शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
3
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
4
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
5
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
6
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
7
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
8
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
9
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?
10
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
11
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
12
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
13
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
14
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
15
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
16
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
17
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
18
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
19
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
20
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार

आजपासून सकाळी ७ ते सायंकाळी ७ पर्यंत करता येणार व्यवहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:19 IST

चंद्रपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे जिल्ह्यात हाहाकार माजला. अनेकांचा यात बळी गेला. दरम्यान, एप्रिल महिन्यापासून लाॅकडाऊन करण्यात आले. सध्या ...

चंद्रपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे जिल्ह्यात हाहाकार माजला. अनेकांचा यात बळी गेला. दरम्यान, एप्रिल महिन्यापासून लाॅकडाऊन करण्यात आले. सध्या निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. मात्र कोरोनाची दहशत कायम आहे. त्यातच तिसऱ्या लाटेसंदर्भात तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने आजपासून बाजारपेठ खुली ठेवण्यासाठी दोन तासांची सवलत दिली आहे. त्यामुळे आता सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत व्यवहार करता येणार आहे.

कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्य शासनाने एप्रिल महिन्यामध्ये लाॅकडाऊन केले. केवळ जीवनावश्यक साहित्याचीच दुकाने सुरू होती. रुग्णसंख्या हळूहळू कमी झाल्यानंतर ७ जूनपासून कोरोना नियमांचे पालन करण्याच्या अटीवर प्रशासनाने सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत बाजारपेठेसह इतरही व्यवहार करण्यासाठी सूट दिली. यामुळे व्यापारी वर्गासह सामान्य नागरिकांना थोडाफार दिलासा मिळाला. मागील पंधरा दिवस याच पद्धतीने बाजारपेठ सुरू होती. दरम्यान, जिल्ह्यातील व्यापारी संघटनांनी जिल्हा प्रशासन तसेच पालकमंत्र्यांकडे बाजारपेठेची वेळ वाढवून देण्याची मागणी लावून धरली. विशेष म्हणजे, मागील काही दिवसांमध्ये रुग्णसंख्या झपाट्याने कमी झाल्यामुळे सध्या कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आल्यामुळे प्रशासन तसेच पालकमंत्र्यांनी निर्बंधामध्ये आणखी सूट देत बाजारपेठेचा वेळ दोन तासांनी वाढवून दिला आहे. त्यामुळे आजपासून बाजारपेठ सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. मात्र कोरोनाचा प्रत्येक नियम नागरिकांना पाळावा लागणार आहे. दरम्यान, शासकीय तसेच निमशासकीय कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरू असून सामान्य नागरिकांची कामे सुरू झाली आहेत. मात्र आठवडी बाजार, शाळा, मंदिरे, वाचनालये आदी सुरू करण्याबाबत शासनस्तरावर अद्यापही निर्णय झाला नसल्याने त्यावर निर्बंध मात्र कायम आहेत.

बाॅक्स

प्रशासनाचे आवाहन

नागरिकांनी कोरोना पूर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे. मास्कचा वापर करावा, वारंवार हात धुवावे, सुरक्षित अंतर राखावे या त्रिसूत्रीचा नियमित वापर करावा. स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र नागरिकांनी जवळच्या केंद्रावर कोरोनाची लस घ्यावी, प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

बाॅक्स

बाजारातील गर्दीवर नियंत्रण नाही

जिल्हा प्रशासनाने बाजारपेठ सुरू करण्यासंदर्भात सूट दिली आहे. आता तर वेळही वाढवून देण्यात आली आहे. मात्र नागरिकांनी अद्यापही कोरोनाला मनावर घेतलेच नसल्याचे चित्र बाजारात फेरफटका मारल्यानंतर दिसून येते. अनेक व्यावसायिक तसेच ग्राहकही मास्क न लावताच बिनदिक्कतपणे व्यवहार करीत आहेत. बहुतांश दुकानात सॅनिटायझर किंवा इतर साहित्याची व्यवस्था करण्यात आली नसल्याचे दिसून येते. त्यामुळे पुढील लाट रोखणे कठीण जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सूट दिली असली तरी नागरिक, व्यावसायिकांनी त्याचा गैरफायदा घेणे आपल्याच जीवावर बेतण्यासारखे आहे.