शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

युतीविरोधात शिवसेना उतरणार रस्त्यावर

By admin | Updated: February 24, 2015 01:54 IST

राज्यातील युतीच्या सत्तेत भाजपासोबत असलेल्या शिवसेनेतील आमदार बाळू

चंद्रपूर: राज्यातील युतीच्या सत्तेत भाजपासोबत असलेल्या शिवसेनेतील आमदार बाळू धानोरकर यांनी सरकारविरोधातच आंदोलन पुकारण्याचा इशारा दिला आहे. दुष्काळबाधित शेतकऱ्यांना मदत, चंद्रपूर जिल्ह्यातील प्रदुषण आणि कर्मचाऱ्यांना प्रदुषण भत्ता तसेच सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत होणारा धान्याचा काळाबाजार या विषयांवरून भाजपाला घेरण्याची तयारी शिवसेना जिल्हाप्रमुख असलेले आमदार बाळू धानोरकर यांनी चालविली आहे.या प्रश्नांना येत्या १० दिवसात न्याय मिळाला नाही तर, ४ मार्चला चंद्रपुरात युती सरकार विरूद्ध निषेध मोर्चा काढण्याचा इशाराही त्यांनी पत्रकार परिषदेतून दिला आहे.राज्य सरकारने दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी हेक्टरी साडेचार हजार रूपयांची मदत जाहीर केली असली तरी, शेतकरी अल्पभूधारक असण्याची अट घातली आहे. ही अट जाचक असल्याने सर्वच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळणे शक्य नाही. त्यामुळे ही अट रद्द करून सरसकट मदतवाटप करावी, अशी मागणी त्यांनी केली. चंद्रपूर जिल्ह्यात खाणींचे प्रमाण अधिक असून औद्योगिकरणही वाढले आहे. मात्र त्यामळे प्रदुषणात भर पडली असून जनसामान्यांच्या आरोग्यावर प्रभाव पडत आहे. प्रदुषण पसरविणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करून वरोरा, भद्रावती, चंद्रपूर, बल्लारपूर, राजुरा, कोरपना, मूल या तालुक्यात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता लागू करण्याचीही त्यांची मागणी आहे.स्वस्त धान्य दुकानातून एपीएल धारकांना मिळणारे धान्य बंद करण्यात आले आहे. ते पूर्ववत सुरू करावे, पाच किलो वजनाचे घरगुती गॅसचे सिलिंडर स्वस्त धान्य दुकानामार्फत उपलब्ध करून द्यावे, तसेच धान्याचा काळाबाजार टाळण्यासाठी थेट दुकानापर्यंत माल पोहचवून द्यावा, अशीही त्यांची मागणी आहे.जिल्ह्यातील जनतेला न्याय मिळावा यासाठी आपण मंत्रीस्तरावर पाठपुरावा केला. मात्र प्रश्न कायमच असल्याने नाईलाजाने आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागत असल्याचे त्यांनी एका उत्तरात स्पष्ट केले. (जिल्हा प्र्रतिनिधी)आपले हे आंदोलन म्हणजे पक्षाचा जिल्हाध्यक्ष या नात्याने घेतलेली वयैक्तिक भूमिका आहे. भाजपाविरूद्ध अथवा भाजपातील कुण्या नेत्यांविरूद्ध हे आंदोलन नसून जनसामान्यांच्या प्रश्नावर उभारलेला हा लढा आहे. शिवसैनिक या नात्याने आपली भूमिका आधीपासूनच लढण्याची राहीली आहे. त्यामुळे सत्ता पक्षाचा आमदार असलो तरी जनसामान्यांचे प्रश्न वाऱ्यावर सोडणार नाही. - बाळू धानोरकर, आमदार