शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
4
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
5
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
6
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
7
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
8
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
9
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
10
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
11
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
12
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
13
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
14
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
15
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
16
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
17
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
18
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
19
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
20
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
Daily Top 2Weekly Top 5

तेलंगणाला जोडणाऱ्या राज्य मार्गाची दैना

By admin | Updated: October 12, 2015 01:34 IST

राजुरा तालुक्यातील राजुरा, देवाडा, सुमठाणा, सोन्डो लक्कडकोट या राज्यमार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे.

खड्ड्यांमुळे अपघातात वाढ : सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्षदेवाडा : राजुरा तालुक्यातील राजुरा, देवाडा, सुमठाणा, सोन्डो लक्कडकोट या राज्यमार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. दिवसेंदिवस अपघातात वाढ होत आहे. मात्र याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कमालिचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. रस्त्यावरुन जाताना खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा असा भास होतो. या रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत. रस्त्यावरील खड्ड्यात दिवसागणिक वाढच होत आहे. परंतु याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधीचे जाणिवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. तेलंगणा सीमेलगत असलेले रस्ते फार खराब झालेले आहे. या भागातील बहुतांश जनता तेलगु भाषिक आहेत. त्यांचा संपर्क तेलंगणा प्रदेशाची जास्त असतो. त्यामुळे त्यांना तेलंगणात ये-जा करावी लागते. तेलंगणा प्रदेशाला जोडणाऱ्या या मार्गात महाराष्ट्रातील अनेक गावे येतात. या मार्गावरुन फार मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे पादचारी, दुचाकी, चारचाकीधारकांना कमालिचा त्रास सहन करावा लागत आहे. राज्य शासन जनतेच्या मुलभूत सोयी सुविधाकडे विशेष लक्ष देत असल्याचा दावा करीत आहे. त्यात रस्त्याच्या विकासाला प्राधान्य आहे. या कामासाठी कोट्यवधी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. दरवर्षी १०० ते १५० कोटी रुपये रस्ते बांधकाम व डागडुजीवर खर्च करूनही तालुक्यातील ग्रामीण भागाच्या रस्त्याची अवस्था बिकटच आहे. कितीही पैसा ओतला तरी या रस्त्यावरचे खड्डे काही केल्या बुजत नाही. उलट दिवसेंदिवस ते वाढतच आहे. राजुरा रेल्वे गेट ते सुमठाणा तुलाना वरुर रोड, सोन्डो, सिद्धेश्वर, आनंदगुडा, जंगुगुडा, पारधीगुडा, लक्कडकोट रस्त्याचे डांबरीकरण पूर्णत: उखडले आहे. रस्ते बांधकामात प्रचंड भ्रष्टाचार होत आहे. त्यामुळे हा पैसा कुठे जिरतो. हे कळायला मार्ग नाही. डांबराचे प्रमाण कमी असते. डांबर पातळ करण्यासाठी एलडीओ नावाचा पदार्थ मिसळावा लागतो. मात्र ते महागडे असल्याने डांबरात केरोसिन वापरले जाते. केरोसिन वापरणे हे नियमबाह्य आहे. केरोसिनमुळे डांबरीकरणाचा दर्जा निकृष्ट होतो. पण त्याकडे दुर्लक्ष करून बांधकाम विभागाचे अभियंते अशा रस्त्यांना सर्रास मंजुरी देतात. त्यामुळे तीन ते चार महिण्यात रस्ते उखडतात. या प्रकारात सर्वांचे हित असल्याने रस्ता कधी उखडेल याचीच सारेजण वाट बघत असतात. यात सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे रस्त्यावर होणाऱ्या वाहतुकीचे निरीक्षणच योग्यरित्या होत नाही. मात्र याकडे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी जाणिवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढतच आहे. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या मालवाहू ट्रकांना दहा टनांची मर्यादा देण्यात आली. पण कमी वेळात जास्त वाहतूक करण्याच्या लालसेपोटीएका ट्रकमध्ये १५ ते १८ टन माल भरतात. त्यामुळे रस्त्याचे बेहाल झाले आहेत. (वार्ताहर)