शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
2
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
3
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
4
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
5
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
6
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
7
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
8
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
9
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
11
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
12
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
13
IPL 2026: एकही टी-२० सामना खेळला नाही, तरीही 'हा' खेळाडू घेऊ शकतो मुंबई इंडियन्समध्ये रोहितची जागा!
14
IPL 2026: 'मुंबई इंडियन्स'च्या ताफ्यात आला नवा खेळाडू; कोण आहे 'मिस्टर हँडसम'?
15
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
16
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
17
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
18
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
19
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
20
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
Daily Top 2Weekly Top 5

वाघाची दहशत अन्‌ भयभीत ग्रामीण जनता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:32 IST

पंधरवड्यात वाघाने घेतला चारजणांचा बळी मूल : तालुक्यात बफर व नॉनबफर असे वनविभागाचे कार्यालय असून, या दोन्ही वनविभागाच्या ...

पंधरवड्यात वाघाने घेतला चारजणांचा बळी

मूल : तालुक्यात बफर व नॉनबफर असे वनविभागाचे कार्यालय असून, या दोन्ही वनविभागाच्या जंगलात वाघाची दहशत असल्याने ग्रामीण भागातील जनता भयभीत झाली आहे. या पंधरवडयात वाघाने चारजणांचा बळी घेतला आहे.

ग्रामीण भागातील जनता आपल्या उदरनिर्वाहासाठी सरपणासाठी लाकडे असोत किंवा मोहफूल असो जंगलात जात असतात. वनविभाग वेळोवेळी सावधान करीत असतानादेखील ग्रामीण जनता ऐकण्याच्या मन तीत दिसत नसल्याने मानव व प्राणी संघर्ष निरंतर सुरूच राहणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

शासनाने नॉनबफर असलेल्या मूल वनपरिक्षेत्राचे विभाजन करून मूल येथे बफरचे वनपरिक्षेञ कार्यालय निर्माण करण्यात आले; तर नॉनबफरमधील भाग चिचपल्ली वनपरिक्षेत्राला जोडण्यात आला. या दोन्ही वनपरिक्षेत्रात वाघाचा वावर मोठया प्रमाणात आहे. तालुक्यातील जानाळा, चिरोली, चिचाळा, दहेगाव, मानकापूर, मारोडा, करवन, काटवन, सोमनाथ आदी बफर व नॉनबफर क्षेत्रात दिवसाढवळया वाघांचे दर्शन होऊ लागले आहे. वाघ कधी रस्त्यावर ठाण मांडून बसलेला आढळून येत आहे, तर कधी शेतात त्याचे पायाचे ठसे दिसून येत आहेत. त्यामुुळे परिसरातील भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पंधरवड्यात वाघाने चारजणांना हल्ला करून ठार केले आहे. यात कल्पना वाढई (कांतापेेेठ), कीर्तीराम कुुळमेथे (जानाळा), वसंत गेडाम (जानाळा), मनोहर प्रधाने (मारोडा) यांचा समावेश आहे.

बॉक्स

जंगलात जाणे सुरूच

बफर व नॉनबफर वनविभागाच्या जंगलात शेती असल्याने शेतीसाठी जंगलात जावेच लागते. तसेच रोजगार हमीचे काम असो किंवा मोहफुले, सरपणासाठी लाकडे, गुराची चराई असो, जंगलात जाणे आवश्यक आहे. वाघाच्या भीतीने आपला व्यवसायाकडे पाठ फिरविणे शक्य नसल्याचे मत ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत. त्यामुळे असले वाघाचे हल्ले हे होतच राहिले, तर शासनाचादेखील करोडो रुपयांचा निधी यात खर्च तर होईलच; मात्र घरातील कमावता व्यक्तीला गमवावे लागणार आहे. यासाठी शासनाने कायमस्वरूपी तोडगा काढून मानव व प्राणी संघर्षाला पूर्णविराम देण्याची आवश्यकता आहे.