शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
2
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
3
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
4
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
5
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
6
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
7
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
8
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
9
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
10
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
11
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
12
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
13
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
14
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
15
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
16
अधिकाधिक हिंदू तरुणींवर बलात्कार करण्याचं होतं लक्ष्य, भोपाळ लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक दावा 
17
पहलगाम हल्ल्याचा दणका! भारताकडून पाकिस्तानचा ऑलिम्पिक विजेता अर्शद नदीम BLOCK!!
18
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
19
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
20
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!

एफडीसीएममध्ये वाघ वाढले

By admin | Updated: May 19, 2017 01:18 IST

जिल्ह्यात वनविकास महामंडळाचे (एफडीसीएम) पश्चिम चांदा, मध्य चांदा व ब्रह्मपुरी असे तीन वनप्रकल्प आहेत.

पश्चिम चांदा, मध्य चांदा, ब्रह्मपुरी क्षेत्र : वन्यप्राण्यांचे उत्कृष्ट संरक्षणाचा अधिकाऱ्यांचा दावा लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : जिल्ह्यात वनविकास महामंडळाचे (एफडीसीएम) पश्चिम चांदा, मध्य चांदा व ब्रह्मपुरी असे तीन वनप्रकल्प आहेत. या तिन्ही प्रकल्पांत वाघांच्या संख्येत वाढ झाली आहे. वन्यप्राण्यांच्या उत्कृष्ट संरक्षणामुळे हे शक्य झाल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे. तसेच मानव-वन्यजीव संघर्षाच्या घटना नगण्य स्वरूपात घडल्याचेही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. वनविकास महामंडळाचे ८५१८५.२८३ हेक्टर एवढे क्षेत्र आहे. यात पश्चिम चांदा वनप्रकल्प विभागाचे एकूण क्षेत्र २३९३७.९१० हेक्टर, मध्यचांदा वनप्रकल्प विभागाचे एकूण क्षेत्र ३११३४.६३२ हेक्टर व ब्रह्मपुरी वनप्रकल्प विभागाचे एकूण क्षेत्र ३०१३२.७४१ हेक्टर इतके आहे. विविध योजनेतंर्गत कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले आहेत. काही ठिकाणी बोअरवेल तयार करण्यात आल्या आहेत. त्यामुळे वन्यप्राणी गावांकडे येत नाही. या प्रदेशातील जुनोना, डोंगरहळदी, पोंभूर्णा, कन्हाळगाव, बाळापूर, सिंदेवाही या भागात वन्यप्राणी मोठ्या संख्येत आहेत. पाणवठ्याजवळ मचाण तयार करून त्यावर दिवस-रात्र निगराणी ठेवली जाते. तसेच ज्या क्षेत्रात वाघ, बिबट्याचा वावर जास्त प्रमाणात आहे, त्या ठिकाणी ठळक फलक लावून गावकऱ्यांना तेथे जाण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. वनविकास महामंडळाच्या क्षेत्रात निष्कासन, रोपवन यासारखी कामे नेहमी सुरू असतात. त्यामुळे वनकर्मचारी नेहमी जंगलात जात असतात. तसेच दिवस-रात्र कर्मचाऱ्यांची गस्त सुरू आहे. त्यामुळे वनविकास महामंडळाच्या क्षेत्रात वाघ किंवा इतर वन्यप्राण्यांच्या शिकारीच्या घटना घडलेल्या नाही. तसेच मानव-वन्यप्राणी संघर्षाच्या घटनासुद्धा या वर्षात कमी प्रमाणात आहेत. वन्यप्राण्यांच्या संख्येतसुद्धा वाढ होत आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सन २०१७ मध्ये बुद्धपौर्णिमेच्या दिवशी १० ते ११ मे या कालावधीत उत्तर चंद्रपूर प्रदेशातंर्गत पश्चिम चांदा, मध्यचांदा व ब्रह्मपुरी वनप्रकल्प विभागातील एकूण ६० पाणवठ्यांवर वन्यप्राण्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. प्रत्येक पाणवठ्यावर एक कर्मचारी व एक स्वयंसेवी संस्थेचे सदस्य नेमण्यात आले होते. स्वयंसेवी संस्थेच्या ११ सदस्यांनी या कार्यक्र्रमात भाग घेतला. उत्तर चंद्रपूर प्रदेशातील तिन्ही विभागांत एकूण ९ वाघ, २ बिबटे, २१ अस्वल, ६२ रानकुत्रे, १०५ रानगवे, ४७७ चितळ, ७१ सांबर, १५५ नीलगायी आढळून आल्या. इतर बरेच प्राणीसुद्धा पाणवठ्यांवर आल्याची माहिती आहे.