शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

वन्यजीवांसाठी जंगलात पाणवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 00:19 IST

वन्यजीव संवर्धन क्षेत्रात कार्यरत असलेल्या ‘सार्ड’ (सोशल अ‍ॅक्शन फॉर रूरल डेव्हलपेंट) या संस्थेच्या वतीने मध्य चांदा वनविभागातील बल्लारपूर वनपरिक्षेत्रातील कारवा बिटात संस्थेच्या व वनविभागाच्या मदतीने पानवठा तयार करण्यात आला. या पानवठ्यामुळे वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती थांबवणार आहे.

ठळक मुद्देवन्यप्राण्यांची भटकंती थांबणार : सार्ड संस्थेचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : वन्यजीव संवर्धन क्षेत्रात कार्यरत असलेल्या ‘सार्ड’ (सोशल अ‍ॅक्शन फॉर रूरल डेव्हलपेंट) या संस्थेच्या वतीने मध्य चांदा वनविभागातील बल्लारपूर वनपरिक्षेत्रातील कारवा बिटात संस्थेच्या व वनविभागाच्या मदतीने पानवठा तयार करण्यात आला. या पानवठ्यामुळे वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती थांबवणार आहे.तप्त उन्हामुळे वन्यप्राण्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. पाण्याअभावी अनेक प्राणी गावामध्ये शिरकाव करीत आहेत. त्यामुळे सार्ड संस्थेनी वन्यप्राण्यांच्या सोईसाठी पानवठा तयार केला. यावेळी बल्लारपूर वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे, सार्डचे अध्यक्ष प्रकाश कामडे, क्षेत्र सहाय्यक पी. आर. वेलमे, नियत वनरक्षक पी. वी. बोबाटे, सार्ड पदाधिकारी भािवक येरगुडे, संजय जावले, विलास माथनकर, मोंटी खंडेलवार, गुरपीतसिंग कलसी आदी उपस्थित होते.सार्ड संस्थेतर्फे जंगल भागातील नाल्यात एका ठिकाणी ओलसर भाग पाहून त्याच ठिकाणी खोदण्यात आले. पानवठा दोन फूट खोल वीस फूट लांब खोदताच त्या ठिकाणी पाणी लागले. सदर पाणी जून महिन्यापर्यंत पुरेल असा अंदाज आहे. पानवठ्यामुळे त्या भागातील लहान मोठे वन्यजीव, पक्षी, सरपणारे प्राणी व जून महिन्यापर्यंत पाण्यासाठी भटकंती बंद होणार आहे. याप्रसंगी संतोष थिपे यांनी संस्थेच्या सभासदांना प्रेरणा दिली. संस्थांनी वनविभागाला मदत केल्यास वन्यजीव व जंगलाच संरक्षण करणे सोपे जाईल असा आशावाद व्यक्त केला.पानवठ्यासाठी सार्ड संस्थेच्या २० सभासदांनी तसेच बल्लारपूर वनपरिक्षेत्रातील वनमजुरांनी श्रमदान केले. पानवठा खोदकामासाठी अब्दुल पठान, प्रशांत मैत्र, बादल टेंभुरकर, सचिन ढेंगले, महेंद्र राले, आनंद शर्मा, नितीन डोंगरे, सचिन धोटे यांच्यासह सार्ड संस्थेचे पदाधिकारी व सदस्य आदींनी प्रयत्न केले. 

टॅग्स :water shortageपाणीटंचाईforestजंगल