शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
5
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
6
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
7
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
8
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
9
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
10
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
11
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
12
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
13
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
14
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
15
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
16
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
17
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
18
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
19
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
20
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
Daily Top 2Weekly Top 5

गतवर्षीच्या तुलनेत ११० टक्के आवक कमी

By admin | Updated: October 29, 2014 00:45 IST

लातूर : गतवर्षीच्या तुलनेत यंदा पर्जन्यमान कमी झाल्यामुळे सोयाबीनचे उत्पन्न घटले असून, परिणामी आडत बाजारातील सोयाबीनची आवकही कमी आहे़

लातूर : गतवर्षीच्या तुलनेत यंदा पर्जन्यमान कमी झाल्यामुळे सोयाबीनचे उत्पन्न घटले असून, परिणामी आडत बाजारातील सोयाबीनची आवकही कमी आहे़ गतवर्षी सोयाबीनच्या विक्रीची १७० टक्के आवक होती़ तर यंदा ६० टक्क्यांवर ही आवक आली आहे़ शिवाय क्विंटलमागे ८० ते १०० रुपये भावही कमी आहे़ सध्या कृषीउत्पन्न बाजार समितीच्या आडत बाजारात ३५ ते ४० हजार क्विंटल सोयाबीनची आवक असून, भाव ३२४० रुपये आहे़ तर वायदा ३२१० निघाला आहे़ एकंदर आवकही कमी आणि भावही कमी अशी परिस्थिती सोयाबीनची झाली. लातूर जिल्ह्यात गेल्या काही वर्षापासून नगदी पिक म्हणून सोयाबीनकडे शेतकरी मोठ्या प्रमाणात वळले आहेत़ त्याला चांगला भावही मिळत आहे़ त्यामुळे दिवसेंदिवस सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ होत आहे़ परंतु यंदा कमी पर्जन्यमानामुळे सोयाबीनला फटका बसला आहे़ २० ते २५ टक्के उत्पन्न घटले आहे़ त्यामुळे सध्या आडत बाजारात ६० टक्के आवक आहे़ गतवर्षी आॅक्टोबर महिन्यात १७० टक्के सोयाबीनची आवक होती़ यंदा ११० टक्क्याने ही आवक घटली आहे़ सोयाबीन काढणीच्या व राशीच्या वेळी विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होत्या़ त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी अद्यापही सोयाबीनची रास केली नाही़ त्यामुळेही आवक कमी आहे़ राशी झाल्यानंतर आवक होईल, अशी शक्यता आडत व्यापारी व्यक्त करीत आहेत़ सध्या ८० ते १०० रुपयाने भाव कमी असला तरी, सोयाबीनला पुढील काही दिवसात गतवर्षी सारखा किंवा त्यापेक्षा अधिक भाव मिळू शकतो़ सध्या रबीच्या पेरण्या नाहीत़ त्यामुळेही शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीला काढले नाहीत़ परिणामी आवक कमी आहे़ रबी पेरणीचा खर्च भागविण्यासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात सोयाबीनची विक्री करतात, परंतु यंदा पेरण्या खोळंबल्या असल्याने सोयाबीनची विक्री होत नाही़ बाजार समितीच्या आकडेवाढीनुसार सोयाबीनची मंगळवारी २१ हजार ९९५ क्विंटलची आवक राहिली़ त्याचा कमाल भाव ३४५१ तर किमान ३००० रुपये व सर्वसाधारण भाव ३३२० रुपये होता़ गतवर्षी ३४२० ते ३४५० रुपये होता़ यंदा भावात केवळ ८० ते १०० रुपयाची घट आहे़ उत्पादनात, भावात घट असल्यामुळे तसेच गतवर्षीपेक्षा कमी उत्पन्न झाल्यामुळे आवक कमी आहे, असे आडत व्यापाऱ्यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)