शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

घनकचरा प्रकल्प जागेच्या वादात अडकला

By admin | Updated: July 5, 2014 01:19 IST

घनकचरा व्यवस्थापन व प्रकल्प निर्मितीचे ग्रहण मागील अनेक वर्षांपासून सुटता सुटत..

चंद्रपूर: घनकचरा व्यवस्थापन व प्रकल्प निर्मितीचे ग्रहण मागील अनेक वर्षांपासून सुटता सुटत नसल्याचे दिसते. नागपूर येथील मे. कन्यका नॉन कन्व्हेशनल एनर्जी प्रा. लि. या कंपनीला या प्रकल्प निर्मितीचे कंत्राट दिले आहे. कंत्राट देताना प्रारंभी सात एकर जागा रिकामी व साफ करून देण्याचे ठरविण्यात आले होते. मात्र सदर जागाच उपलब्ध करून दिली नसल्याचे कारण पुढे करून या कंपनीने काम सुरू केले नाही तर महापालिका जागा साफ करून दिल्याचेच सांगत आहे. जागेच्या या वादात हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मात्र अडला आहे. विशेष म्हणजे, प्रकल्पच सुरू होऊ न शकल्यामुळे सुमारे पाच लाख टन कचरा डम्पींग यार्डवर पडून आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू झाले आहे. केव्हाही पाऊस येण्याची शक्यता आहे. या कचऱ्यामुळे पावसाळ्यात जलप्रदूषणाचाही धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. चंद्रपुरातून दररोज १३० ते १४० टन कचरा निघतो. एवढ्या मोठ्या प्रमाणात घनकचरा बाहेर पडत असतानाही चंद्रपुरात आजवर घनकचरा प्रकल्प उभा होऊ शकला नाही. याशिवाय घनकचऱ्याच्या व्यवस्थापनाबाबतही चंद्रपूर दुर्देवीच ठरले. चंद्रपूरमध्ये नगरपालिका अस्तित्वात असताना घनकचरा व्यवस्थापनाचे धिंडवडेच उडाले होते. त्यानंतर आता मागील वर्षी नागपूर येथील मे. कन्यका नॉन कन्व्हेशनल एनर्जी प्रा. लि. या कंपनीला घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प निर्मितीचे कंत्राट देण्यात आले. ३१ मे २०१३ रोजी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत ठराव क्रमांक ४२ नुसार २३० रुपये प्रति टन या हिशेबाने घनकचरा प्रकल्पाचे कंत्राट मे. कन्यका नॉन कन्व्हेशनल एनर्जी प्रा. लि. या कंपनीला देण्यात आले.४ जून २०१३ रोजी वर्क आर्डरही देण्यात आला. यावेळी कारखाना उभारणीसाठी किमान सात एकर जागा कंत्राटी कंपनीला उपलब्ध करून देण्याचा करार झाला होता. ही जागा साफ करून त्याचे सपाटीकरणही करण्यात येणार होते. यातील तीन एकर जागा साफ करून दिल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात येते. मात्र प्रत्यक्षात मनपाने ही जागाच उपलब्ध करून दिली नसल्याचे मे. कन्यका नॉन कन्व्हेशनल एनर्जी प्रा. लि.चे संचालक विजय भांडारवार यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. याबाबत त्यांनी अनेकदा महापालिकेकडे पत्र पाठवून लक्ष वेधले. मात्र मनपाने त्यांच्या पत्रव्यवहाराकडे लक्षच दिले नसल्याचेही त्यांनी सांगितले. कारखान्यासाठी अनेक मशनरीज कन्यका कंपनीने दिल्लीतून तयार करवून घेतल्या आहेत. यात सदर कंपनीने कोट्यवधी रुपये लावले आहे. या सर्व मशनरीज चंद्रपूरला ट्रान्सपोर्ट करण्यासाठी केव्हाही तयार आहेत, असेही भांडारवार यांनी सांगितले.विशेष म्हणजे, जागेच्या या वादात घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प मात्र अडून पडला आहे. आतापर्यंत कारखान्याचे काम सुरू होणे अपेक्षित असताना एक वर्षानंतर कामाचा शुभारंभही झालेला नाही. (शहर प्रतिनिधी)