शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
3
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
4
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
5
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
6
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
7
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
8
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
9
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
10
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
11
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
12
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
13
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
14
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
15
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
16
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
17
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
18
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
19
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
20
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याअभावी धान पिकांना जबर फटका

By admin | Updated: November 10, 2014 22:41 IST

आसोला तलावाच्या कराननाम्याखालील सिंचाई शाखा बेंबाळ अंतर्गतच्या टेलवरील धान पिकांना शेवटच्या टप्प्यात पाणी पुरवठा करण्यास संबंधित अधिकारी हतबल ठरले. पाण्याअभावी ऐन

घोसरी : आसोला तलावाच्या कराननाम्याखालील सिंचाई शाखा बेंबाळ अंतर्गतच्या टेलवरील धान पिकांना शेवटच्या टप्प्यात पाणी पुरवठा करण्यास संबंधित अधिकारी हतबल ठरले. पाण्याअभावी ऐन गर्भातच पिकांना फूटवे निघाले. संपूर्ण पिके नष्ट होत आहेत. आधिच कर्जाचा बोजा असलेल्या शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे आहे.मूल-पोंभुर्णा तालुक्याच्या टोकावरील बेंबाळ-नांदगाव- घोसरी परिसरात मुख्यत्वे धान्याचे पीक घेतले जाते. परंतु निसर्गाच्या दृष्टचक्रात शेतकरी नेहमीच पिचला जात आहे. परिसरातील बेंबाळ नांदगाव, घोसरी, फुटाणा, गोवर्धन, बोंडाळा, दिघोरी येथील पिकेच्या नियोजनशुन्यतेमुळे शेवटच्या क्षणी पिकांना पाणी मिळत नसल्याने दरवर्षी पिकांना जबर फटका बसत असते. आसोला तलावात पाणी साठा अपुरा असताना नियोजनबद्धरित्या पाणी पुरवठा करणे गरजेचे होते. परंतु संबंधित अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारीने आवश्यकता नसताना रोवणीकरिता कालव्याद्वारे मुबलक पाणी सोडण्यात आले. विशेषत: त्यावेळी पावसाने हजेरी लावलेली होती. वेळीच पाण्याचा काटकसरीने पुरवठा केला असता तर आजघडीला १०-१५ तारखेपर्यंत टेलवरील पिकांना पाणी पुरवठा होवून धानपिकांना संजीवनी मिळाली असती. परंतु अधिकारी सद्य:स्थितीत तलावात पाणी नसल्याचे हेरुन हतबलता दर्शविली आहे. परिणामी पाण्याअभावी टेलवरील धानपिके नष्ट होत असल्याने शेतकरी पुरता हतबल ठरलेला असून आर्थिक संकटाचा सामना करावा लागणारआहे. (वार्ताहर)