शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
3
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
4
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
5
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
6
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
7
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
8
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
9
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
10
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
11
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
12
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
13
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
14
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
15
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
16
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
17
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
18
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
19
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
20
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक

उन्हाळी भुईमुगातून दहा लाखांचे उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2020 5:00 AM

परिसरातील शेतकरी नगदी पिकाला अधिक प्राधान्य देतात. त्यामुळे सोयाबीन, कापूस या पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. मात्र ज्या पिकातून तेल मिळते ते पिके मागील अनेक वर्षापासून तालुक्यातून हद्दपार झाले होते. शेतकऱ्यांना स्वत:साठी तेल व जनावरांकरिता ठेप मिळावी यातून आर्थिक नफा व्हावा यासाठी वरोरा कृषी कार्यालयाने तालुक्यातील शेगाव येथील २५ शेतकऱ्यांची भुईमुग लागवडीकरिता निवड केली.

ठळक मुद्देवरोरा तालुका : पहिल्यांदाच तालुक्यातील शेतकऱ्यांनी केला प्रयोग

लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : भारत कृषी प्रधान देश असल्याने देशात धान्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. परंतु तेलाकरिता दुसऱ्या देशावर अवलंबून रहावे लागते. तेलबियांचे उत्पादन व्हावे यासाठी वरोरा तालुक्यात प्रथमच कृषी कार्यालयांतर्गत शेतकऱ्यांना मोफत बियाने देवून उन्हाळी भुईमुग लावण्याचा प्रयोग करण्यात आला. यामध्ये तालुक्यातील शेतकऱ्यांना दहा लाखांचे उत्पादन झाले आहे.परिसरातील शेतकरी नगदी पिकाला अधिक प्राधान्य देतात. त्यामुळे सोयाबीन, कापूस या पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. मात्र ज्या पिकातून तेल मिळते ते पिके मागील अनेक वर्षापासून तालुक्यातून हद्दपार झाले होते. शेतकऱ्यांना स्वत:साठी तेल व जनावरांकरिता ठेप मिळावी यातून आर्थिक नफा व्हावा यासाठी वरोरा कृषी कार्यालयाने तालुक्यातील शेगाव येथील २५ शेतकऱ्यांची भुईमुग लागवडीकरिता निवड केली. यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण तसेच कृषी संशोधन केंद्र सिंदेवाहीच्या वतीने भुईमुंगाचे मोफत बियाणे पुरविण्यात आले.शेगाव मंडळकृषी अधिकारी विजय काळे यांच्या मार्गदर्शनात शेतकऱ्यांनी उन्हाळ्यामध्ये भुईमुंगाची लागवड केली. भुईमुग लागवडीमुळे एकाच शेतात, एकाच वर्षात तीन पिके घेण्याची किमया शेतकऱ्यांना साधता आली. वरोरा तालुक्यातील शेतकऱ्यांना दोनशे क्विंटल उन्हाळी भुईमुगाचे पीक झाले. यातून दहा लाख रुपयांची कमाई झाली. यामुळे पुढील वर्षी उन्हाळी भुईमुग क्षेत्र वाढण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे.स्थानिक बाजारपेठेत भुईमुगाची विक्रीवरोरा तसेच माढेळी येथील बाजारपेठेत उन्हाळी भुईमुंग पाच हजार रुपये प्रती क्विंटल प्रमाणे विकण्यात आले. बाजारपेठ उपलब्ध झाल्याने भुईमुंग उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर काही शेतकऱ्यांना बाजारात किरकोळ विक्री केल्याने त्यांनाही आर्थिक लाभही झाला.सोयाबिन पिकानंतर हरभऱ्याचे पीक घेतले जाते. त्यानंतर जानेवारी महिन्याच्या शेवट उन्हाळी भुईमुग लावल्यास उत्पादन चांगले होते. त्याचा फायदा शेतकऱ्यांना मिळेल. मे महिन्यात उन्हाळी भुईमुग निघून शेताची मशागत करुन हंगामात दुसऱ्या पिकाची पेरणी करता येईल.- व्ही. आर. प्रकाश,तालुका कृषी अधिकारी, वरोरा

टॅग्स :agricultureशेती