केउस्मानाबाद : ५२ टक्केबीड : ५८ टक्केनांदेड : ७० टक्केएकूण : ५८ टक्के

 

टॅग्स :Crop Loanपीक कर्जMarathwadaमराठवाडाAurangabadऔरंगाबादFarmerशेतकरी