शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

मैदानी खेळांकडेही लक्ष देणे गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:28 IST

२५ ते ३० वर्षांपूर्वीचा काळ आठवला की, सर्वत्र मैदाने मुलांनी फुलून गेल्याचे चित्र बघावयास मिळायचे. गाव व शहरात कबड्डी, ...

२५ ते ३० वर्षांपूर्वीचा काळ आठवला की, सर्वत्र मैदाने मुलांनी फुलून गेल्याचे चित्र बघावयास मिळायचे. गाव व शहरात कबड्डी, व्हॉलीबॉल, हुतूतू, विटी दांडू, लगोरी अशा मैदानी खेळांमध्ये बालक व युवापिढी रंगून जायची. मात्रे तंत्रज्ञानात क्रांती झाली. प्रत्येकाच्या घरी स्मार्टफोन आला. त्यातच आता कोरोनासंकटामुळे मागील वर्षभरापासून शाळा बंद असल्यामुळे आणि अभ्यासक्रम ऑनलाईन घेतल्या जात असल्यामुळे विद्यार्थी पूर्णपणे गुंतले आहे. काही वर्षांपूर्वी विद्यार्थी आणि क्रीडांगणाचे अतूट नाते निर्माण झाले होते. शाळा सुटली की, बच्चे कंपनी मैदान गाठायची. शरीरातून घाम निघेपर्यंत मनसोक्त मैदानी खेळ खेळायचे. सुट्टीच्या दिवशी तर क्रीडांगणे बालकांच्या गर्दीने फुलून जायची. आधुनिक तंत्रज्ञानाचे सिम्बॉल ठरलेल्या मोबाईलचा सर्वत्र संचार झाला. संवादाचे माध्यम असलेला मोबाईल स्मार्ट झाला. लॉकडाऊनमुळे यामध्ये अधिकच जवळचा झाला. या फोनमुळे संवाद करण्याची व्याप्ती वाढली. पण, विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर अनिष्ट परिणाम होत आहे. त्यामुळे मुलांना मैदानी खेळाकडेही वळविण्याची विनंती वैद्यकीय तज्ज्ञांनी केली आहे.