शहरं
Join us  
Trending Stories
1
चार पॅराशूटच्या मदतीने यान समुद्रात उतरले, भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुखरूप परतले
2
भारतीय लष्कराच्या मानहानी प्रकरणात राहुल गांधी लखनौ न्यायालयात सरेंडर, तत्काळ मिळाला जामीन; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
3
ऑलिम्पिक क्रिकेट सामन्यांचे वेळापत्रक जाहीर, कधीपासून रंगणार 'रन'संग्राम? जाणून घ्या
4
५ लाखांपर्यंतचे उपचार मोफत! आयुष्मान कार्ड अंतर्गत नेमके कोणते आजार येतात? लगेच तपासा!
5
रोनाल्डोचा फॅन; सिराजनं बॅटिंग केली छान! पण फुटबॉल 'स्कील' जमलं नाही अन् चेंडू थेट... (VIDEO)
6
शुभांशू शुक्ला परतले, पंतप्रधान मोदींनी स्वागत केले; गगनयान मोहिमेचा उल्लेख करत म्हणाले...
7
Astro Tips: सगळं काही चांगलं आहे, तरी लग्न होत नाही; याला कारणीभूत ठरू शकते ग्रहदशा!
8
Olympics 2028: ऑलिंम्पिकचं वेळापत्रक जाहीर! कधी, कुठं रंगणार क्रिकेट सामने? A टू Z माहिती
9
फक्त २० रुपयांमध्ये २ लाखांचा विमा! मोदी सरकारची 'ही' योजना संकटात बनेल आधार! कसा करायचा अर्ज?
10
"तुमच्यापेक्षा जास्त बोलता येते..."; विधानसभेत ठाकरेंचे आमदार आणि शिंदेसेनेचे मंत्री भिडले
11
"मराठी माणसानेच मराठी भाषेचं नुकसान केलं...", आपल्याच भाषेबद्दल हे काय बोलून गेला आस्ताद काळे? भडकले चाहते
12
"खाण्यासाठीच कमावतोय..."; मॅनेजरने लंच ब्रेक घेण्यापासून रोखलं, कर्मचाऱ्याने सडेतोड उत्तर दिलं
13
४ दिवसांच्या घसरणीनंतर बाजाराची जोरदार मुसंडी! हिरो मोटो ते सन फार्मा... 'या' शेअर्सने केलं मालामाल
14
Pune Porsche Accident Update: दोघांना उडवणाऱ्या आरोपीला दिलासा, पोलिसांना मोठा झटका; न्याय मंडळाचा निर्णय काय?
15
बेडरुमचा दरवाजा वाजवला, आईला संशय आला; दार तोडताच रक्ताच्या थारोळ्यात दिसले पती-पत्नी
16
विकली जाणार ५४ वर्ष जुनी 'ही' कंपनी, तुम्ही नक्कीच नाव ऐकलं असणार; ४५ देशांत आहे ६,४८२ कोटींचा व्यवसाय 
17
सरकार नेमके कोणाला, कशाला 'अर्बन नक्षलवाद' ठरवणार आहे?; जनसुरक्षा कायद्यावरून प्रकाश आंबेडकरांचा सवाल
18
'कुठल्या दलित व्यक्तीला का पाठवलं नाही?', शुभांशू शुक्ला यांच्या अंतराळ यात्रेवर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका!
19
चॅरिटेबल ट्रस्टच्या नावाखाली 'प्रोजेक्ट' धर्मांतर सुरू होते, काम करणाऱ्या मुलींना पैसे दिले जात होते
20
डाएटिंग, व्यायाम... सर्व करुन दमलात पण वजन कमीच होईना; रोजच्या 'या' ६ सवयी जबाबदार

इलेक्ट्रिक साहित्य दुरुस्तीच्या कामाला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:20 IST

पीककर्ज रकमेची मर्यादा वाढवा चंद्रपूर : जिल्ह्यातील अनेक गावांत शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. त्यामुळे ग्रामस्थांचे उपजीविकेचे साधन ...

पीककर्ज रकमेची मर्यादा वाढवा

चंद्रपूर : जिल्ह्यातील अनेक गावांत शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. त्यामुळे ग्रामस्थांचे उपजीविकेचे साधन शेतीवर अवलंबून आहे. शेतीतून खरीप व रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आहे. त्यामुळे पीककर्ज रकमेची मर्यादा वाढविण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

वीज खांबामुळे अपघाताचा धोका

चंद्रपूर : येथील अनेक वॉर्डातील रस्त्यालगत असलेले विद्युत खांब गंजले आहेत. हा खांब कोसळून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हा खांब बदलविण्याची मागणी होत आहे. यापूर्वी अनेकदा हा खांब बदलविण्याची मागणी नागरिकांकडून झाली आहे; परंतु याकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे धोका होण्याची शक्यता आहे.

ग्रामीण भागात शौचालयांचा गैरवापर

चंद्रपूर : परिसरातील अनेक गावात गोवऱ्या, सरपणाची लाकडे, निरुपयोगी वस्तू नागरिक शौचालयात भरून ठेवत आहे. त्यामुळे या गावांमध्ये जनजागृती करून शौचालयाचा वापर करण्यासंदर्भात नागरिकांना सांगणे गरजेचे आहे.

रस्त्याच्या बाजूला असलेला कचरा उचलावा

चंद्रपूर : शहरातील प्रत्येक वार्डात स्वच्छता कर्मचारी दैनंदिन स्वच्छता करीत आहेत. मात्र, अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला बांधकाम साहित्य व वाहने ठेवण्याच्या प्रकार मोठ्या प्रमाणात आहे. परिणामी नागरिक त्याच ठिकाणी कचरा टाकतात. याकडे महानगरपालिकेने स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

दुकानात सोशल डिस्टन्सचा फज्जा

चंद्रपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्स ठेवणे गरजेचे आहे. यासंदर्भात प्रशासनाकडून वेळोवेळी सूचना केल्या जात आहे. असे असतानाही काही किराणा दुकानांमध्ये सोशल डिस्टन्स न पाळता जीवनावश्यक साहित्याची खरेदी केली जात आहे. त्यामुळे वेळीच आळा घालणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे, गोल बाजारातील बहुतांश दुकानदार याकडे दुर्लक्ष करीत आहे.

जडवाहतुकीवर निर्बंध घाला

चंद्रपूर : शहरातील काही रस्त्यांची क्षमता कमी असतानाही जास्त वजन असलेल्या वाहनांद्वारे साहित्य आणण्यात येत असल्याने रस्त्याची दुरवस्था आहे. सध्या पावसाचे दिवस असल्यामुळे रस्त्यावर ट्रक फसण्याच्या घटना सातत्याने घडत आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

मोकाट कुत्र्यांमुळे नागरिक हैराण

चंद्रपूर : शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या वाढल्याने नागरिक हैराण झाले आहेत. रात्री घराबाहेर निघणे कठीण झाले. शहरातील अनेक वॉर्ड आणि मुख्य चौकात मोकाट कुत्र्यांचा संचार वाढला.

उद्योग नसल्याने बेरोजगारी वाढली

चंद्रपूर : जिल्ह्यातील काही तालुक्यांत कोणताही उद्योग नसल्यामुळे या तालुक्यात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली आहे. त्यामुळे उद्योगांची निर्मिती करून रोजगार मिळवून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी

चंद्रपूर : तालुक्यातील अनेक गावातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. यामुळे प्रवास करताना विविध अडचणी येतात. याकडे लक्ष देऊन रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी केली जात आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे रस्त्यावरील खड्ड्यात पाणी साचून राहते. त्यामुळे अपघाताच्या घटना सातत्याने वाढल्या आहे.

नळयोजना सुरू कराव्या

चंद्रपूर : जिल्ह्यातील अनेक गावांत नळयोजनेअंतर्गत लाखो रुपये खर्च करून पाण्याच्या टाक्या बांधण्यात आल्या. परंतु, या टाक्या शोभेच्या वास्तू ठरत आहे. काही तांत्रिक अडचणींमुळे अनेक गावांत नळयोजनेचे पाणी मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे बंद असलेल्या नळ योजना प्रशासनाने सुरू करण्याची मागणी केली जात आहे.

नाल्यांना झुडपांचा वेढा

चंद्रपूर : शहरातील काही नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात झुडपे वाढली आहे. त्यामुळे नाल्यातील पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे स्वच्छता करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

रस्त्याची स्वच्छता करण्याची मागणी

चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील काही रस्त्यांवर केरकचरा, तसेच रेती साचली असून, यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. महापालिकेने रस्त्याची स्वच्छता करून दिलासा द्यावा, अशी मागणी शहरातील वाहनधारकांसह नागरिकांकडून केली जात आहे.

रस्त्यावरील सांडपाण्याने आरोग्य धोक्यात

चंद्रपूर : तालुक्यातील अनेक गावांमध्ये स्वच्छता मोहीम रखडली आहे. दरम्यान, सध्या कोसळत असलेल्या पावसात नाल्या सांडपाण्याने भरल्या आहेत. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. समस्या दूर करण्याची मागणी केली जात आहे.

पथदिवे दुरुस्त करण्याची मागणी

चंद्रपूर : शहरातील नागपूर रोडवरील अनेक पथदिवे बंद असल्याने नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने पथदिवे दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी मनपाकडे केली आहे.