शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

रक्षाबंधनाला बहीण पाहतेय भावाची वाट...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:31 IST

प्रकाश काळे गोवरी : घरून अचानक एके दिवशी निघून गेलेला भाऊ तब्बल तीन वर्षे होऊनही अजूनही घरी परतला नाही. ...

प्रकाश काळे

गोवरी : घरून अचानक एके दिवशी निघून गेलेला भाऊ तब्बल तीन वर्षे होऊनही अजूनही घरी परतला नाही. आपला पती, मुलगा, भाऊ घरी येईल, या एकाच आशेवर घरातील मंडळी वाट पाहत आहे. रविवारी सर्वत्र बहीण-भावाच्या रक्षाबंधनाचा पवित्र सण आनंदात साजरा होत असताना ही बहीण तीन वर्षांपासून भावाची वाट पाहत आहे. आपला भाऊ या रक्षाबंधनाला तरी परत येईल, अशी अपेक्षा तिला आहे.

राजुरा तालुक्यातील गोवरी येथील जयंद्र बापूजी पिंपळकर (३८) हा तीन वर्षांपूर्वी अचानक घरून निघून गेला. कुटुंबीयांनी सर्वत्र जयंद्रचा शोधाशोध केला. मात्र कुठेच शोध लागला नाही. त्यानंतर आईवडिलांनी आपला मुलगा हरविल्याची रीतसर तक्रार राजुरा पोलिसात दाखल केली होती. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. मात्र जयंद्रचा कुठेच शोध लागला नाही. आपला पती, मुलगा, भाऊ तीन वर्षांपासून घरी परतला नाही म्हणून कुटुंबीय चिंतेत आहे. जयंद्रला दोन चिमुकली मुले आहेत. मुलांचा भार पत्नीवर आहे. म्हातारे आईवडील आहेत. मात्र जयंद्र अचानक निघून गेल्याचे दुःख कुटुंबीयांवर आहे. आज रक्षाबंधनाचा पवित्र सण, बहीण आपल्या भावाला प्रेमाने राखी बांधत असते. आपला भाऊ यावेळी तरी रक्षाबंधनाला घरी परत येईल यासाठी बहीण सुमनबाई व इतर बहिणी भावाची सारखी वाट पाहत आहेत. आपल्या भावावर कोणतेही संकट येऊ नये यासाठी बहीण सदैव देवाला साकडे घालत असते.

210821\img_20210821_130107.jpg

रक्षाबंधनाला बहीण पाहतेय भावाची वाट...!