शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

प्रत्येक ठाण्याचे २५ टक्के पाेलीस आता गस्तीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2020 12:37 PM

औरंगाबाद  : शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी आणि गुन्हे रोखण्यासाठी प्रत्येक ठाण्यातील २५ टक्के पोलिसांनी रस्त्यावर गस्त घालावी , असा स्पष्ट आदेश पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी ठाणेदारांना दिला आहे.  लॉकडाऊन शिथिल झाल्यापासून शहरात वाहनचोरी, घरफोडी, दुकानफोडी आणि वाटमारीचे प्रकार वाढले आहेत. सोनसाखळी चोरी रोखण्यात पोलिसांना यश आले असले तरी मंगळसूत्र चोरटे पुन्हा सक्रिय होऊ शकतात. या पार्श्वभूमीवर डॉ. गुप्ता यांनी रस्त्यावर पोलिसांची उपस्थिती वाढविण्याचा ...

औरंगाबाद : शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी आणि गुन्हे रोखण्यासाठी प्रत्येक ठाण्यातील २५ टक्के पोलिसांनी रस्त्यावर गस्त घालावी, असा स्पष्ट आदेश पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी ठाणेदारांना दिला आहे. 

लॉकडाऊन शिथिल झाल्यापासून शहरात वाहनचोरी, घरफोडी, दुकानफोडी आणि वाटमारीचे प्रकार वाढले आहेत. सोनसाखळी चोरी रोखण्यात पोलिसांना यश आले असले तरी मंगळसूत्र चोरटे पुन्हा सक्रिय होऊ शकतात. या पार्श्वभूमीवर डॉ. गुप्ता यांनी रस्त्यावर पोलिसांची उपस्थिती वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. 

पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील सर्व पोलीस ठाण्यांत कार्यरत मनुष्यबळाच्या सुमारे २५ टक्के पोलीस कर्मचाऱ्यांना गस्तीचे  काम सोपविले  जात आहे. दोन दिवसांपासून काही पोलीस ठाण्यात हा उपक्रम राबविण्यास सुरूवात झाली आहे.

शहरात चार्ली पोलिसांची आणि बीट मार्शलची गस्त बंद करून बीट हवालदारांवर गस्त सोपविण्यात आली होती. आता गस्तीकरिता स्वतंत्र कर्मचारी देण्यात येत असल्याने त्यांच्यावर अन्य जबाबदारी नसेल. यामुळे ते निर्धोकपणे गस्त करू शकतील.  यातील काही  कर्मचारी दुचाकीने  तर काही पोलीस मोबाईल व्हॅन आणि जीपमधून गस्त घालतील. 

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद