शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
4
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
5
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
6
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
7
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
8
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
9
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
10
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
11
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
12
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
13
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
14
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
15
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
16
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
17
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
18
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
19
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
20
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

शेतातील कापूस बघून शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 05:00 IST

कापूस उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा संपायला तयार नाही. कधी निसर्गाची उदासीनता तर कधी शासनाचे शेतकरी विरोधी धोरण कास्तकारांना मारक ठरले आहे. उत्पादन खर्च जास्त व उत्पादन कमी अशी शेतकऱ्यांची बिकट अवस्था झाली आहे. शेतकरी दिवसेंदिवस महागाईच्या तडाख्यात भरडला जात आहे. नापिकिने शेतकºयांवर कर्जाचा डोंगर वाढत चालला आहे.

ठळक मुद्देकापूस वेचणीला मजूर मिळेना : वातावरणातील बदलाने शेतकरी चिंतातूर

लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : कापूस अंतिम टप्प्यात आला आहे. मार्च महिन्याचा पंधरवडा उलटून गेला आहे. मात्र कापूस वेचणीला मजूर मिळत नसल्याने कापूस शेतातच आहे. दररोज वातावरणात बदल होत असून वेळी-अवेळी पाणी येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत असून शेतातील कापसू बघून शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी येत आहे.कापूस उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा संपायला तयार नाही. कधी निसर्गाची उदासीनता तर कधी शासनाचे शेतकरी विरोधी धोरण कास्तकारांना मारक ठरले आहे. उत्पादन खर्च जास्त व उत्पादन कमी अशी शेतकऱ्यांची बिकट अवस्था झाली आहे. शेतकरी दिवसेंदिवस महागाईच्या तडाख्यात भरडला जात आहे. नापिकिने शेतकºयांवर कर्जाचा डोंगर वाढत चालला आहे. मार्च महिन्याचा पंधरवडा संपायला आला आहे. कापूस वेचणी अंतिम टप्प्यात आली आहे. गहू, चना, ज्वारी ही रब्बी हंगामातील पिके काढणीला आल्याने शेतकऱ्यांना कापूस वेचणी करायला मजूर मिळणे कठीण झाले आहे.वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होत असल्याने अवकाळी पाऊस होण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे. अवकाळी पावसासह गारपीठ झाली तर शेतकऱ्यांचा हाताशी आलेला कापूस मातीमोल होण्याचा धोका निर्माण झाला आहे. राजुरा तालुक्यातील बहुतांश भागात अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे.या स्थितीत शेतकरी आर्थिक नुकसानीचा धोका पत्करत कापूस वेचणीचे दर वाढवून १५ रुपये प्रति किलो दर द्यायला तयार आहेत. मात्र मजूर मिळत नसल्याचे पीक शेतातच आहे. परिणामी शेतकऱ्यांना चिंता सतावत आहे.कापसाची शेती संकटातकापूस पिकावर होणारा खर्च मोठा आहे. सुरवातीपासून शेतकऱ्यांना कापूस पिकांवर जास्त खर्च करावा लागतो.त्या तुलनेत कापूस शेतकऱ्यांना परवडत नाही. मजुरांची मजुरी वाढल्याने कपसाचीं शेती संकटात आली आहे.कापूस वेचणी शेवटच्या टप्प्यात आली असून कापूस वेचणी करायला मजूर मिळत नसल्याने नाईलाजाने जास्त पैसे मजुरी देऊन कापूस वेचणी करावी लागत आहे.- श्रीधर जुनघरी, शेतकरी, गोवरी

टॅग्स :agricultureशेती