शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
5
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
6
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
7
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
8
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
9
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
10
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
11
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
12
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
13
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
14
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
15
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
16
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
17
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
18
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
19
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
20
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया

जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत १५ टक्के पाण्याची गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 11:50 PM

महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या भोंगळ कारभारावर पुणे येथील जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र होलानी यांनी शिक्कामोर्तब केले. जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत जलवाहिनीवर तब्बल १५ टक्के पाण्याची गळती असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ४५ किलोमीटरच्या जलवाहिन्यांवर फक्त २ टक्केगळती असणे अपेक्षित आहे.

ठळक मुद्देतज्ज्ञांचा अहवाल : गळती २ टक्क्यांवर आल्यास ३० टक्केफायदा

औरंगाबाद : महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या भोंगळ कारभारावर पुणे येथील जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र होलानी यांनी शिक्कामोर्तब केले. जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत जलवाहिनीवर तब्बल १५ टक्के पाण्याची गळती असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ४५ किलोमीटरच्या जलवाहिन्यांवर फक्त २ टक्केगळती असणे अपेक्षित आहे. पाणीपुरवठा विभागाने सक्षमपणे काम केल्यास शहराला ३० टक्के फायदा होईल, असे मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी आज पत्रकारांना सांगितले.शहरातील पाणीपुरवठ्याचा अभ्यास करण्यासाठी मनपा आयुक्तांनी दोन महिन्यांपूर्वी पुणे येथील जलतज्ज्ञ डॉ. होलानी यांच्या पथकाची नेमणूक केली. या पथकाने मागील एक महिन्यात जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंतच्या पाणीपुरवठ्याचा अत्यंत बारकाईने अभ्यास केला. या संबंधीचा अहवाल बुधवारी पॉवर पॉइंट पे्रझेंटेशनद्वारे मनपा आयुक्तांना सादर करण्यात आला. या अहवालातील काही ठळक वैशिष्ट्ये आयुक्तांनी पत्रकारांना सांगितली. जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत अनेक ठिकाणी लिकेज आहेत. काही गावांना पाणी देण्यात आले आहे. या पाण्याचा ताळमेळ कुठेच नाही. १५ टक्के या जलवाहिन्यांवर गळती असल्याचे नमूद करण्यात आले आहे. पाणीपुरवठ्याचे केबल, मोठे लिकेज बंद केल्यास शहराला ३० टक्केफायदा होईल. लवकरच होलानी यांची समिती शहरातील पाणीपुरवठ्याचा बारकाईने अभ्यास करून सूचना करणार आहे.

टॅग्स :water transportजलवाहतूकwater scarcityपाणी टंचाई