शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
2
"संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
3
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
4
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप
5
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील खासदारांचं प्रगतीपुस्तक; लोकसभेत कशी राहिली कामगिरी?
6
'घरी जा, टीव्हीवर पाहा, माल पकडताहेत मोदी...'; झारखंडच्या छाप्यात नोटांच्या ढिगाऱ्याबाबत पंतप्रधान म्हणाले,...
7
रोकड पाहून अधिकारी चक्रावले; ED च्या छापेमारीवर काँग्रेस नेते आलमगीर यांची पहिली प्रतक्रिया
8
राज ठाकरेंच्या नावाचा विचार करावा, आनंद दिघेंच्या 'त्या' विधानानंतर काय घडलं?; CM शिंदेंचा गौप्यस्फोट
9
“पंतप्रधान मोदींना यावे लागते, महाराष्ट्रातील पराभव महायुतीला स्पष्ट दिसतो आहे”: अमोल कोल्हे
10
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या विधानावरून वाद
11
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
12
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
13
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
14
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
15
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
16
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट
17
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
Income Tax Saving Tips: EEE कॅटेगरीत येतात 'या' ४ स्कीम्स, यात पैसे गुंतवाल तर ३ पद्धतीनं वाचेल टॅक्स
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: बुध म्हणजे 'राजकुमार'; उत्तम वाणी, प्रखर बुद्धी, चिरतारुण्याचं वरदान
20
‘पुंछमध्ये IAF च्या ताफ्यावर झालेला हल्ला ही स्टंटबाजी, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा..’ काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांचं विधान

एसटी कर्मचाऱ्यांना २० दिवस सक्तीची रजा; अंमलबजावणी सुरू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2020 7:31 PM

कोरोनामुळे केवळ ग्रामीण भागात एसटी सेवा सुरू आहे; परंतु सुरू असलेल्या बसला फारसा प्रतिसाद नाही.

ठळक मुद्देमंदीचा काळ म्हणून रजारविवारपासून पाठविले रजेवर

औरंगाबाद : कोरोना संकटामुळे तोट्यात आलेल्या एसटीने जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांना २०-२० दिवसांच्या सक्तीच्या रजेवर पाठविण्यास सुरुवात केली आहे. 

औरंगाबाद विभागात म्हणजे जिल्ह्यात एसटी महामंडळाचे एकूण ३ हजार कर्मचारी आहेत. यात शिपायापासून लिपिक, वाहनचालक, वाहक, यांत्रिकी विभागातील कामगारांचा समावेश होतो. या कर्मचाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात येत आहे. कोरोनामुळे केवळ ग्रामीण भागात एसटी सेवा सुरू आहे; परंतु सुरू असलेल्या बसला फारसा प्रतिसाद नाही. त्यामुळे तोटा वाढत आहे. कर्मचाऱ्यांच्या वेतनाला विलंब होत आहे. यावर पर्याय म्हणून मालवाहतूक सुरू केली. त्याला प्रतिसाद मिळत आहे. असे असताना जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांना २०-२० दिवसांच्या सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा आदेश दिला आहे.  एसटी महामंडळाच्या परिपत्रकानुसार रजेवर पाठविण्यात येत असल्याचे विभाग नियंत्रक अरुण सिया यांनी सांगितले. 

२० रजा पसंतीनुसार : एसटी कर्मचाऱ्यांना वर्षभरात ४० रजा देण्यात येतात. यातील निम्म्या रजा या मंदीच्या काळात देता येतात, तर उर्वरित २० रजा कर्मचारी पसंतीनुसार घेऊ शकतात. सध्या मंदीचा काळ असल्याने रजेवर पाठविणे क्रमप्राप्त असल्याचे मध्यवर्ती बसस्थानक आगार व्यवस्थापकांनी काढलेल्या आदेशात नमूद केले आहे.

रविवारपासून पाठविले रजेवर : मध्यवर्ती बसस्थानकातील २० कर्मचाऱ्यांना रविवारपासून रजेवर पाठविण्यात आले. अशाच प्रकारे प्रत्येक आगारात कर्मचाऱ्यांना रजेवर पाठविण्यात येत आहे. २० दिवस कापण्यात येणारी रजा ही अर्जित रजा असल्याने त्याचे वेतन एसटीला द्यावे लागणार आहे, असे असेल तर मग रजा कपात करण्याचा उद्देश काय, असा प्रश्न कामगार विचारत आहेत.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादstate transportएसटी