शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णकल्याण समित्यांचा निधी थांबविला

By admin | Updated: December 31, 2015 00:45 IST

ग्रामीण भागातील जनतेला आरोग्याच्या दृष्टीने प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र महत्त्वाची आहेत.

अत्यावश्यक सेवांची अडचण : राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान कोलमडलेअनेकश्वर मेश्राम बल्लारपूरग्रामीण भागातील जनतेला आरोग्याच्या दृष्टीने प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र महत्त्वाची आहेत. या केंद्राच्या माध्यमातून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांचा तुटवडा व रुग्ण कल्याण समित्यांचा निधी अडविण्यात आल्याने राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान कोलमडले आहे. आजघडीला ७० ते ८० टक्के जनता ग्रामीण भागात वास्तव्याला आहे. शासन व्यवस्थेचा केंद्रबिंदू ग्रामीण जनता असून सुलभ आरोग्य सेवा मिळणे, क्रमप्राप्त आहे. ‘आरोग्य ज्याचे घरी, लक्ष्मी तेथे वास करी’ असे असताना सार्वजनिक आरोग्य विभागाने ग्रामीण जनतेला वाऱ्यावर सोडल्यागत स्थितीत आणून ठेवले आहे. परिणामी जनतेला खासगी दवाखाण्याची वाट धरून आर्थिक भार सहन करण्याची वेळ आली आहे. यावर उपाययोजना करण्यास सद्यातरी आरोग्य विागाला यश आले नाही. अपुऱ्या मनुष्यबळाचा व निधीच्या कमतरतेचा थेट फटका रुग्णसेवेवर अवलंबून असणाऱ्या ग्रामीण नागरिकांना सोसावा लागत आहे.ग्रामीण जनतेचे आरोग्यमान उंचावण्यासाठी व सुलभ आरोग्य सेवा देण्यासाठी जिल्ह्यात एकूण ५८ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ३३९ आरोग्य उपकेंद्र कार्यरत आहेत. जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे यावर नियंत्रण आहे. यातील बहुतेक आरोग्य केंद्र व उपकेंद्र आदिवासी व दुर्गम भागात आहेत. अनेक ठिकाणी वैद्यकीय अधिकारी आहेत, तर परिचारिका नाही. तर कुठे औषधी निर्माताच नाही, अशी अवस्था सार्वजनिक आरोग्य सेवेची झाली आहे. फिरते आरोग्य पथक कार्यरत आहेत. मात्र त्याला नावापुरतेचे मर्यादित ठेवण्यात आल्याचा प्रकारही दिसून येत आहे.आरोग्य सेवा देण्याच्या अनुषंगाने प्राथमिक आरोग्य केंद्र व आरोग्य उपकेंद्र स्तरावर वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, सहायक प्रसविका, आरोग्य सहायक, औषधी संयोजक, आरोग्य सेवक, आरोग्य विस्तार अधिकारी, कुष्ठरोग तंत्रज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आदी पदाला मंजुरी आहे. मात्र यातील कित्येक पदे काही महिन्यापासून भरण्यात आलेच नाही. याचा विपरित परिणाम रुग्णांवर होत आहे. दुर्गम भागात आरोग्य सेवा दुर्लभ झाली असून याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे.