शहरं
Join us  
Trending Stories
1
AirStrike on Pakistan: मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
2
जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
3
भारताच्या पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकवर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया...; 'ते खूप काळापासून लढतायत'
4
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
5
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
6
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
7
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
8
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
9
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
10
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
11
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
12
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
13
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
14
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
15
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
16
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
17
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
18
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
19
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
20
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय

आजपासून सकाळी ७ ते सायंकाळी ७ पर्यंत करता येणार व्यवहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:19 IST

चंद्रपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे जिल्ह्यात हाहाकार माजला. अनेकांचा यात बळी गेला. दरम्यान, एप्रिल महिन्यापासून लाॅकडाऊन करण्यात आले. सध्या ...

चंद्रपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे जिल्ह्यात हाहाकार माजला. अनेकांचा यात बळी गेला. दरम्यान, एप्रिल महिन्यापासून लाॅकडाऊन करण्यात आले. सध्या निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. मात्र कोरोनाची दहशत कायम आहे. त्यातच तिसऱ्या लाटेसंदर्भात तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने आजपासून बाजारपेठ खुली ठेवण्यासाठी दोन तासांची सवलत दिली आहे. त्यामुळे आता सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत व्यवहार करता येणार आहे.

कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्य शासनाने एप्रिल महिन्यामध्ये लाॅकडाऊन केले. केवळ जीवनावश्यक साहित्याचीच दुकाने सुरू होती. रुग्णसंख्या हळूहळू कमी झाल्यानंतर ७ जूनपासून कोरोना नियमांचे पालन करण्याच्या अटीवर प्रशासनाने सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत बाजारपेठेसह इतरही व्यवहार करण्यासाठी सूट दिली. यामुळे व्यापारी वर्गासह सामान्य नागरिकांना थोडाफार दिलासा मिळाला. मागील पंधरा दिवस याच पद्धतीने बाजारपेठ सुरू होती. दरम्यान, जिल्ह्यातील व्यापारी संघटनांनी जिल्हा प्रशासन तसेच पालकमंत्र्यांकडे बाजारपेठेची वेळ वाढवून देण्याची मागणी लावून धरली. विशेष म्हणजे, मागील काही दिवसांमध्ये रुग्णसंख्या झपाट्याने कमी झाल्यामुळे सध्या कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आल्यामुळे प्रशासन तसेच पालकमंत्र्यांनी निर्बंधामध्ये आणखी सूट देत बाजारपेठेचा वेळ दोन तासांनी वाढवून दिला आहे. त्यामुळे आजपासून बाजारपेठ सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. मात्र कोरोनाचा प्रत्येक नियम नागरिकांना पाळावा लागणार आहे. दरम्यान, शासकीय तसेच निमशासकीय कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरू असून सामान्य नागरिकांची कामे सुरू झाली आहेत. मात्र आठवडी बाजार, शाळा, मंदिरे, वाचनालये आदी सुरू करण्याबाबत शासनस्तरावर अद्यापही निर्णय झाला नसल्याने त्यावर निर्बंध मात्र कायम आहेत.

बाॅक्स

प्रशासनाचे आवाहन

नागरिकांनी कोरोना पूर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे. मास्कचा वापर करावा, वारंवार हात धुवावे, सुरक्षित अंतर राखावे या त्रिसूत्रीचा नियमित वापर करावा. स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र नागरिकांनी जवळच्या केंद्रावर कोरोनाची लस घ्यावी, प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

बाॅक्स

बाजारातील गर्दीवर नियंत्रण नाही

जिल्हा प्रशासनाने बाजारपेठ सुरू करण्यासंदर्भात सूट दिली आहे. आता तर वेळही वाढवून देण्यात आली आहे. मात्र नागरिकांनी अद्यापही कोरोनाला मनावर घेतलेच नसल्याचे चित्र बाजारात फेरफटका मारल्यानंतर दिसून येते. अनेक व्यावसायिक तसेच ग्राहकही मास्क न लावताच बिनदिक्कतपणे व्यवहार करीत आहेत. बहुतांश दुकानात सॅनिटायझर किंवा इतर साहित्याची व्यवस्था करण्यात आली नसल्याचे दिसून येते. त्यामुळे पुढील लाट रोखणे कठीण जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सूट दिली असली तरी नागरिक, व्यावसायिकांनी त्याचा गैरफायदा घेणे आपल्याच जीवावर बेतण्यासारखे आहे.