शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

२४ तास काम; हजेरी मात्र आठ तासांची

By admin | Updated: April 18, 2016 00:56 IST

अशोक कांबळे, वाळूज महानगर औद्योगिक परिसरात काम करताना अग्निशामक दलातील कर्मचाऱ्यांना कायम सतर्क राहावे लागते.

अशोक कांबळे, वाळूज महानगरऔद्योगिक परिसरात काम करताना अग्निशामक दलातील कर्मचाऱ्यांना कायम सतर्क राहावे लागते. आगीमुळे होणारी जीवित व वित्त हानी रोखण्यासाठी अनेकदा जीव धोक्यात घालावा लागतो; परंतु हा घटक कायम दुर्लक्षित राहिला आहे. २४ तास काम करूनही हजेरी मात्र, आठ तासांचीच लावली जाते. हक्कांच्या घरांचा प्रश्नही अजून प्रलंबित आहे. अशा परिस्थितीत येत्या २६ एप्रिलपासून संपावर जाण्याची तयारी अग्निशामक दलातील कर्मचारी करीत आहेत. रयतराज कामगार संघटनेच्या माध्यमातून अग्निशामक दलाचे कर्मचारी प्रशासनाच्या विरोधात एकत्र आले आहेत. सुटीच्या दिवशी केलेल्या कामांचा मोबदला मिळावा, भविष्य निर्वाह निधी द्यावा, कामाच्या वेळेचे नियोजन करावे, आदी मागण्यांसाठी आंदोलन करण्याच्या पवित्र्यात ते आहेत. कर्मचाऱ्यांसाठी सदनिका बांधण्याचे काम कंत्राटदार व प्रशासनातील वादामुळे अनेक वर्षांपासून रखडले आहे. बांधकाम पूर्ण झालेल्या सदनिका अद्याप कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे अग्निशमन कर्मचारी हतबल झाले आहेत. अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यांना ३१ मार्च रोजी मागण्यांचे निवेदन सादर केले, मात्र त्यावर कसलाही निर्णय झाला नाही. १२ एप्रिल रोजी प्रशासनाला पुन्हा स्मरणपत्र देण्यात आले. त्याचीही दखल घेण्यात आली नाही. येत्या २५ एप्रिलपर्यंत ठोस निर्णय न घेतल्यास २६ एप्रिलपासून वाळूज, शेंद्रा व पैठण औद्योगिक क्षेत्रातील अग्निशामक दलाचे कर्मचारी संपावर जाणार आहेत. गरज चाळीसची, कार्यरत बाराचवाळूज औद्योगिक वसाहत आणि निवासी भाग, असे मोठे कार्यक्षेत्र असलेल्या अग्निशमन विभागात ४० कर्मचाऱ्यांची गरज असून, प्रत्यक्षात मात्र, बाराच कर्मचारी कार्यरत आहेत. प्रत्येकी दोन फिडर फायरमन व चालक आणि ८ फायरमन यांचा यात समावेश आहे. यासंदर्भात मुख्य अग्निशमन अधिकारी संतोष वारीक यांच्याशी संपर्क साधला असता, कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार आम्हाला नसल्याचे विभागीय अधिकारी आर. बी. पाटील यांनी सांगितले. कर्मचारी संपावर गेले तर पर्यायी व्यवस्था करून सेवा दिली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.