लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात विविध ठिकाणी ढगाळ वातावरण व काही ठिकाणी पावसाने हजेरी दिल्याने रबी पिकांचे नुकसान झाले. शेतकऱ्यांनी गहू, हरभरा, जवस पिकाची लागवड केली आहे. काही शेतकऱ्यांच्या शोतील कापूस वेचणी अद्याप झाली नाही. शुक्रवारी रात्रीच्या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला. या पिकांचे सर्वेक्षण करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.धानाचे पोते भिजलेतळोधी बा.: नागभीड तालुक्यात शुक्रवारी रात्री अचानक मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे बाजार समिती व सेवा सहकारी सोसायटीत ठेवलेल्या शेतकºयांचे धानाचे पोते भिजले. यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तळोधी परिसरातील शेतकऱ्यांनी धानाला भाव मिळावा, याकरिता मोठ्या प्रमाणात धानाचे पोते कृषी उत्पन्न बाजार समिती व सेवा सहकारी सोसायटीत आणले होते. मात्र व्यापारी कमी भाव देत असल्याने शेतकऱ्यांनी भाव वाढेल, या आशेवर धानाचे पोते बाजार समिती व सोसायटीमध्येच ठेवले. अशातच शुक्रवारी आलेल्या मुसळधार पावसामुळे धानाचे सर्व पोते भिजून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.शेतकºयांची चिंता वाढलीशंकरपूर : शुक्रवारी सकाळी आलेल्या पावसामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली. अवकाळी पावसाने काही प्रमाणात शेतकऱ्यांची चिंता वाढवली. या परिसरातील काही गावांच्या रस्त्यावर पाणी साचले. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची रबी पिके संकटात आली आहे. हरभरा, मिरची, गहू या पिकांवर ढगाळ वातावरणामुळे रोगराई पसरत आहे. कृषी विभागाने यावर सल्ला देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.लाखोळी, गहू, हरभरा धोक्यातसिंदेवाही : निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. धान, गहू, लाखोळी, हरभा आदी पिकांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. दोन दिवसांपूर्वी आलेल्या पावसाने पिकांचे प्रंचड नुकसान झाले. त्यामुळे आधारभूत केंद्रात बाहेर ठेवलेले धान ओले झाले. सिंदेवाही तालुक्यात भाजीपाला उत्पादन केले जाते. या पावसामुळे भाजीपाला पिकाचेही नुकसान झाले. गहु, हरभरा या पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. मात्र असेच वातावरण राहिल्यास पीक मिळणार की नाही, याची शेतकऱ्यांना चिंता आहे.
अवकाळी पावसामुळे रबी पिके संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2020 5:00 AM
शेतकऱ्यांच्या शोतील कापूस वेचणी अद्याप झाली नाही. शुक्रवारी रात्रीच्या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला. या पिकांचे सर्वेक्षण करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
ठळक मुद्देशेतकरी संकटात । महसूल व कृषी विभागाने सर्वेक्षण करण्याची मागणी