शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगरात तीन रस्त्यांवरील २६२२ मालमत्ता जमीनदोस्त; मनपा थांबणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 19:24 IST

एकाही रस्त्यावरील बांधकाम साहित्य उचलण्याचे काम मनपाने सुरू केले नाही. जालना, पैठण, बीड बायपासवर डेब्रीज वेस्ट पडून

छत्रपती संभाजीनगर : शहरातील मुख्य रस्ते रुंद करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असून, आतापर्यंत तीन रस्ते ६० मीटर रुंद करण्यात आले. त्यामुळे महिनाभरात २ हजार ६२२ मालमत्ता जमीनदोस्त करण्यात आल्या. एकाही रस्त्यावरील बांधकाम साहित्य उचलण्याचे काम मनपाने सुरू केले नाही. काही मालमत्ताधारकांनी स्वत:च्या खर्चाने मलबा उचलणे, लोखंड जमा करणे सुरू केले.

जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बीड बायपासवर महापालिकेने ही मोहीम राबवत ४१८ मालमत्ता पाडल्या होत्या. विशेष बाब म्हणजे, या मोहिमेसाठी पोलिस बंदोबस्तही मिळाला नव्हता. मनपाच्या नागरीमित्र पथकाच्या साहाय्याने पाडापाडी करण्यात आली होती. ही मोहीम थंडावताच १९ जून रोजी मुकुंदवाडीत एका तरुणाचा निर्घृण खून झाला. या घटनेनंतर १२ तासांत मुकुंदवाडीतील २२९ लहान मोठी अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली होती. पोलिसांच्या आग्रहावरून ही पाडापाडी केली होती. वातावरण तापलेले असताना मनपाने मुकुंदवाडी ते केम्ब्रिजपर्यंत ६० मीटर रस्ता रुंद करण्यासाठी मोहीम राबविली. यामध्ये सर्वाधिक १३६४ लहान मोठी बांधकामे पाडण्यात आली. ३० जून आणि १ जुलै रोजी पैठण रोडवर ८४० मालमत्ता पाडण्यात आल्या. महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच अडीच हजारांहून अधिक मालमत्ता पाडण्याची कारवाई करण्यात आली. ही कारवाई अजून थांबलेली नाही. यापुढेही सुरू राहणार आहे. मुख्य रस्ते रुंद झाल्यावर अंतर्गत प्रलंबित रस्तेही मोकळे केले जाणार आहेत.

कोणते रस्ते अजेंड्यावरचंपाचौक ते जालना रोड, आमखास ते जटवाडा रोड, महावीर चौक ते रेल्वेस्टेशन, वसंतराव नाईक चौक ते हर्सूल गाव आदी रस्ते प्राधान्याने मोकळे करण्यात येणार आहेत. न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे भविष्यात पुढील कारवाई होणार असल्याचे मनपातील सूत्रांनी सांगितले.

पैठण रोडवरील मलबा उचलणारमहापालिकेच्या यांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल कुलकर्णी यांनी सांगितले की, पैठण रोडवरील मलबा उचलण्याचे निर्देश आहेत. त्यानुसार गुरुवारी स्वतंत्र टीम लावून मलबा उचलण्याचे काम करण्यात येणार आहे.

महापालिका थांबणार नाहीप्रशासक जी. श्रीकांत यांनी यापूर्वीच महापालिका आता थांबणार नाही, अशी घोषणा केली आहे. ऐतिहासिक छत्रपती संभाजीनगर राज्याच्या पर्यटनाची राजधानी असून, येथे लाखो पर्यटक दररोज येतात. पर्यटन नगरी म्हणून रस्ते मोठे, रुंद ठेवणे आवश्यक असल्याचेही प्रशासकांनी नमूद केले आहे. प्रशासन निव्वळ पाडापाडी करून थांबणार नाही, सर्व्हिस रोडसुद्धा करणार आहे.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाEnchroachmentअतिक्रमण