शहरं
Join us  
Trending Stories
1
बाजारात 'सुवर्ण' धास्ती, देशाला बचतीची संधी; देशाला 'आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी' बनवण्याचा निर्धार
2
आजचे राशी भविष्य: १२ मे २०२६: आर्थिक लाभ होईल, आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल
3
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
4
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
5
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
6
टिटवाळ्यात एक हजार चाळी बेकायदा, भूमाफियांकडे दुर्लक्ष; केडीएमसी महापालिकेसह पोलिसांचाही कानाडोळा
7
युद्धाचा भडका उडणार? अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा 'तो' प्रस्ताव फेटाळला, चिंता वाढली
8
मुंबईसह राज्यातील दुकाने, हॉटेल्स, मॉल्स २४ तास सुरू का नाहीत? उद्योग मंत्रालयाने निर्णय घेऊनही अंमलबजावणी नाही
9
अंबरनाथमध्ये आता शिंदेसेनेने भाजपपुढे ठेवला युतीचा प्रस्ताव, राजकीय खेळीची भाजपकडून चाचपणी
10
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
11
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
12
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
13
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
14
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
15
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
16
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
17
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
18
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
19
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
20
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
Daily Top 2Weekly Top 5

प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी गावकऱ्यांचा एल्गार

By admin | Updated: December 13, 2014 01:23 IST

तालुक्यातील नान्होरी हे गाव मोठे आणि महत्वाचे समजल्या जाते. या गावालगत १६ ग्रामपंचायती आहेत.

ब्रह्मपुरी : तालुक्यातील नान्होरी हे गाव मोठे आणि महत्वाचे समजल्या जाते. या गावालगत १६ ग्रामपंचायती आहेत. असे असताना अद्यापही या गावात प्राथमिक आरोग्य केंद्र देण्यात न आल्याने नान्होरीसह परिसरातील गावांतील नागरिकांची उपचारासाठी पायपीट होत आहे. अनेक वर्षांपासून मागणी केली जात असतानाही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने आता नागरिकांनी आंदोलनाचे हत्यार उपसण्याचा निर्णय घेतला आहे.
जुन्या काळात व आजही नान्होरी हे अनेक सामाजिक उपक्रमासाठी प्रसिद्ध आहे. अनेक पिढ्या या गावात शिकून मोठ्या झाल्या आहेत. अशा नान्होरी गावावर लोकप्रतिनिधी व शासकीय यंत्रणेद्वारा सातत्याने अन्याय करण्यात आला आहे. नान्होरी या मुख्य गावापासून दोन ते पाच किलोमिटर अंतरावर चहुबाजुने १६ ग्रामपंचायती आहेत. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी नान्होरी येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची निर्मिती व्हावी, अशी जुनी मागणी आहे. मात्र या मागणीकडे कायमच दुर्लक्ष करण्यात आले आहे. परिणामी नान्होरीचे उपसरपंच संजय शेंडे यांच्यासह गावकऱ्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राची मागणी पूर्ण करून घेण्यासाठी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.
भौगोलिकदृष्ट्या नान्होरी हे गाव मध्यवर्ती ठिकाण आहे. नान्होरीच्या सभोवतालदोन ते पाच किमी अंतरावर १६ गावे वसलेली आहेत. परंतु या सर्व गावांना सर्वसाधारण व गंभीर आजारावरील उपचारासाठी १५ ते २० किलोमिटरचा प्रवास करुन जावे लागत आहे. नान्होरी येथे प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी १६ ग्रामपंचायतींचा ठराव घेऊन तो चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांकडे एक वर्षापूर्वीच पाठविला आहे. गावकऱ्यांनी अनेक लोकप्रतिनिधींकडे या समस्यांचे निवेदनही दिले. परंतु अद्यापही ही मागणी पूर्णत्वास आली नसल्याने गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. साथीचे रोग अथवा अचानक ईजा झाल्यास हे नान्होरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र सर्वांसाठी सोयीचे ठरु शकते. त्यामुळे तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्राची मागणी मंजूर करण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा उपसरपंच संजय शेंडे यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)