शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षा व्यवस्थेविनाच राबताहेत कामगार

By admin | Updated: February 4, 2016 00:54 IST

येथील आयुध निर्माणी परिसरात खाजगी कंपनीद्वारे बिल्डींग उभारल्याचे काम सुरु आहे. काम बघण्यासाठी छतावर चढलेल्या एका अभियंत्यांचा वरील प्लेट घसरल्याने खाली पडून मृत्यू झाला.

छतावरून पडून अभियंत्यांचा मृत्यू : आयुध निर्माणी परिसरातील खासगी कंपनीचा प्रतापविनायक येसेकर भद्रावतीयेथील आयुध निर्माणी परिसरात खाजगी कंपनीद्वारे बिल्डींग उभारल्याचे काम सुरु आहे. काम बघण्यासाठी छतावर चढलेल्या एका अभियंत्यांचा वरील प्लेट घसरल्याने खाली पडून मृत्यू झाला. मंगळवारी घडलेल्या या घटनेनंतर ‘लोकमत’ने कंपनीत जाऊन पाहणी केली असता कंपनीकडून कामगारांना कोणतीही सुरक्षा दिली जात नसल्याचे दिसून आले.सुनील कांत शेती (२९) रा. बल्लीकुंडा (ओडिशा) असे मृत अभियंत्याचे नाव असून तो गेल्या चार महिन्यापासून एस.एम. या कंपनीमध्ये अभियंता पदावर कार्यरत होता. आयुध निर्माणी परिसरात पिनाका टू या नवीन प्रोजेक्टचे काम जोमाने सुरु असून हे काम डीआरटीओ यांच्या नेतृत्वात हैद्राबाद येथील काही खाजगी कंपन्या काम करीत आहे. श्री बालाजी कंट्रक्शन या कंपनीचे बिल्डींग उभारण्याचे काम असून त्याची देखरेख ठेवण्याचे काम एस.एम. कटेसेन्स कंपनीकडे आहे. घटनेच्या दिवशी पिनाका प्रोजेक्टमधील एच टू या बिल्डींगचे काम चालू असताना सुनील कांत शेती हा काम पाहण्यासाठी ९ मीटरवरील स्लॅब टाकण्यासाठी तयार केलेल्या प्लेटच्या छतावर हेल्मेट, बेल्ट इतर सेफ्टी साहित्य परिधान न करता चढला. चालताना छतावरील प्लेट घसरल्याने तो खाली कोसळला. यात त्याचा मृृृृृत्यू झाला. या घटनेची माहिती जाणून घेण्यासाठी प्रस्तुत प्रतिनिधीने कंपनीत जाऊन चौकशी केली असता अपुऱ्या सुरक्षा व्यवस्थेमुळे अभियंत्याचा जीव गेल्याची चर्चा होती. हे कामगार सुरक्षा व्यवस्थेविनाच काम करीत असल्याचेही दिसून आले.स्थानिक कामगारांना प्राधान्य नाहीआयुध निर्माणी परिसरात चालू असलेला पिनाका टू हा प्रोजेक्ट खूप मोठा असून यांच्या उभारणीचे काम डीआरडीओ यांनी हैदराबाद येथील दोन खाजगी कंपनीला दिली आहे. याच कामाकरिता मोठ्या प्रमाणात कामगार वर्गाची गरज भासत असल्याने कंपनीने स्थानिकांना रोजगार न देता परप्रांतीय कामगार व अभियंत्याचा मोठ्या प्रमाणात भरणा केला आहे. येथील स्थानिकांना रोजगार दिल्यास त्यांना लागणारी सेफ्टी, वेतन व इतर सुविधा जास्त प्रमाणात द्याव्या लागणार, या हेतूने कंपनीने परप्रांतियांचा भरणा करुन कामचलाऊ पध्दतीने काम सुरू ठेवले आहे.कंपनीतील ही तिसरी घटनायेथील कामगार, अभियंता ज्या वेळेस कामावर, साईडवर जातात, त्या वेळी कामगारांना कोणतीही सुरक्षा व्यवस्था पुरविली जात नाही. यामुळे यापूर्वीसुद्धा दोन घटना घडून एका कामगाराचा पायाला गंभीर दुखापत झाली तर दुसऱ्या कामगाराच्या हाताला दुखापत झाली होती. मात्र या कंपनीने घटनेची माहिती बाहेर येऊ दिली नाही. या घटनेमुळे जखमी कामगारांना कामापासून मुकावे लागले. या दोन घटना घडल्यानंतरही कंपनीने सुरक्षा व्यवस्थेबाबत काहीही केले नाही. त्यामुळे मंगळवारी अभियंत्याचा जीव गेला.