शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
5
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
6
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
7
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
8
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
9
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
10
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
11
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
12
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
13
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
15
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

भाजीबाजारातील कचऱ्यामुळे दुर्गंधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:40 IST

भद्रावती तालुक्यात अवैधरित्या प्रवासी वाहतूक जोरात भद्रावती : तालुक्याला जोडणाऱ्या विविध मार्गांवर मागील काही दिवसांपासून अवैध प्रवासी वाहतूक सुरू ...

भद्रावती तालुक्यात अवैधरित्या प्रवासी वाहतूक जोरात

भद्रावती : तालुक्याला जोडणाऱ्या विविध मार्गांवर मागील काही दिवसांपासून अवैध प्रवासी वाहतूक सुरू आहे. त्यामुळे दररोज किरकोळ अपघात होत आहेत. या मार्गांवरील वृक्षांवर रेडियम पट्टी नाही. मात्र, प्रवाशांची काळजी न घेता चालक मनमर्जीने वाहन दामटवतात. त्यामुळे या रस्त्यांवरील अवैध प्रवासी वाहतुकीला आळा घालण्याची मागणी केली जात आहे.

गडचांदूर - पांढरकवडा बसअभावी प्रवाशांची ताटकळ

गडचांदूर : येथून कोरपना, आदिलाबादमार्गे पांढरकवडा शहरासाठी थेट बससेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. गडचांदूर हे शहर सिमेंट उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे येथून अनेक भागात जाण्यासाठी बससेवा आहे. मात्र, पांढरकवडासाठी थेट बससेवा नाही. तसेच आदिलाबाद हा कमी अंतराचा मार्ग असल्याने या मार्गावर बस सेवा सुरू करणे गरजेचे आहे.

तालुका सीमा फलक नसल्याने संभ्रम

चिमूर : जिल्ह्यातील एकाही तालुक्याच्या सीमेवर तालुका सीमा स्वागत फलक नाही. त्यामुळे कोणता तालुका कुठून सुरू होतो. याबाबत नवीन व्यक्ती संभ्रमात पडते. या सीमांवर सीमा स्वागत फलक लावल्यास सीमाही सुशोभित दिसेल. तसेच या माध्यमातून शहरांच्या अंतराची माहितीही मिळेल. त्यामुळे बांधकाम विभागाने प्रत्येक तालुका सीमेवर सीमा स्वागत फलक लावावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

माणिकगड परिसराचा इतिहास उपेक्षित

जिवती : राजुरा, जिवती, कोरपना तालुक्यात असलेला माणिकगड पहाड हौशी ट्रेकर्ससाठी अद्भूत पर्वणी ठरत आहे. जिल्ह्यातील सात बहिणींचा डोंगर पहाडाचा विकास साधल्यास पर्यटनदृष्ट्या विकासाला चालना मिळू शकते. मात्र, शासनाच्या दुर्लक्षामुळे माणिकगड परिसराचा इतिहास अजूनही उपेक्षित आहे.

पीक विमासाठी माहिती केंद्र सुरू करा

चंद्रपूर : जिल्ह्यातील कोरपना, जिवती, गोंडपिपरी, पोंभुर्णा, घुग्घुस, कोठारी, विसापूर, भिसी, तळोधी, बाळापूर येथील पीक विम्याची अनेक प्रकरणी प्रलंबित आहेत. मोबदला अजूनही मिळाला नाही. त्यामुळे शेतकरी तहसील कार्यालयात चकरा मारत आहेत. माहितीच मिळत नसल्याने तालुकास्थळी केंद्र सुरू करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.

ठाण्यातील वाहनांचा लिलाव रखडला

चंद्रपूर : येथील शहर व रामनगर पोलीस ठाण्यात अनेक दुचाकी वाहने जप्त करून आणण्यात आली आहेत. मात्र, वाहनमालकांनी ही वाहने अनेक वर्षांपासून नेलीच नाहीत. आता ती पोलीस ठाण्यात पडून आहेत. त्यातील अनेक वाहने भंगार झाली. काहींचे सुटे भागही बेपत्ता आहेत. या वाहनांचा लिलाव केल्यास शासनाच्या महसुलात भर पडू शकते. दरवर्षी न्यायालयाच्या आदेशाने या वाहनांचा लिलाव होतो. मात्र, अजूनही लिलाव करण्यात आला नाही.

जिल्ह्यातील शिवभोजनाचे केंद्र वाढावे

चंद्रपूर : शासनाने शिवभोजन केंद्र सुरू केली आहेत. मात्र, त्याच्यातील थाळींची संख्या मोजकीच ठेवली आहे. शिवाय केंद्रांची संख्या कमी आहे. त्यामुळे लाभार्थ्यांच्या मोठ्या प्रमाणात रांग लागते.

प्रदूषण करणाऱ्या वाहनांवर बंदी घालावी

चंद्रपूर : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढत आहे. त्यामुळे यावर आळा घालणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे, वाहनांद्वारे प्रदूषणात वाढ होत असून, प्रदूषण करणाऱ्या वाहनांवर बंदी घालण्याची मागणी होत आहे.

बचत गटांना कर्जपुरवठा करण्याची मागणी

राजुरा : कोरोनामुळे सर्वच क्षेत्रात परिणाम झाला आहे. यामध्ये बचत गटांनाही मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बचत गटांनी कर्जपुरवठा करून त्यांना जीवनदान देणे सध्यातरी गरजेचे आहे.

अनियमित पाणीपुरवठ्याने त्रस्त

चंद्रपूर : येथील बाबूपेठ परिसरात अनियमित पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. याकडे महानगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.