शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
5
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
8
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
9
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
10
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
11
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
12
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
13
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
14
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
15
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
16
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
17
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
18
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
19
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
20
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर

जिल्ह्यात वर्षभरात वाघाने घेतला ४० जणांचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2021 12:40 PM

यावर्षी ११ महिन्यांत वाघांनी तब्बल ४० बळी घेतले असून प्रत्येक घटनेनंतर गावकरी आणि वनविभाग आमने-सामने असतो. वनविभागाने वनपरिक्षेत्र आणि वाघांचे हल्ले थांबविण्यासाठी उपाययोजनाही सपशेल नापास झाल्याचे वाढत्या हल्ल्यांवरून दिसून येते.

राजेश भोजेकर

लोकमत न्यूज नेटवर्क

चंद्रपूर : वाघांसाठी प्रसिद्ध असलेल्या चंद्रपूर जिल्हा आता वाघांच्या हल्ल्याने हादरला आहे. पहिल्यांदाच ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर क्षेत्रात वाघाने हल्ला चढवून वनरक्षक स्वाती ढुमणे यांचा बळी घेतला.

यापाठोपाठ पोंभुर्णा वनपरिक्षेत्रही पहिल्यांदाच वाघाच्या हल्ल्यांनी चर्चेत आले आहे. येथे वाघाने दोघांचा बळी घेतला आहे. लोकलेखा समिती प्रमुख आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी वाघाला जेरबंद न केल्यास आंदोलनाचा इशारा दिल्याने पुन्हा एकदा वन्यजीव-मानव संघर्षाची ठिणगी पडली आहे.

यावर्षी ११ महिन्यांत वाघांनी तब्बल ४० बळी घेतले आहे. प्रत्येक घटनेनंतर गावकरी आणि वनविभाग आमने-सामने असतो. वनविभागाने वनपरिक्षेत्र आणि वाघांचे हल्ले थांबविण्यासाठी उपाययोजनाही सपशेल नापास झाल्याचे वाढत्या हल्ल्यांवरून दिसून येते. ताडोबाच्या कोअरमध्ये वाघाचा हल्ला झाला आणि एका वनरक्षकाला जीव गमवाला लागला. आधीच वनविभागाने दक्षता घेतली असती तर हा हल्ला रोखता आला असता. वाघांच्या क्षेत्रातच वनविभाग गाफील राहत असेल तर अन्य भागात होणारे हल्ले रोखण्यात वनविभाग कितपत सतर्क आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.

वनविभाग आणि वाघांचे हल्ले

बल्लारपूर - २चंद्रपूर - ४ भद्रावती - ३ नागभीड - १पोंभूर्णा - २ सावली - ४ शिवणी - १ सिंदेवाही - ४ तळोधी (बा.) - ४मूल बफर - ४चिचपल्ली - ३साउथ ब्रम्हपुरी - ३ताडोबा कोअर - ३पिपर्डा (ता. चिमूर) - १मोहर्ली (बफऱ) - १

माजी वनमंत्र्यांचा वनविभागाला इशारा

पोंभूर्णा वनपरिक्षेत्रात अलिकडच्या काळात वाघाने आठ जणांना जखमी केले आहे. तर, दोघांचा बळी घेतला आहे. या भागात पहिल्यांदा वाघाची इतकी दहशत पसरली आहे. हा परिसर बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात मोडतो. माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवारांचा हा मतदारसंघ आहे. त्यांच्या क्षेत्रात हे हल्ले होत असल्याने त्यांनी, वाघ त्वरित पकडा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा वनविभागाला दिलेला आहे.

टॅग्स :environmentपर्यावरणTigerवाघDeathमृत्यूwildlifeवन्यजीव