वाघ मृत्यू प्रकरण; मानद वन्यजीव रक्षकांच्या चुप्पीवर प्रश्नचिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 11:15 AM2018-03-01T11:15:12+5:302018-03-01T11:15:21+5:30

उपचाराविना विव्हळत ‘येडा अण्णा’चा मृत्यू झाला. या घटनेने वनविभागावर चोहोबाजूने टीकेची झोड उठली आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत

Tiger case episode; Question mark on the silence of Honorary Wildlife Guard | वाघ मृत्यू प्रकरण; मानद वन्यजीव रक्षकांच्या चुप्पीवर प्रश्नचिन्ह

वाघ मृत्यू प्रकरण; मानद वन्यजीव रक्षकांच्या चुप्पीवर प्रश्नचिन्ह

Next
ठळक मुद्देमृत वाघाच्या पंचनाम्यावर स्वाक्षरीपुरतेच महत्त्व असल्याची खंत

राजेश भोजेकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : उपचाराविना विव्हळत ‘येडा अण्णा’चा मृत्यू झाला. या घटनेने वनविभागावर चोहोबाजूने टीकेची झोड उठली आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. तरीही जिल्ह्यातील तीनपैकी एकही मानद वन्यजीव रक्षक या घटनेबाबत उघड बोलायला तयार नाही. वन्यजिवांबाबत तत्परता दाखविणारी ही मंडळी इतकी शांत का, असा सवाल उपस्थित होत आहे.
सुमारे दहा वर्षांपूर्वी अदानी प्रकल्पामुळे आधीच प्रदूषित असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील प्रदूषणात मोठ्या प्रमाणावर वाढ होईल. याहीपेक्षा गंभीर बाब म्हणजे या प्रस्तावित प्रकल्पामुळे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वन्यजिवांचे अस्तित्वच धोक्यात येईल, अशी भूमिका घेऊन पर्यावरणवाद्यांनी तीव्र आंदोलन उभारले होते. मुद्दा चंद्रपूर जिल्ह्याच्या हिताचा होता. यामुळे चंद्रपूरकरांचीही चांगलीच साथ लाभली. इको-प्रोचे बंडू धोत्रे यांनी तर आमरण उपोषण केले होते. या आंदोलनाची दखल केंद्र सरकारला घ्यावी लागली. आणि अदानीला येथून परत जावे लागले होते. उपचाराविना मरण पावलेला वाघही ताडोबातीलच होता. लगतच्या वनपरिक्षेत्रात जखमांनी विव्हळत त्याचा मृत्यू झाला. चार दिवसांपासून त्याच्या बातम्या वृत्तपत्रात झळकत असतानाही जिल्ह्यातील तीनपैकी एकही मानद वन्यजीव रक्षक वाघाच्या मदतीला धावून गेला नाही. मानद वन्यजीव रक्षक बंडू धोत्रे हे शवविच्छेदन करताना उपस्थित होते. एका स्थानिक वन्यजीव प्रतिनिधी व्यतिरिक्त विवेक करंबेकर व अमोल बैस हे दोन्ही मानद वन्यजीव रक्षक कुठेही दिसले नाही.
या घटनेनतंरही ही मंडळी आपली भूमिका पुढे येऊन स्पष्ट करताना दिसली नाही. यामुळे वन्यजीवांचा वाली कोण, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. एका व्हॉट्सअ‍ॅप गु्रपवर तर एका वन्यजीवप्रेमीने ‘झाले ते झाले यानंतर तत्परता दाखवावी म्हणजे झाले’, अशी पोस्ट टाकली आहे. या पोस्टमधून वाघावर वेळीच उपचार का झाले नाही हे ठासून विचारण्याऐवजी अधिकारी दुखावू नये याचीच काळजी घेतल्याचे दिसून येते.

आम्ही मानद वन्यजीव रक्षक नावालाच ठरलो आहे. वनविभागाचे अधिकारी केवळ वाघ मरण पावला तर पंचनाम्यावर स्वाक्षरी करण्याकरिता बोलावतात. कधी कुठल्या बैठकांनाही बोलावत नाही. वाघ जखमी होता. मात्र उपचाराबाबत काय भूमिका घेतली पाहिजे हे विचारणे तर सोडाच या घटनेचीही माहिती दिलेली नाही. अधिकारी वनमंत्र्यांचीही दिशाभूल करीत आहेत. आम्हीच अशा घटना वनमंत्र्यांपर्यंत पोहचवितो. फक्त विश्वासातल्या लोकांनाच हे अधिकारी सांगत असतात.
- अमोल बैस, मानद वन्यजीव रक्षक, चंद्रपूर.

वनविभागाने ही घटना कळविलीच नाही. स्वयंसेवी संस्थांमार्फत ही माहिती मिळाली. वनविभाग असा का करतो हे मात्र सांगू शकत नाही. वाघावर उपचार करण्यात दिरंगाई झाली हे जगजाहीर आहे. वनमंत्र्यांनी अहवाल मागितला आहे. त्या अहवालात अधिकारी काय लिहून देतात हे कळेलच. त्यानंतरच आपली भूमिका घेणार आहे. हे प्रकरण ‘लोकमत’मुळेच उजागर झाले.
- विवेक करंबेकर, मानद वन्यजीव रक्षक, ब्रह्मपुरी.

गंभीर स्वरपाच्या जखमी वाघावर उपचार करण्यासाठी एसओपीच्या नियमावलीत शिथिलता असावी. तसे झाल्यास अशा घटना टाळता येतील, असे पत्र एनटीसीएला पाठविले आहे.
- बंडू धोत्रे, मानद वन्यजीव रक्षक, चंद्रपूर.

Web Title: Tiger case episode; Question mark on the silence of Honorary Wildlife Guard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tigerवाघ