शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
4
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
5
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
6
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
7
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
8
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
9
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
10
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
11
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
12
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
13
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
14
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
15
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
16
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
17
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
18
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
19
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
20
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

पालिका, पंचायत समिती व जिल्हा परिषदेत काँग्रेसला निवडा - चव्हाण

By admin | Updated: October 10, 2016 00:39 IST

कोरपना तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत वनसडी आणि गोंडपिपरी तालुक्यातील नंदवर्धन येथील दोन्ही महिला सरपंचानी...

दोन महिला सरपंच कॉंग्रेसमध्ये : राजुरा येथे कॉंग्रेसचा मेळावाराजुरा : कोरपना तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत वनसडी आणि गोंडपिपरी तालुक्यातील नंदवर्धन येथील दोन्ही महिला सरपंचानी माजी आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वात प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत कॉंग्रेसमध्ये दाखल झाल्या. याप्रसंगी शेतकरी संघटना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसमधून अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. आगामी पालिका, पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेसला पसंती देण्याचे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केले.राजुरा विधानसभा कॉँग्रेस व युवक कॉँग्रेसच्या वतीने शनिवारी स्थानिक ज्योतिबा फुले शाळेच्या पटांगणावर भव्य शेतकरी, शेतमजुर, मजुर, महिला व युवक मेळावा पार पडला. या मेळाव्याचे उद्घाटन खा. चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री मुकुल वासनिक होते. तर विशेष अतिथी म्हणून विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, प्रमुख अतिथी विधिमंडळाचे उपगटनेते आ. विजय वडेट्टीवार, माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक, जिल्हा निरीक्षक एस. क्यू. जमा, अनंतराव घारड, नाना गावंडे, माजी आमदार प्रभाकर मामुलकर, बाबुराव तिडके, जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, डॉ. नामदेव उसेंडी, प्रकाश मारकवार, प्रमोद तितरमारे, युवक कॉँग्रेसचे लोकसभा अध्यक्ष शिवा राव, महिला कॉंग्रेस अध्यक्ष अश्विनी खोब्रागडे, आसावरी देवतळे व जिल्यातील अनेक नेते उपस्थित होते.प्रस्ताविकातून माजी आमदार सुभाष धोटे यांनी विधानसभा क्षेत्रातील विविध समस्यांवर प्रकाश टाकला. धोटे म्हणाले की, विधानसभा निवडणुकीनंतर कॉंग्रेसच्या काळात सुरु झालेल्या राजुरा-बल्लारपूर उड्डाण पुलाचे काम बंद झाले असून भाजपा सरकार दुर्लक्ष करीत आहे. वनहक्क कायद्यामुळे जिवती तालुक्यातील हजारो कुटुंब बेघर होणार असून तालुक्यातील जनता दहशतीत आहे. जिल्ह्यात सोयाबीनच्या वाळलेल्या शेंगा फुटून नव्याने अंकुर उगवले आहे. मात्र शासनाने अजूनपर्यंत ओला दुष्काळ जाहीर केला नाही. कापूस पिकाला भाव नाही. विधानसभा क्षेत्रातील एकही रस्ता बरोबर नाही, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.यावेळी विधिमंडळाचे उपगटनेते विजय वडेट्टीवार यांनी जिल्ह्यातील दोन्ही मंत्र्यांवर कडाडून टीका केली. मेळाव्यातील गर्दी पाहून ‘कुठे गेले अच्छे दिन’ म्हणत लोकांना प्रश्न विचारून आतातरी खोट्या आश्वासनाला बळी पडू नका, असे त्यांनी आवाहन केले. माजी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री मुकुल वासनिक यांनी माजी आमदार सुभाष धोटे यांच्या कार्याची प्रशंसा केली. सुभाष धोटे आमदार असताना राजुरा विधानसभा क्षेत्राचा ज्या पद्धतीने विकास झाला, आता विकास पूर्णत: थांबला असल्याचा आरोप त्यांनी केला. काँग्रेसच जनसामान्याला तारणारा पक्ष असल्याचे त्यांनी सांगितले.संचालन युवक कॉंग्रेसचे महासचिव सचिन फुलझेले यांनी केले. आभार राजुरा विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष आशिष देरकर यांनी मानले. मेळाव्याला राजुरा, कोरपना, जिवती व गोंडपिपरी तालुक्यातील हजारो नागरिकांची उपस्थिती होती. (तालुका प्रतिनिधी)विकासकामांचे श्रेय सुभाष धोटेंना प्रदेशाध्यक्ष चव्हाण म्हणाले की, सुभाष धोटे आमदार असताना मी मुख्यमंत्री होतो. राजुरा विधानसभा क्षेत्रातील विकासकामांसाठी सुभाष धोटे तळमळीने झटत होते. त्यांच्या हातात नेहमी पाठपुरावा करण्यासाठी १५-२० पत्र असायचे. गत निवडणुकीत अशा लढवय्या नेत्याला पराभवाचे तोंड पाहावे लागले. मात्र, त्यामुळे राजुरा विधानसभा क्षेत्राचे प्रचंड नुकसान झाले आहे. या विधानसभा क्षेत्रात ५०० कोटींची कामे केल्यामुळे राजुरा विधानसभा क्षेत्रातील विकासकामांचे श्रेय सुभाष धोटे यांनाच जात असल्याचे ते म्हणाले.