शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
3
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
4
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
5
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
6
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
7
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
8
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
9
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
10
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
11
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
12
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
13
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
14
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
15
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
16
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
17
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
18
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
19
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
20
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
Daily Top 2Weekly Top 5

सात गावात चार महिन्यांपासून वाघाची दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 05:00 IST

सध्या जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता देशात व संपूर्ण राज्यात सर्वत्र लॉकडाऊन व संचारबंदी लागू करण्यात आली होती. याला आता हळूहळू तीन महिण्यांचा कालावधी पूर्ण झालेला आहे. आता लॉकडाऊनमधे थोडीफार शिथिलता दिल्याने ग्रामीण भागातील गोरगरीब जनता आपले जनजीवन रुळावर आणण्यासाठी प्रयत्न करीत आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांनी कशी करावी शेती? : शर्मिला वाघिणीने घेतले पाच बळी

प्रकाश पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कमासळ बु. : चिमूर तालूक्यातील व ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या पायथ्याशी पळसगाव, खडसंगी व चिमूर बफर वनपरिक्षेत्रातील सात गावात मागील तीन ते चार महिन्यांपासून शर्मिली नावाच्या वाघिणीसह तिच्या तीन बछड्यांनी अक्षरश: धूमाकूळ घालून चांगलीच दहशत माजवली आहे. या वाघिणीने आतापर्यत पाच जणांचा बळी घेतला आहे. त्यामुळे मासळ परिसरातील सातही गावातील नागरिक शेती कशी करायची या विवंचनेत आहेत. त्यांचा वनविभागप्रति रोषही वाढला आहे.सध्या जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता देशात व संपूर्ण राज्यात सर्वत्र लॉकडाऊन व संचारबंदी लागू करण्यात आली होती. याला आता हळूहळू तीन महिण्यांचा कालावधी पूर्ण झालेला आहे. आता लॉकडाऊनमधे थोडीफार शिथिलता दिल्याने ग्रामीण भागातील गोरगरीब जनता आपले जनजीवन रुळावर आणण्यासाठी प्रयत्न करीत आहे.चिमूर तालुक्याची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे. आता मृग नक्षत्र सुरू झाल्याने शेतकरी वर्ग शेतीच्या कामात लागला आहे. त्यात चिमूरपासून १५ किमी अंतरावर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आहे. या प्रकल्पाजवळील मासळ बु, कोलारा, सातारा, बामनगाव, मदनापूर, देवळी, करबडा या गावातील शेती जंगलाला लागून आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना शेतावर जावे लागते. मात्र अश्यातच जंगली प्राणी हल्ला करतात.यामध्ये शेतकºयांचा नाहक बळी जात आहे. मागील पाच महिन्यात मासळ, कोलारा, सातारा, बामनगाव या गावातील पाच लोकांना वाघाच्या हल्ल्यात जीव गमवावा लागला. त्यामुळे आता या गावातील नागरिकांत भीती पसरली असून आता शेतीचे कामे कशी करायची, ही चिंता आहे. वनविभागाने याकडे आता लक्ष देण्याची गरज आहे.मृताच्या कुटुंबीयांना तात्काळ मदतशेतीचे काम करताना वाघाच्या हल्ल्यात कोलारा येथील राजेश दडमल यांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी उघडकीस आली. मृतकाच्या कुटुंबीयांना वनविभागाने तत्काळ पाच लाख रुपयांची मदत दिली. उर्वरित रक्कम मृतकाचा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर देण्यात येईल, असे आश्वासन वन विभागाने दिले. यावेळी डिएफओ गुरू प्रसाद, एसीएफ जाधव, डिसीएफ लडकत, एसीफ खोरे, पोलीस निरीक्षक स्वप्नील धुळे, वनपरिक्षेत्र अधिकारी ठेमस्कर उपस्थित होते.

टॅग्स :Tigerवाघ