शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
2
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
3
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
4
“टॅरिफला विरोध करणारे मूर्ख, आम्ही अमेरिकेला श्रीमंत केले, इथे महागाई नाही”: डोनाल्ड ट्रम्प
5
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
6
जडेजा-सॅमसनच्या 'डील'मध्ये डेवाल्ड ब्रेव्हिसचा अडथळा, आयपीएलमध्ये चेन्नई, राजस्थान यांच्यात खेळाडूंची अदलाबदली होण्याची शक्यता
7
Kalbhairav Jayanti 2025: बुधवार १२ नोव्हेंबर कालभैरव जयंती; शिवाचे हे उग्ररूप कशासाठी?
8
बिहारमध्ये योगी आदित्यनाथ यांचा झंझावात, १० दिवसांत ३१ रॅली; काँग्रेस आणि RJD वर घणाघात
9
'नीट'च्या दोन मार्कलिस्ट अन् विद्यार्थिनीला धक्का, पालकही चिंताग्रस्त; कुटुंब निराशेच्या गर्तेत
10
विद्यापीठात पॉलिमर केमिस्ट्री प्रयोगशाळा; संशोधकांना मिळेल प्रेरणा, विकासात योगदान
11
आजचा अग्रलेख: भारतीयांची क्षमता जोखा, साखर नको!
12
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
13
कपड्यांवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवर पहिल्यांदाच बोलल्या अमृता फडणवीस, म्हणाल्या- "मला वाईट वाटतं, पण..."
14
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
15
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
16
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
17
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
18
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
19
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
20
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."

आजपासून सकाळी ७ ते सायंकाळी ७ पर्यंत करता येणार व्यवहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:19 IST

चंद्रपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे जिल्ह्यात हाहाकार माजला. अनेकांचा यात बळी गेला. दरम्यान, एप्रिल महिन्यापासून लाॅकडाऊन करण्यात आले. सध्या ...

चंद्रपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे जिल्ह्यात हाहाकार माजला. अनेकांचा यात बळी गेला. दरम्यान, एप्रिल महिन्यापासून लाॅकडाऊन करण्यात आले. सध्या निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. मात्र कोरोनाची दहशत कायम आहे. त्यातच तिसऱ्या लाटेसंदर्भात तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने आजपासून बाजारपेठ खुली ठेवण्यासाठी दोन तासांची सवलत दिली आहे. त्यामुळे आता सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत व्यवहार करता येणार आहे.

कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्य शासनाने एप्रिल महिन्यामध्ये लाॅकडाऊन केले. केवळ जीवनावश्यक साहित्याचीच दुकाने सुरू होती. रुग्णसंख्या हळूहळू कमी झाल्यानंतर ७ जूनपासून कोरोना नियमांचे पालन करण्याच्या अटीवर प्रशासनाने सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत बाजारपेठेसह इतरही व्यवहार करण्यासाठी सूट दिली. यामुळे व्यापारी वर्गासह सामान्य नागरिकांना थोडाफार दिलासा मिळाला. मागील पंधरा दिवस याच पद्धतीने बाजारपेठ सुरू होती. दरम्यान, जिल्ह्यातील व्यापारी संघटनांनी जिल्हा प्रशासन तसेच पालकमंत्र्यांकडे बाजारपेठेची वेळ वाढवून देण्याची मागणी लावून धरली. विशेष म्हणजे, मागील काही दिवसांमध्ये रुग्णसंख्या झपाट्याने कमी झाल्यामुळे सध्या कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आल्यामुळे प्रशासन तसेच पालकमंत्र्यांनी निर्बंधामध्ये आणखी सूट देत बाजारपेठेचा वेळ दोन तासांनी वाढवून दिला आहे. त्यामुळे आजपासून बाजारपेठ सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. मात्र कोरोनाचा प्रत्येक नियम नागरिकांना पाळावा लागणार आहे. दरम्यान, शासकीय तसेच निमशासकीय कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरू असून सामान्य नागरिकांची कामे सुरू झाली आहेत. मात्र आठवडी बाजार, शाळा, मंदिरे, वाचनालये आदी सुरू करण्याबाबत शासनस्तरावर अद्यापही निर्णय झाला नसल्याने त्यावर निर्बंध मात्र कायम आहेत.

बाॅक्स

प्रशासनाचे आवाहन

नागरिकांनी कोरोना पूर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे. मास्कचा वापर करावा, वारंवार हात धुवावे, सुरक्षित अंतर राखावे या त्रिसूत्रीचा नियमित वापर करावा. स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र नागरिकांनी जवळच्या केंद्रावर कोरोनाची लस घ्यावी, प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

बाॅक्स

बाजारातील गर्दीवर नियंत्रण नाही

जिल्हा प्रशासनाने बाजारपेठ सुरू करण्यासंदर्भात सूट दिली आहे. आता तर वेळही वाढवून देण्यात आली आहे. मात्र नागरिकांनी अद्यापही कोरोनाला मनावर घेतलेच नसल्याचे चित्र बाजारात फेरफटका मारल्यानंतर दिसून येते. अनेक व्यावसायिक तसेच ग्राहकही मास्क न लावताच बिनदिक्कतपणे व्यवहार करीत आहेत. बहुतांश दुकानात सॅनिटायझर किंवा इतर साहित्याची व्यवस्था करण्यात आली नसल्याचे दिसून येते. त्यामुळे पुढील लाट रोखणे कठीण जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सूट दिली असली तरी नागरिक, व्यावसायिकांनी त्याचा गैरफायदा घेणे आपल्याच जीवावर बेतण्यासारखे आहे.