शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
6
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
7
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
8
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
9
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
10
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
11
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
12
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
13
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
14
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
15
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
16
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
17
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
18
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
19
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

आस्मानी संकटानंतर बँकांकडून दिरंगाई; मराठवाड्यातील ४२ टक्के शेतकरी पीककर्जापासून वंचित

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2022 12:35 IST

आस्मानी संकटाचा सामना शेतकरी करीत आहेत, तर दुसरीकडे बँकांकडून पीककर्ज मिळण्यात विलंब होत आहे.

औरंगाबाद : मराठवाड्यातील ९ लाख ८० हजार सभासद शेतकऱ्यांपैकी ३ लाख २२ हजार शेतकरी सभासदांना आजवर पीककर्ज मिळालेले नाही. विभागात ९५ टक्के खरिपाच्या पेरण्या झाल्या असून ८० टक्के वार्षिक सरासरीच्या तुलनेत पाऊस झाला आहे. ओल्या दुष्काळाच्या दिशेने जाणारे वातावरण असताना पूर्ण १०० टक्के सभासद शेतकऱ्यांना पीककर्ज अद्याप वाटप झाले नसल्याचे विभागीय अहवालातून समोर आले आहे.

मराठवाड्यात यंदाच्या खरीप हंगामासाठी ११ लाख २९ हजार ८३९ लाख रुपयांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. यातील ६ लाख ५७ हजार ५७० लाख रुपयांचे पीककर्ज वाटप झाले आहे. ऑगस्ट महिन्याचा दुसरा आठवडा सुरू आहे. आजपर्यंतच्या पावसाने विभागातील सुमारे साडेचार लाख हेक्टरवर ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. ७ लाख शेतकऱ्यांचे हे नुकसान आहे. आस्मानी संकटाचा सामना शेतकरी करीत आहेत, तर दुसरीकडे बँकांकडून पीककर्ज मिळण्यात विलंब होत आहे. दुहेरी संकटांमुळे शेतकरी हैराण झाले आहेत. त्यातच शासनाकडून अद्याप कुठलीही मदत जाहीर झालेली नाही.

औरंगाबाद जिल्ह्यात १ लाख ३८ हजार ५८५ शेतकरी सभासद आहेत. जालन्यात १ लाख ३ हजार ५२९, परभणी जिल्ह्यात ७१५४९, हिंगोलीत ६७१५१, लातूरमध्ये २ लाख १६ हजार ८६६ तर उस्मानाबादमध्ये ९५१३२, बीडमध्ये १ लाख ३९ हजार ९०९, नांदेडमध्ये १ लाख ४७ हजार ५३६ शेतकरी सभासद आहेत. परभणी जिल्ह्यात सर्वाधिक कमी पीककर्ज वाटप झाले आहे. सर्वाधिक कर्जवाटप नांदेड जिल्ह्यात झाले आहे.

जिल्हानिहाय पीककर्ज वाटप असेऔरंगाबाद : ६१ टक्केजालना : ५५ टक्केपरभणी : ४० टक्केहिंगोली : ५० टक्केलातूर : ६५ टक्केउस्मानाबाद : ५२ टक्केबीड : ५८ टक्केनांदेड : ७० टक्केएकूण : ५८ टक्के

 

टॅग्स :Crop Loanपीक कर्जMarathwadaमराठवाडाAurangabadऔरंगाबादFarmerशेतकरी