शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

मालकी हक्काची शेतकऱ्यांना प्रतीक्षा

By admin | Updated: February 5, 2015 23:06 IST

जमिनीचा पट्टा हा आपल्याला शासनाकडून मिळालेला हक्काचा दाखला असतो. मात्र, आंध्र सीमेवरील १४ गावातील शेतकऱ्यांना जमिनीचे पट्टेच मिळालेले नाही. येथील शेतकरी जमीन

संघरक्षित तावाडे - जिवतीजमिनीचा पट्टा हा आपल्याला शासनाकडून मिळालेला हक्काचा दाखला असतो. मात्र, आंध्र सीमेवरील १४ गावातील शेतकऱ्यांना जमिनीचे पट्टेच मिळालेले नाही. येथील शेतकरी जमीन कसून उत्पन्न तर घेतात मात्र, मालकी हक्क मिळालेला नाही. शेतीच्या पट्ट्यासाठी येथील शेतकऱ्यांनी शासनाकडे हट्ट धरला आहे. मात्र, दोन्ही राज्याच्या शासनाने अद्यापही कोणतीही कार्यवाही केलेली नाही. या गावांत रस्त्यांचाही प्रश्न तितकाच ऐरणीवर आहे. गावांचा विकास रस्त्याने होतो असे मानले जात असले तरी अनेक गावात रस्तेच पोहचले नाहीत. हिच स्थिती सीमेवरील चौदा गावांपैकी काही गावांची आहे. इंदिरानगर, पळसगुडा, नारायनगुडा, शंकरलोधी या गावांपर्यंत जाण्यासाठी रस्ताच नाही. परमडोली ते मुकदमगुडा हा तीन किमीचा रस्ता आंध्र शासनाने तयार केला तर दुसरीकडे मुकदमगुडा ते महाराजगुडा हा पाच किमीचा रस्त्यासाठी दोन-तीन वर्षापासून केवळ गिट्टी टाकून ठेवण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्र व आंध्र सरकार या गावांवर आपला दावा सांगत असले तरी विकास मात शून्य आहे. एकमेकांच्या हेव्यादाव्याने आमचा विकास होत नाही, दोन्ही राज्याच्या कचाट्यात सापडून आमचा विकास खुंटल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. जमिनीचे पट्टे असते तर दुष्काळ स्थितीत शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक मदत येथील शेतकऱ्यांना मिळाली असती. अडचणींच्या वेळेस कर्ज घेण्यास मदत झाली असती. मात्र, मालकी हक्कच नसल्याने शासनाच्या योजनांपासून येथील शेतकऱ्यांना मुकावे लागत आहे. शासन कधी लक्ष देणार याची नागरिकांना प्रतीक्षा आहे.